Monday 12 September 2011

आपली जलसंपत्ती



कोकणात पाउसाचे प्रमाण सर्वसाधारणपणे चांगले राहिले आहे पावसाळ्यात     होणा-या भरपूर पावसाचे पाणि वाहून जाऊ नये म्हणून आपल्या परिसरात खुप तलाव, ळीं ,बाव्खाले होती. याचाच अर्थ पाणि अडवा  पाणि जीरवा हे तंत्र आपल्या कड़े वापरात होते. हळूहळू वाढत्या लोकसंख्येने गावात असलेल्या तळीं बाव्खालाचा बळी घेतला.  ळींबाव्खाले आक्रसत चालली आहेत वेळीच जागृत होण्याची गरज आहे.
वॉटर मॅनेजमेंट अर्थात जलव्यवस्थापन हे आजचे परवलीचे शब्द.  
समर्थनी पाण्याचे महत्व फार पुर्वीच सांगितले आहे

सकळ जिवा चैतन्य। सकळिका समान। त्रेलोक्याचे महिमान। उदकापाशी।।
नदीचे उदक वाहत गेले। तो निरर्थक चालिलें। जरी बांधोनि काढले। नाना तीरीं कालवे।।
उदकाचे देह केवळ । उदकाचेंचि भूमंडळ । चंद्रमंडळ सूर्यमंडळ । उदकाकरितां ॥
नाना मुक्तफळांचें पाणी । नाना रत्नी तळपें पाणी । नाना शस्त्रामधें पाणी । नाना गुणाचें ॥
जे जे बीजीं मिश्रीत जालें । तो तो स्वाद घेऊन उठिलें । उसामधें गोडीस आलें । परम सुंदर ॥
उदक तारक उदक मारक । उदक नाना सौख्यदायेक । पाहातं उदकाचा विवेक । अलोलिक आहे ॥

वसई परिसर परशुरामाची भूमि म्हणून प्रसिद्ध असलेल्या शुर्पारक नगरीचा भाग होता. शुर्पाराकाची भौगोलिक रचना पूर्वेला पर्वतरांगा, पच्शिमेला  अरबी समुद्र , उतरेला वैतरणा नदी, दक्षिणेला उल्हास नदी. आपल्या धर्मात तिर्थक्षेत्राला फार महत्त्व आहे. त्यातून तीर्थे (तलाव,सरोवर,कुंडे )  अधिक महत्वाची. शुर्पारक नगरीत एकशेआठ तीर्थे प्रसिद्ध होती. 






पूरी पिठाचे पाचवे शंकराचार्य स्वामी विद्यारण्य व् सातवे स्वामी पध्मनाभ   यांची समाधी स्थान असलेले    निर्म


 येथील  विमल सरोवर व्  निर्मल सरोवर तीर्थ.









  सोपारा उमराळा येथील चक्रतीर्थ म्हणजे चक्रेश्वर तलाव












बुरुड राज्याचा कोट येथील तलाव


















पाणि अडवून जिरवण्या साठी तयार केलेली बाव्खाले















देवकुंड , देव तलाव






दोनतलाव  वटार












 स्थानिक  , या तलावाना सासु सुनेची  ळीं (हाउ ओची  ळीं) म्हणतात










शंकराचार्य  मंदिरा  कडून  तलावाचे  विहंगम  दृश्य ,समोर सुलेश्वर मंदिर व् घाट

आजुबाजुची मंडळी आपला कचरा सांडपाणी तलावात सोडत आहेत. तलाव घाण पाण्याची डबकी बनत आहेत.
पुर्वज्यानी धार्मिक दृष्टीकोन स्वीकारुन  तलावाना तीर्थ  मानून त्यांच पावित्र्य जपले. 


आता वैन्ज्ञानिक युगात पर्यावरण पोषक  जीवन शैलीने आपले जलसाठे, परिसर प्रदुषण मुक्त ठेवण्याची नितांत गरज आहे.

Monday 5 September 2011

विद्यार्थी मेळावा

मंथन कार्यक्रमा अंतर्गत शैक्षणिक क्षेत्रात काम   करण्यासाठी कोर टीम बनवण्यात आली.
शैक्षणिक कार्यक्रमा विषयी चर्चा करताना आलेले काही मुद्दे
समाजातील विध्यार्थ्यासाठी एक व्यासपीठ असावे, विध्यार्थ्याना आपले यश , अनुभव इतर विध्यार्थ्याना सांगावयाची  (Knowledge sharing) संधी मिळावी ,वर्षातून कामित कमी दोन ते तीन मेळाव्याचं  आयोजन करण्यात यावं
संध्या विद्यार्थाचही ग्लोबलायझेशन होत आहे. वेगवेगळे  अभ्यासक्रम ,स्पर्धापरीक्षा यात निभाव लागण्यासाठी विध्यार्थानी काही गुणांची  कास धरायला हवी.

आपल्या मधील 'स्व' ची ओळख असवयाला  हवी , म्हणजेच slef awareness मला काय  आवडते  कोणत्या विषयात गती आहे,कोणत्या विषयावर लक्ष केन्द्रित करायला हव ही जाण.

समस्याची उकल म्हणजे (Problem solving Skill) एखादा प्रश्न कसा सोडवावा,काय पर्याय उपलब्ध आहेत याची जाणीव वाढवणे
निर्णयक्षमता (Decision making)  पटकन  निर्णय कसा घेता येइल, त्याची फलित काय? तोटे काय? याचा लेखाजोखा
परिणामकारक संवाद (Effective Communication)  आज संवादास विशेष महत्व आहे, आपला मुद्दा , विचार चांगल्या रितीने मांडने , पटवून देणे.
हुशारी बरोबर भावनांचा समतोल साधणे महत्वाचे
जीवघेण्या स्पर्धे मुले विद्यार्थी प्रचंड तणावा   खाली वावरत असतो, या ताणावाचा  निचरा करता आला पाहिजे विपरीत परिणाम टाळण्याचे  कसब यायला हवं.
ह्या सर्वाचा विचार करून टीम कामाला लागली व्  २६ जूनला आप्पा फुलारे  होंल वाघोली येथे दहावी पुढच्या   विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले , सर्व गावा मधून दहावी नंतरच्या  विध्यार्थ्याची यादी बनवली. श्री अविनाश धर्माधिकारी मार्गदर्शन करणार होते परंतू ठरल्या प्रमाणे घडतच असं नाही याच प्रत्यंतर आले. चाणक्य मंडलाने या वर्षी UPSC झालेले  श्री स्वप्निल बावकार उपलब्ध करून दिले.दहावी पासून ते स्पर्धा परीक्षा पर्यंतचा मोठा कन्व्हास त्यानी कव्हर केला. वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची माहिती दिली. करियरच्या वाटा दाखवल्या.


 विद्यार्थ्यांचा सहभाग वाखाणण्या   सारखा होता. काही विद्यार्थ्यांनी आपले विचार छान पद्धतीने  मांडले.






विद्यार्थी मेळाव्यांत, BAMS परीक्षेत  महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांक व्  सुवर्ण   पदक  मिळवणाऱ्या कु. मिनल शंकर नाईक,राणेभाट हिचं कौतुक करण्यात आले. मिनलनी MD CET मध्ये पाचवा क्रमांक पटकावला व् सध्या MD करत आहे.
  


This is beginning
We have promises to keep, and miles to go before We sleep.