Thursday 31 May 2012

आरोग्यं धनसंपदा


संजीवनी परिवार तर्फे महिलासाठी  आरोग्यं धनसंपदा या कार्यक्रमाचे आयोजन आप्पा फुलारे हॉल येथे करण्यात आले होते. मार्गदर्शक म्हणून डॉ. दीपक देसाई व  डॉ. उषा देसाई  उपस्थित होते.  डॉ. दीपक देसाई यांनी जन्माला  आलेल्या बाळाच्या काळजी पासून ते स्त्रीयांच्या  जीवनातील वेगवेगळ्या  स्थित्यंतरं  घ्यावयाची काळजी , वयात येणा-या मुलींचा आहार त्यांच्यात निर्माण करावयाची सहनशीलता  या बाबत मार्गदर्शन केले.  डॉ. उषा देसाई  यांनी स्रीयांच्या  प्राथमिक आजाराविषयी माहिती देताना हिमोग्लोबिन व कॅल्शियम संतुलन याचे महत्व समजावून सांगितले. व त्या साठी घ्यावयाचा आहार या विषयी माहिती दिली. मुलींच्या शारीरिक बदला बरोबरच मानसिक अवस्था कुटुंबीयांनी जाणून काळजी घ्यायला  हवी. 

डॉ. दीपक देसाई 27 /05/2012 

उपस्थिती चांगली होती, बराच पल्ला गाठायचा  आहे.

Tuesday 8 May 2012

संजीवनी परिवार- वार्षिक उपक्रमाचा अहवाल

संजीवनी परिवार संस्था 
   २०११- १२ चा वार्षिक  अहवाल
नमस्कार
२०११-१२ च्या  उपक्रमाचा  अहवाल सादर करताना विशेष आनंद होत आहे. 

व्याख्यानमाला २०११ : दिनांक २३ एप्रिल रोजी श्री संदीप वासलेकरांच    "एका दिशेचा शोध"  या विषयावर व्याख्यान झाले. व्याख्यानास चांगली उपस्थिती होती. फादर दिब्रिटो, वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम नागरिक, नगरसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी श्री  बबनशेठ नाईक होते. कमलाकर पाटील यांनी प्रास्ताविक व  पाहूण्याची  ओळख  करून  दिली. व्याख्यानाच्या  व्यवस्थे विषयी श्री वासलेकर आपल्या संदेशात म्हणतात " अतिशय  उत्कृष्ठ  नियोजन केल्याबद्दल अभिनंदन व संजीवनी साठी शुभेच्छा " .

दिनांक २४ एप्रिल रोजी श्री चंद्रशेखर टिळक यांच आर्थिक घोटाळे आपली अर्थव्यवस्था या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी श्री सुरेश जोशी होते , विलास नाईक यांनी पाहुण्याची ओळख व प्रास्ताविक केले.

दिनांक १ मे रोजी श्री संजय भास्कर जोशी यांनी मी आणि माझा देव हे पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी श्री वसंत देशमुख होते, पाहुण्याची ओळख  व प्रास्ताविक हेमंत नाईक यांनी केले. व्याख्यानमालेस  मिळणारा प्रतिसाद संजीवनीची जबाबदारी  वाढवणारा  आहे. चला  तर  कंबर कसू या!!! 

वृक्षांचा वाढदिवस : दिनांक ३,  जुलैचा पहिला रविवार  म्हणजे आपल्या मित्रांचा वाढदिवस. त्यासाठी श्री सायनेकर सर , माई उपस्थित होत्त्या. श्रीमती वीणा गवाणकर यांनी सहारा वाळवंट येथे वृक्ष संवर्धन करणा-या   रुपर्ड बेकर यांची कथा सांगितली. माणसाचं आयुष्य झाडं कशी बदलतात  हे विषद केले. दुपारी सहभोजना नंतर करमणूक व गायनाचा कार्यक्रम झाला. अरविंद पाटील व कुटुंबीय यांचा विशेष सहभाग होता तर श्री सायनेकर सरांच्या  गायनां मुळे या  कार्यक्रमाने एक वेगळी उंची गाठली.

विद्यार्थी    मेळावा : दर वर्षी आपले विद्यार्थी  दहावी ,बारावीच्या परीक्षेत चढत्या क्रमाने यश संपादित आहेत. त्यांना स्पर्धापरीक्षा , UPSC, MPSC या परीक्षे विषयी जाणीव निर्माण व्हावी या दृष्टीने २६ सप्टेम्बर  २०११ रोजी आप्पा फुलारे हॉल येथे दहावी पुढील विद्यार्थ्याचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वर्षी UPSC त यश मिळवणारे श्री स्वप्नील   बावकर यांनी मार्गदर्शन केले.
दुसरा  विध्यार्थी मेळावा ४ डिसेंबर २०११ रोजी विद्यामंदिर नाळे  येथे झाला. श्री संदीपकुमार साळुंखे,  सहाय्यक   आयकर  उपायुक्त, पुणे, दहावीत बोर्डात प्रथम क्रमांक , UPSC, MPSC या  दोन्ही  स्पर्धा परीक्षेत यश मिळवणा-या  साळुखेसरांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना  मोठ्या भावाच्या भूमिकेतून  सागितले  कि " अभ्यासाच एक शास्र झाले पाहिजे. अभ्यासाचे  वेळापत्रक, वाचनाचं  कौशल्य, लिहण्याची कला , स्मरण करण्याच शास्र, रिविजन कशी करावी अश्या पद्धति आपण विकसित  करायला हव्यात".    अध्यक्षस्थानी श्री विश्वनाथ नाईक  होते.  कार्यक्रमा  विषयी विद्यार्थी व पालकांचा  उत्तम फीडबॅक मिळाला.

गुंतवणुकीची गुरुकिल्ली : व्यवसायिक शिक्षणाप्रमाणे आर्थिक साक्षरता महत्वाची या दृष्टीने गुंतवणुकीची गुरुकिल्ली हा परिसंवाद ४ मार्च ला अप्पा फुलारे हॉल येथे  आयोजित  केला होता. अर्थ क्षेत्रातील मान्यवर  श्री चंद्रशेखर टिळक , श्री निखील नाईकश्री संजीव गोखले  व श्री सुनील वालावलकर सहभागी झाले होते. आपणा सर्वांचा  उत्तम प्रतिसाद लाभला.

आरोग्य शिबीर: गुढी पाडव्याच्या दिवसी डॉ स्वाती नाईक व डॉ प्रतिमा पाटील यांच्या पुढाकाराने जागमाता मंदिर येथे कॅल्शियम  व हिमोग्लोबिन तपासणीचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. १०० लोकांनी या शिबिराचा फायदा घेतला. 

अहवाल सालात  चार गरजू रुग्णांना मेडिकल फंडातून आर्थिक सहकार्य करता आले.

आपल्या आप्तस्वकीयांच्या स्मृतीप्रीत्यर्थ तसेच लग्न मुंजी ,वाढदिवस , लग्नाची वर्षगाठ , गृहप्रवेश या व इत्यादी समारंभा वेळी काही  मंडळी मेडिकल फंडास मदत करत असतात. आपल्या आनंदात  इतरांना सहभागी करून घेण्याचा  हा  छान मार्ग या मंडळीने शोधून अमंलात आणला आहे. 

 श्री   यज्ञेश्वर  नाईक, (कोतवाल नाना) बोळींज, यांनी  आपल्या ८० व्या वाढदिवसा निमित्य  संजीवनी मेडीकल फंडाला रु. ८१,०००/- ची  भरगोस  देणगी दिली. संजीवनी परिवारा तर्फे  कृतज्ञता व्यक्त करतो.   श्री अरविंद  पाटील,  उमराळे,   यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ   संजीवनी मेडीकल फंडा रु.  १०,०००/- - ची  देणगी दिली. परीवारा तर्फे धन्यवाद.

आपण, मेडीकल फंडा  योगदान करून इतरांनाही आपल्या आनंदात  सहभागी  करून घ्यावे ही विनंती.

आपल्या सर्वांच्या सक्रीय सहभागांनी वरील उपक्रम मूळ धरत आहेत. चला तर हे उपक्रम अधिक व्यापकसर्वसमावेशक करू या !!!  

धन्यवाद !!!
संजीवनी परिवार