Saturday 28 January 2012

आकार जीवनाला!

(  संक्षिप्त परिचय :  श्री  दिलीप  कुलकर्णी - पर्यावरण जगण्यासाठी कोकणात सहकुटुंब स्थायिक. कुडावळे, दापोली येथून ते ‘गतिमान संतुलन’ हे मासिक प्रकाशित करतात. या पूर्वी ते विवेकानंद केंद्र कन्याकुमारी येथे १९८४-९३ पर्यंत पूर्णवेळ कार्यकर्ते, " विवेक विचार " चे संपादक म्हणून काम. वैदिक गणित , निसर्गायण , वेगळ्या विकासाचे वाटाडे , सम्यक विकास ,अणु-विवेक , दैनंदिन पर्यावरण इत्यादी पुस्तके प्रसिध्द. पर्यावरण अभ्यास शिबीर , मराठी पर्यावरण साहित्य संमेलन, विविध सामाजिक विषयावर प्रबोधन इत्यादी उपक्रम.)

 ‘गतिमान संतुलन’  मधील आकार जीवनाला!  हा लेख खाली देत आहे.
  जीवनाला आकार देण्याकरिता माहिती आणि ज्ञान ह्यांच्या पलीकडे असणारी एक शहाणीव आपल्यात विकसित होणं आवश्यक असतं; ह्या शहाणीवेचा शैक्षिणिक पात्रतेशी काहीही सबंध नसतो हे प्रारंभीच लक्षात घेऊ या. ही शहाणीव अंत:प्रज्ञेचा भाग असतो; नि प्रचलित शिक्षण पध्दतीत तर्कप्र ज्ञने वर अतिरेकी भर असल्याने अंत:प्रज्ञा दुर्लक्षित राहते. अनेक मुलभूत प्रश्न आपण स्वत:ला कधी विचारात नाही.त्यांची एक सविस्तर यादीच देत आहे, जेणेकरून आपल्या जगण्याचा सारा आवाका आपल्या विचारांच्या कक्षेत यावा.
  1. माझं शिक्षण केवळ पुढे अधिक पैसे मिळवून देणाऱ्या नोकरीसाठी आहे; कि, जीवन सर्वांगानी विकसित व्हावं ह्यासाठी?
  2. अर्थार्जन आणि उपभोग ह्यांच्या व्यतिरिक्त माझ्या विकासासाठी मी काय काय करतो?
  3. अर्थार्जन आणि उपभोग ह्यांची माझी पद्धती माझ्या शारीरिक  आणि मानसिक स्वास्थ्यावर चांगले /वाईट  कोणते परिणाम करते.
  4. शारीरिक स्वास्थ्य, मानसिक संतुलन, भावनिक विकास , बौद्धिक समृद्धी ह्यांच्यासाठी मी निश्चयपूर्वक वेळ काढतो का? तो माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग बनेल हे मी कटाक्षाने बघतो का?
  5. डाव्या मेंदूच्या विकासावर सध्या अतिरेकी भर आहे; उजव्या मेंदूच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करून ते असंतुलन दूर करणं आवश्यक आहे हे लक्षात घेऊन मी तसे प्रयत्न करतो का?
  6. एकाच्या  किंवा दोघांच्या अर्थार्जनाचा कौटुंबिक जीवनावर, कौटुंबिक स्वास्थ्यावर कोणता परिणाम होतो आहे? आपला जोडीदार ,मुलं, घरातले अन्य नातेवाईक ह्यांच्याशी आपले संबंध कसे आहेत? 
  7. माझं अर्थार्जन आणि उपभोग ह्यांचा समाजाशी असणारा संबंध कसा आहे? माझा अर्थार्जनाचा मार्ग आणि प्रमाण अन्य समाजघटकांचं शोषण करणार आहे का? अर्थार्जनाचा मार्ग नैतिक आहे का? क्षमता असल्याने अधिक पैसे मिळविताना समाजातल्या कित्येकांना प्रामाणिक कष्ट करूनही किमान आवश्यक एवढाही मोबदला मिळत नाही, ह्याची जाणीव मला असते का? अर्थार्जनाला काही एक उच्च सीमा असावी असं मला वाटतं का? ही रेषा माझी मी ओढायची की सरकारनं लादायची?
  8. समाजातील दुर्बल , वंचित , आर्त ,विपन्न , संकटग्रस्त  ह्यांच्याप्रती माझ काही कर्तव्य आहे अस मी मानतो का? त्यांच्या साठी वेळ देतो का?
  9. एक नागरिक म्हणून राष्ट्राप्रती माझी काही कर्तव्यं असतात त्यांचं   पालन मी करतो का?
  10. नवरा आणि बायको ह्या दोघांनीही अर्थार्जन करण्यामुळे दुप्पट पैसे घरात येतात ते मुलभूत गरजांची पूर्तता करण्यापुरते असतात कि अधिकाधिक चैनीच जीवन जगण्यासाठी? पती पत्नी मिळून आपण ह्याचा विचार कधी करतो का? अशानं वाढणार्या सामाजिक विषमतेच भान आपल्याला असते का? एकाच कुटुंबातल्या दोघांनी नोकर्या / व्यवसाय करण्यामुळे काहीना रोजगारापासून वंचित राहावं लागतं ह्याची जाणीव आपण ठेवता का?
  11. आपलं अर्थार्जन आणि उपभोग ह्यांचे पर्यावरण वरही परिणाम होत असतात ह्याची जाणीव आपल्याला असते का? निसर्गातली संसाधन, उर्जा,मर्यादित आहेत; ती फक्त पैसेवाल्यांसाठी नसून सर्वासाठी आहेत, ह्या सर्वा मध्ये पशु , पक्षी, जलचर , सूक्ष्मजीव ह्यांचाही समावेश होतो ह्याची जाणीव मला आहे का? माझे उपभोग , संचय  ह्यामुळे त्यांचे अधिवास उद्ध्वस्त होतात; प्रजातीच नाश पावतात ह्या हानीचा भान मला आहे का?
  12. मानवी जीवनाचं ध्येय जाणीवेचा विस्तार हे आहे हे मला ठावूक आहे का? त्यासाठी आवश्यक असणार्या देह धारणेसाठी उपभोग हे साधन मात्र आहेत ते जीवनाचा ध्येय नव्हे हे मी जाणतो का?
अश्या  त-हेचे   प्रश्न स्वत;ला विचारण्यातून माहिती आणि ज्ञान ह्याच्या पलीकडची एक सजगता ,सहानुभूती , संवेदनशीलता आपल्यात विकसित होऊ लागते. हे प्रश्न सातत्यानं स्वत;ला विचारत राहावे लागतात. जिला continuos assessment म्हणतात.जीवनाचं ध्येय निश्चित करण्यासाठी तर हे प्रश्न उपयोगी आहेतच; त्यातून जीवनाची  जी दिशा जो मार्ग निश्चित होतो; त्यावरून आपली वाटचाल चालू आहे ना,ह्याची खात्री करून घेण्य साठी हे सततचं आत्मपरीक्षण आवश्यक असतं.
तुमच्यापैकी काहींच्या मनात असा एक प्रश्न निश्चित येईल की इतका व्यापक विचार करण्याचे कारणच काय? माझ्यापाशी बुद्धिमत्ता आहे; तिच्या जोरावर मी उच्च शिक्षण घेतलं आहे, त्याच्या बळावर चांगली नोकरी मिळवली आहे त्या पैशातून मजेत, चैनीत जगणार आहे हे करताना फार तर कुटुंबाचा विचार मी करीन; समाज,राष्ट्र , पर्यावरण ह्याचा पदोपदी क्षणोक्षणी विचार करण्याचं कारणच काय?  त्याचं कारण असं आहे की, हे सगळे घटक, स्तर परस्पराशी जोडलेले आहेत,ते परस्परावर चांगले किंवा वाईट परिणाम करत असतात त्यांचा सुटा-सुटा विचार करताच येत नाही. कोणाचंही व्यक्तिगत जीवन हे पूर्णांशान व्यक्तिगत नसतच. कौटुंबिक स्थिती , सामाजिक स्थिती , राष्ट्राची पर्यावरण स्थिती ह्यांचा परिणाम व्यक्ती वर होतच  असतो.ही स्थिती जर वाईट असेल तर कोणाचंही व्यक्तिगत जीवन सुखा-समाधानाचं असूच शकणार नाही. त्यामुळे आपल्या जीवनाला सुयोग्य आकार देताना अन्य सर्व स्तरांवर सुस्थिती सुनिश्चित करणं हि आपलीच जबाबदारी ठरते. म्हटले तर हा व्यापक स्वार्थच आहे; पण हरकत नाही ; त्या स्वार्थापोटी सर्व स्तरांवर सुस्थिती निर्माण होत असेल तर ती भालीच गोष्ट आहे.त्या स्वार्थातून परम-अर्थ आपोआपच साधला जाणार आहे.
‘गतिमान संतुलन’ 
कुडावळे ४१५ ७१२
ता, दापोली  - जि. रत्नागिरी
संपादक  - दिलीप कुलकर्णी

    

Thursday 12 January 2012

स्वामी विवेकानंद

आज १२ जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती. राष्ट्रीय युवा दिन.            शाळेत असतानाचे दिवस आठवतात सहावी, सातवी पासून स्वामी विवेकानंद अणि छत्रपति शिवाजी महाराज ह्यानी दैवताची जागा घेतली ती आजतागायत. आज शोधतो काय भावले  असेल स्वामीजीचं . धर्मं परिषदेतील बंधू आणि भगिनी हे संबोधन, त्यांची चिकित्सक बुध्दी, गुरु  ही तपासून   पहावा ही वृती, आपण देव पाहीला  आहे का  असा प्रश्न  विचारणारे , तरुणाना गीताभ्यासा पेक्षा फुटबॉल  खेळा  असे सांगणारे.  भारताला तुम्ह्च्या पासून धर्मं शिक्षण नव्हे तर विज्ञान   हवे असे मिशन-याना  सांगणारे.  स्वमिजीची अशी अनेक आवडणारी   रुपे.  स्वमिजीची तरुणावर फार श्रद्धा होती.  तरुणच या  देशाला गतवैभव  मीळवून देतील असा विश्वास होता.

स्वामीजीचा जीवनपट पाहीला तर  कळते की उणेपुरे ३९ वर्षाच्या  आयुष्यात कितीतरी   पिढयाचं काम करून ठेवल आहे. १२ जानेवारी १८६३  साली   स्वामीजीचा   जन्म कलकत्ता येथे   श्री विश्वनाथ दत्त  व् भुवनेश्वरी   देवी  कड़े   झाला. त्याचे मुळ नाव नरेद्ननाथ  दत्त. १८८१ च्या नोव्हेंबर मधे कधीतरी त्यांची श्री रामकृष्ण परमहंसाशी प्रथम भेट झाली. नरेंद्रला  सहा वर्षे गुरूंचा सहवास लाभला. १६ अगस्त १८८६ ला ठाकुरानी इहलोकाचा प्रवास संपवला.पुढील दोन वर्षे स्वामीजीनी संपूर्ण भारतभ्रमण करून भारताची त्यावेळेची स्थिति   व प्रश्न जाणून घेतले. ह्या प्रवासात त्यांचा मुक्काम कधी राजमहाली  तर कधी झोपडीत असे. २४ डिसेंबर १८९२ ला  त्यानी   कन्याकुमारीच्या समुद्रातील खडकावर ध्यान करत असताना शिकागोच्या धर्मपरिषदेत  जाण्याचा  मार्ग सापडला.


शिकागो धर्मपरिषदेत स्वामीजी
मार्ग सोप्पा नव्हता.दृढ निश्चय ,आत्मविश्वास  अथ  परिश्रमाच्या   बळा वर  अनेक डथळे पार  करुन  ११   सप्टेंबर  १८९३ रोजी स्वामीजी भाषाणा साठी उभे राहिले तेव्हा त्याना कोणच ओळखत नव्हते.  पहील्या वाक्याने त्यानी जगाला जिंकले आणि वेदान्ताची व् हिन्दू धर्माची ध्वजा फडकवली. पुढील दोन तीन वर्षे स्वामीजी अमेरिका,यूरोप व् इंग्लैंड मधें  वेदांताचा  व् हिन्दू  धर्माचा प्रसार करत होते. १८९७ साली त्यानी रामकृष्ण मिशन व् मठ स्थापन केले.दरिद्रिनारायणच्या उत्थानासाठी अथक प्रयत्न केले.

तरुणाना मार्ग दखाविताना सांगितले


  • तरुणानो निर्भय बना !  उठा , जागे  व्ह़ा , ध्येय साध्य होई पर्यंत स्वस्थ बसू नका.


  • जुना धर्म सांगतो ,ज्याचा देवावर विश्वास नाही तो  नास्तिक , आधुनिक धर्म  सांगतो , ज्याचा  तेहतीस कोटि देवावर विश्वास असेल आणि स्वत; वर विश्वास नसेल तर तो नास्तिक !


  •  मनुष्यजातीचं अंतिम ध्येय आहे ज्ञानप्राप्ती.  हे ज्ञान आपल्यातच अन्तर्निहित आहे. कोणतेच ज्ञान बाहेरून येत नाही ते आपल्या आताच आहे. आपल्या स्वत: चा आत्मा हा अनंत ज्ञानचं भंडार आहे.




  • सामर्थ्य म्हणजे जीवन, कमजोरी म्हणजे मृत्यु. जे तुम्हाला शरीरिक , बौध्दिक, अध्यात्मिक कोणत्याही प्रकारे कमजोर बनवत असेल अश्या प्रत्येक गोष्टीला विषासमान समजुन फेकून द्या. अशी गोष्टं सत्य असू शकत नाही. सत्य माणसाला सामर्थ्य प्रदान करणारं असतं. सत्य पवित्र असतं.



  • कोणत्याही   व्यक्तीला व राष्ट्राला थोर होण्यासाठी पुढील तीन गोष्टीची आवश्यकता आहे.


    • चांगुलपणाच्या शक्तीवर अढळ  विश्वास.
    • मत्सराचा आणि संशयी स्वभावाचा आभाव.
    • जे चांगले बनण्याचा व चांगले करण्याचा प्रयत्न करीत आहेत तय सर्वांना सर्वतोपरी साह्य करणे.

  • भरतात सर्व संघटित प्रयत्न एक दोषा मुळे  असफल होतात तो दोष हा की काम करण्याची काटेकोर व कड़क पध्दती आपण शिकलो नाही. काम म्हणजे काम, मग तेथे मैत्री किंवा भीड़ उपयोगाची नाही. दूसरी गोष्ट म्हणजे अदम्य उत्साह. कोणतेही काम उपासना म्हणून करा.

    • Take one idea, make that one idea your life, think of it, dream of it, live on that idea. Let the brain, muscles, nerves every part of your body be full of that Idea and leave every other idea alone. This is the way to successजीवनाचं  ध्येय ठरवा, त्या विषयी विचार करा. ध्येयपुर्तिचे स्वप्न बघा. ते ध्येय जगा. तुमची बुध्दी, स्नायु शरीराचा  कणनकण ध्येयाने भारा. हाच यशाचा मार्ग आहे.

  • Neither money pays, nor name, nor fame, nor learning; it is Character that can cleave throgh adamntine walls of difficulties  कठीण समयी, पैसा, नाव,शिक्षण, प्रसिध्दी नव्हे तर चारित्र्यच सोडवणूक करू  शकेल.



  • तुमचं आनंदी उत्साही असणं हे तुमच्या धार्मिक (अध्यात्मिक) असण्याचं पाहिले लक्षण आहे.
  •  विवेकवाणीतील हे काही मोती, अभ्यासकासाठी समग्र विवेकानंद साहित्य उपलब्ध. चला पहिल्या लक्षणानी सुरुवात करुया.

    स्वामी विवेकानंद शिलास्मारक कन्याकुमारी








    Tuesday 3 January 2012

    इच्छाशक्ती / निश्चयाचे बळ

    प्रखर  इच्चशक्ति ने असाध्य ते साध्य    
      इच्छाशक्ती  ही माणसाची  प्रचंड आतंरिक शक्ती  आहे. इचाशक्तीच्या जोरावर माणूस अश्यक्य ते श्यक्य करून दाखवतो. निवडलेली कृती ठराविक पध्दतीने करण्यासाठी पुष्टि व मदत करणारे सृजनात्मक सकारात्मक बळ म्हणजे इच्छाशक्ती . योग्य कृती करण्यासाठी  व अयोग्य ते टाळण्या  साठी साह्य होणारी शक्ती.
     
    वेगळ्या शब्दात  दृढ़ निश्चय म्हणजे इच्छाशक्ती .
     
    इच्छाशक्ति सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते. सकारात्मक इच्छाशक्ती  चे उदहारण  वयाच्या पंधराव्या वर्षी रोहिडेश्वराच्या किल्ल्या वर सवंगडया बरोबर स्वराजाची शपथ  घेऊन  तडीस नेणारे छत्रपति शिवाजी महाराज. 
                                निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। 
                                     अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।
    नकारात्मक उदहारण जगाला दुस-या महायुध्दात लोटणा-या  व ज्युचे छळ  करणा-या अडोफ़ हिटलर चे.
    आपण आपली इच्छाशक्ती  वाढवू शकतो, चांगले वळण लावू शकतो. स्वामी  विवेकानंदानी एक ठिकाणी म्हटलय की " आपण आपले भाग्याविधाते आहोत, उठा! ध्येय साध्य करण्याचे सामर्थ्य  आपल्या ठायी आहे" . छोटे छोटे नियम पाळून आपण  आपली इच्छाशक्ति वाढवू शकतो. उदाहरणार्थ पहाटे  लवकर उठून अभ्यासाचा  नियम करून  टंगळमंगळ न करता पाळणे. धुम्रपान सारख्या वाईट  सवयीना इच्छाशक्तीनी मुरड घालता येते.  योग्य अयोग्याची जाण आपल्याला उपजतच असते. छोट्या छोट्या कृतीने योग्य ते पाळणे अयोग्य ते टाळणे  ह्यातून इच्छाशक्ती   विकसीत होत असते. पुढची पायरी सार - असार , वास्तव - अवास्तव , योग्य - अयोग्य , तर्कसंगत - भावनिकता  याचा तुलनात्मक अभ्यास करून विवेक करणे. हे  साध्य करण्यासाठी मेहनतीची तयारी असायला हवी.  भूतकाळाची खंत व भविष्याची चिंता  ह्या दोन गोष्टी  आपल्याला  मागे घेचत असतात. भूतकाळात   आपण चूका केलेल्या असतात त्याविषयी खंत न बाळगता त्या चूका पासून शिकून वर्तमानात त्या टाळणे व भविष्याची अवास्तव काळजी न करणे. यानी आपले मनोबल वाढत असते.
    इच्छाशक्ती  व एकाग्रता हातात हात घालून चालत असतात. उद्दिष्टा वर पूर्ण लक्ष केंद्रित करून, ध्येय  साध्य करता येईल.


    (आधार - विल पॉवर एंड इट्स डेवेलोपमेंट - स्वामी बुध्दानंद )