Wednesday 11 July 2012

झाडांचा वाढदिवस

 
गत सातवर्षे, जुलैच्या पहिल्या आठवड्यात संजीवनी वृक्षांचा वाढदिवस साजरा करते आहे. प्रतिकूल परिस्थितीत झाडं आपला वर्धिष्णू गुण जोपासत आहेत. झाडांची  उपयुक्तता या दृष्टीने त्यांच्या कडे  न पाहता,  झाडं  आपले  खरेखुरे मित्र, मार्गदर्शक  आहेत या दृष्टीकोनातून संजीवनी परिवार   झाडांचा  वाढदिवस साजरा करते, आणि  यामुळेच  या कार्यक्रमात सहभागी होतो असे प्रतीपातन श्री सायनेकर सरांनी केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण शास्रज्ञ  श्री प्रकाश जोशी उपस्थित होते. त्यांनी अंटार्टिक मोहिमेतील व समुद्र किनारा सफरीतील अनुभव कथन केले. त्यांतील  विद्वान आणि खेडूत यांचा किस्सा दाद घेऊन गेला.विद्वता आणि आंतरिक शहाणपणा  याच हा किस्सा .   परीभ्रमणात असताना एकदा रेल्वे प्रवासात एक विद्वान गृहस्थ भेटले. त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून विद्वता दिसून येत होती, ते पर्यावरण , निसर्ग , वातावरण  इत्यादी विषया वर बोलत होते. पुढच्या स्टेशनात एक खेडूत गाडीत चढले. इठ्ठल इठ्ठल म्हणत एका ठिकाणी बसकण मारली. विद्वान गृहस्थ त्याला म्हणाले इकडे बसा आणि इठ्ठल इठ्ठल काय लावलं आहे. विठ्ठल म्हणा.खेडूत म्हणाला मी कुठे काय बोलतोय, तो बोलवून घेतो. विद्वानांनी विचारले काय उधोगधंदा करताय, खेडूत म्हणाला मी कुठे काय करतोय, तो माझ्याकडून शेती करवून घेतो. थोड्या वेळानी विद्वानांनी सिगारेट शिलगावली, झुरके घेत घेत थोटूक टाकण्यासाठी दरवाज्याकडे जाऊ लागले इतक्यात खेडूताने त्याच्या कडे थोटूक मागितले. विद्वान म्हटले थोटूक कश्याला मी सिगारेट देतो कि, खेडूत म्हटला आम्ही माळकरी विडी, सिगारेट ओढत नाही. त्यांनी थोटूक घेतले विझवून टाकले. खाली गवत , माळरान आहेती , जीव जंतू आहेत त्याची काळजी घ्यायला हवी , इठ्ठल इठ्ठल.






 औदुंबर


 औदुंबर
 काही  झाडांची  वाढ चांगली आहे.  मंदिरा समोरील औदुंबरच्या रोपाचे रुपांतर वृक्षात झाले आहे.   बालकवींच्या शब्दात  बदल करून  म्हणता येईल  


 "देवळाच्या द्वारी उभा असला औदुंबर."






 


आश्रमा समोर खडा पहारा देणारी  बकुळफुलाची झाडे

वीस फुट उंच देवदार व गुलमोहर







गुणकारी कडूनिंब


सिल्वर ओक


Thursday 5 July 2012

अवकाश

"मनातलं अवकाश "  हा  सुनिता देशपांडे यांचा लेखसंग्रह. २००४ ते २००६ दरम्यान विविध वर्तमान पत्र तसेच दिवाळी अंकात प्रसिध्द झालेल्या लेखाचं पुस्तक. नावा प्रमाणेच मनाच्या अवकाश्यात स्फुरलेल्या वेगवेगळ्या विषयावरच चिंतन, मनात उभे राहिलेल्या प्रश्नाचं, उमटलेल्या व्याख्यांचं हे पुस्तक आपल्याला अंतर्मुख करतं व आपले अवकाश विस्तारतं.      मनातल्या अवकाशातील काही  उल्का , तारे , चांदण्या.
मनात येणारे चांगले विचार जर आपण कधी अंमलात आणणारच नसलो तर ते विचार म्हणजे केवळ जागृतीतील स्वप्नं च नव्हेत का? ते विचार नव्हेतच  त्या कल्पनाच
अहंपणा हा केव्हाही त्याज्यच असतो पण स्वाभिमान म्हणजे अहंपणा नव्हे. स्वाभिमान तेजस्वी दिसतो आनंदी असतो. अहंपणा माणसाला कुरूप करतो " अहंकाराचा वारा न लागो पाडसा, माझ्या विष्णुदासा नामदेवा"
आत्मविश्वास आणि धैर्य याचा सारखे पाठीराखे दुसरे कुणीही नाही. धैर्य म्हणजे आत्मविश्वासातून येणारी निर्भयता. खरंखुरं मनोबल म्हणजे जाणत्या माणसाची शहाणी मनशक्ती.
सुखाने न माजणारं आणि दु;खाने न खचणारं मन लाभणं हि निसर्गाची देणगी आहे.
स्वप्न रहित गाढ झोप म्हणजे श्वासोच्छ्वास करणारा मृतदेह आणि स्वप्नरंजित जागृत प्रकृती म्हणजे धट्टाकट्टा जिवंत माणूस. माणसाला झोपेतही आणि जागुतीतही स्वप्नं  हि पडत राहायला हवीत स्वप्न हे जीवसृष्टीला लाभलेले मोठं देखणं वरदान आहे.
निरुद्देश असं अगदी एकटच भटकंतीला गेलं तर बालकवीची आनंदी आनंदी गडे आठवेल कि आरती प्रभूचा " कुणासाठी कुणासाठी, कशासाठी कुठवर " हा प्रश्न कानी पडेल?
योद्धयाची वाचलेली व्याख्या सागतात " जो लढताना प्रेमिकाच्या तन्मयतेने लढतो आणि प्रेम करताना शुराच्या सर्वस्व समर्पणाचा आनंद मिळवतो".
"पंचमहाभूतातून जन्माला येऊन पंचमहाभूतातच विलीन होणे याला जीवन ऐसे नाव ".
आयुष्याचा फुगा कधी फुटेल हे काही कुणाला कळू शकत नाही. पण सुंदर सुंदर स्वप्न पाहत जगायला काय हरकत आहे?
क्षितीज हा निसर्गाचा भाग म्हणायचा , आपल्या दृष्टीच्या  व्याप्तीची मर्यादा म्हणायची कि आपल्या कल्पनाशक्तीचिच मर्यादा म्हणायची? प्रत्येकाच्या अश्या मर्यादा म्हणजेच त्याचं त्याचं क्षितीज ना?
मी कोण? हा प्रश्न विचारी प्रौढ माणसाला कधी ना कधी पडतोच मी म्हणजे रात्रीचा प्रकाश, पोटातून वाहणारा दिवा कि त्या दिव्याच्या वाहनातून फिरणारा प्रकाश?
आपलं खुजेपण ओळखणं आणि विश्वव्यापारापुढे नतमस्तक होणं हेच सुसंस्कृत माणसाचं लक्षण नव्हे का?
आस्तिक आणि नास्तिक हे दोघेही देवाला होकार आणि नकार देऊन मुळात देव हि कल्पना मान्यच करत असतात ना?
आपल्याला तापदायक अश्या गोष्टी दुस-या कुणामध्ये असल्याकी त्यांना आपण त्यांचे दुर्गुण मानतो. खलनायक, चोर आपल्याला दुर्गुणी वाटतात. प्रण्यानाही हिस्र प्राणी, वनस्पतीनाही विषारी किंवा काटेरी वनस्पती दुर्गुणी वाटत असतील का? कोण जाणे! पण ज्या जीवात असे दुर्गुण उपजतच असतात त्यांना तो त्याची थोरवी किंवा खासियत वाटत असणार, विंचवाला त्याच्या नांगीचा अभिमानच असणार.
भवतालात मनाने विरघळून जाता यायला हवं. एखाद्या कवितेच्या भिंगातून पाहण्याची सवय व्हायला व्यसन लागायला हवं. खंर तर या बाबतीत वेडं व्हायला हवं त्या त्या वेळी असं वेडं होणं हाच शहाणपणा नव्हे का?
धरतीला वटवृक्ष जड आणि गवताचं पातं हलकं वाटत असेल का? आपल्या स्मृतीची गुहा कुठे असेल? मेंदूतच कुठेतरी असावी आपल्या मनासारखी.
प्रत्येक माणूस हे एक झाकलेल माणिक असू शकतं इतरांना त्याच तेज दिसो न दिसो त्या व्यक्तीला स्वत;ला ते जाणवत असतच.


असं हे पुस्तक हाती आले १२ जूनला. पहिल्या लेखातच सुनिताबाईनी १२ जुने विषयी एक योगायोग दिला आहे कि , आमच्या लग्नाची तारीख १२ जून होती आणि त्यानंतर चौपन्न वर्षांनी १२ जूनलाच भाईचा मृत्यू झाला. 
 
 
 
 
 
                                          पुण्यातिथीच्या दिवसी पुण्यस्मरण करण्याचा योग जुळला.