Wednesday 12 September 2012

तुम्ही अद्वितीय आहात.

शरीर , मन भावना, आत्मा यांचा परिपूर्ण विकास साधणे, हे जीवनाचे उद्दिष्ट असायला हवे.
आपण जेव्हा बल्ब पाहतो तेव्हा आपणाला  थोमस  अल्वा एडिसन यांच्या बल्ब च्या एकमेव शोधाची आठवण होते. जेव्हा आपल्या घरावरून जाणा-या विमानाचा आवाज ऐकतो तेव्हा आपणास आठवतात ते राईटबंधू, ज्यांनी दाखवून दिले कि माणूस हवेत उडू शकतो.टेलिफोनची बेल आपणास अलेक्सझांडर  ग्रहम बेलची याद करून देते. समुद्र सफारीचा इतरजण आनंद घेत असताना एकजण विचार करत होता कि जिथे समुद्र आणि आकाश मिळते तिथे आकाश निळे का दिसतंय (निळे आकाश) त्यांचा संशोधनानी  प्रकाशा चे  पसरणे  चा शोध लागला ते नोबल पारितोषक विजेते सर सी. व्ही. रामन, एका स्रीला दोनदा नोबेल मिळाले. एक रेडियम च्या शोधासाठी, दुसरे रसायनशास्रातील संशोधनासाठी. रेडियेशन मुळे हजारो   कॅन्सर  रुग्णावर उपचार शक्य झाले तसेच शेती उत्पन्न वाढवण्यासाठी मदत झाली. आता रेडियम चा उपयोग विद्युत निर्मिती व शास्रास्रासाठी केला जातो. आपल्या संशोधनाने आरोग्याशास्रात व नुक्लीआर   विश्वात बदल घडवून आणणारी स्री म्हणजे मादाम मेरी क्युरी.ह्या आणि ह्यांच्या सारख्या  असंख्य  माणसांनी न रुळलेल्या वाटेवरून चालण्याचे धाडस केले, प्रयत्नाच्या  पराकाष्ठे तून मानवते साठी केलेल्या योगदाना मुळे  हि मंडळी  आपणसाठी यादगार झाली .
खरा प्रश्न आहे तुम्हाला खरेच अद्वितीय व्हायचे आहे काय?
मी आज पर्यंत खूप तरुण भेटलो, त्यांच्याशी संवाद साधला. संवादातून जाणवले त्यातील प्रत्येकाचा अद्वितीय (आपल्या सारखे आपणच) होण्याकडे कल दिसला. परंतु भोवतालचं जग तुम्हाला इतर सारखे बनवतंय. तुम्हाला ठामपणे ठरवायचे आहे कि गर्दीतील एक व्हायचं आहे कि तुम्हाच्या सारखे तुम्हीच असं अद्वितीय व्हायचे आहे.
तुमचा वेगळेपणा , एकमेकत्व जोपासायचे असेल तर तुम्हाला १९०५ मध्ये अलेक्सझांडर  ग्रहम बेलनी सांगितल्या  प्रमाणे कृती करावी लागेल.
 " सगळे जण जो मार्ग चोखाळतात त्या मार्गांनी कायमचे चालू नका कधी कधी मळलेली वाट सोडा आणि नवीन मार्ग, फारसा न चाललेला मार्ग धरा. . तुम्हाला   कधीही न पाहिलेलं जग दिसेल. कितीही छोटीसी गोष्ट असू दे पण दुर्लक्ष करू नका. त्याचा पाठपुरावा करा. त्याच्या सर्व शक्यता पडताळा. एक शोध दुस-याला प्रेरणा देईल.  तुम्हाला कळायच्या आधी तुम्ही अमूल्य असं  काही मिळवलेलं असेल."


तुम्ही अमृताचे पुत्र आहात, सामर्थ्य घेऊन आला आहात
श्रद्धा आणि चांगुलपणा तुम्हाला उपजतच लाभली आहे
तुम्हाला भविष्याचे पंख लाभले आहेत.
सरपाटण्यासाठी नव्हे तर भरारी घेण्यासाठी तुम्हचा जन्म  आहे. 
आणि ठरवा 
तुम्ही  पूर्ण क्षमतेने  उंच भरारी घेणार आहात.

हे पंख आपणास शिक्षणातून  प्राप्त  होतात व अंर्तमनात  असलेला ध्यास आपल्याला ध्येयाप्रत घेऊन जातो.
उत्कृष्टतेची संस्कृती
उत्कृष्टता अपघाताने साधता येत नाही. ती एक सततची प्रक्रिया आहे. प्रत्येक वेळी थोडी थोडी सुधारणा करत जाणे. आपल्या स्वप्नध्येयावर  लक्ष केंद्रित करणे. ते साध्य करण्यासाठी छोटे मोठे धोके स्वीकारणे. अपयशाने खचून न जाणे. पूर्ण क्षमतेने आपल्या कामात झोकून देणे व काम करत असताना कामगिरी उंचावत नेणे. स्पर्धा दुस-याशी नव्हे तर स्वत:शीच  यालाच उत्कृष्टतेची संस्कृती म्हणतात.
इप्सित प्राप्त करण्याच्या पायरी :  आपल्याला हवं ते कसे प्राप्त करता येईल? अद्वितीय व्यक्तिमत्व बनविण्यासाठी काय हवं.
  • उद्दिष्ट हवे- जीवनाला ध्येय असायला पाहिजे.
  •  सतत अभ्यास - अभ्यासू वृत्ती
  •  मेहनत, कष्ट करायची तयारी
  •  अडथळ्यावर मात  करण्याची चिकाटी व उद्दिष्ट साकार करण्याची वृत्ती.
ह्या चार गोष्टी तुम्ही आत्मसात केल्यास, तुम्ही जे ठरवाल ते साकार करू शकाल.
 ज्ञान = सर्जकता (creativity) + नितीमत्ता + धैर्य
  
सर्जकता  : शिक्षणातून सर्जनशीलता विकसित होते, सर्जनशीलता विचारला चालना देते, विचार प्रक्रियेतून ज्ञानाचा उगम होतो. आणि ज्ञान तुम्हाला मोठं,व्यापक करत असते.
नितीमत्ता : आपल्या हृदयात नितीमत्ता,नैतिकता, सज्जनपणा कसा जोपासता येईल? आपले आई, वडील, घरातील संस्कार  व प्राथमिक शिक्षक याद्वारे नितीमत्ता आपल्याठायी वसते.
धैर्य         : ज्ञान प्राप्ती साठी धैर्य, धाडस या गुणांचे फार महत्व आहे. वेगळा विचार करण्याचे धैर्य ,न रुळलेली, वेगळी वाट चालण्याचे धैर्य, नाविन्य शोधण्याचे धाडस, अशक्यतेला गवसणी घालण्याचा धीटपणा, अडथळ्याशी   संघर्ष करून यश मिळवण्याचा बेडरपणा.
  
व्यक्तीच्या , कुटुंबाच्या , देशाच्या उत्कर्षासाठी सर्जनशील, नीतीयुक्त व धैर्यशील ज्ञान आवश्यक आहे.
आत्मविश्वास एक वेगळे रसायन  आहे. स्वत: वरील विश्वास कसा वाढेल या कडे लक्ष द्यायला हवे. चांगल्या शिक्षकाचा सहवास विध्यार्थ्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करत असतो. यश मिळवण्या साठी  " मी हे करू शकतो " हा विश्वास निर्माण होणे महत्वाचे आहे.
शास्रज्ञाच्या  शब्दकोशात अशक्य हा शब्द नसतो कारण आज जे अशक्य आहे ते उद्या शक्य होईल असा त्यांचा विश्वास असतो.
काळाचे भान   
वेळेचे महत्व जाणा  आपल्याला माहित आहे कि पृथ्वी स्वत: भोवती फिरण्यासाठी २४ तास किंवा १४४० मिनिट्स किंवा ८६४०० सेकंद्स घेते. पृथ्वी सूर्य भोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी एक वर्ष घेते आणि आपले वय एक वर्षांनी वाढतं, सेकंद, मिनिट तास, दिवस महिने वर्ष भरभर उडून  जातात. काळा वर  आपले काही बंधन नाही परंतु वेळेचा सदुपयोग करणे आपल्या हातात असते. 
-
( आदरणीय  अब्दुल कलाम यांच्या  You are Unique  या पुस्तकाच्या प्रस्तावनेचे  स्वैर भाषांतर, न्यून ते  माझे)