Friday 28 December 2012

रतन टाटा सर





 आज २८ डिसेंबर २०१२ टाटा ग्रुप चे अध्यक्ष सर रतन टाटा  यांचा ७५ वा वाढदिवस. त्यांनीच केलेल्या नियमा प्रमाणे आज ते निवृत्त होत आहेत. टाटा उद्योग विश्वाचे वारस  म्हणून
श्री सायरस मेस्त्री  कडे सूत्र सोपवून.




दादाभाई नौरोजी यांना आपण भारतीय स्वातंत्र्याचे पितामह मानतो तसेच जमशेटजी टाटा हे भारतीय उद्योजकतेचे जनक मानले जातात. स्वामी विवेकानंद  शिकागोला जाताना सर  जमशेट्जी   टाटा सहप्रवासी होते. स्वामीजींनी टाटाना सागितले कि नुसते तंत्रज्ञान आयात न करता आपल्याकडील मनुष्यबळ कसे विकसित होईल या कडे लक्ष द्यायला हवे व आपले मित्र  म्हैसूरच्या महाराजांना जमशेदजींना हवे असलेले साहाय्य करण्यास सांगितले. त्यातून प्रेरणा घेऊन  म्हैसूर येथे जमशेदजींनी यांनी  ‘भारतीय विज्ञान अनुसंधान संस्था’  (Research Institute of Science for India) स्थापन केली. असं पूर्व संचित लाभलेला, टाटा समूह हा राष्ट्रासाठी समृध्दी निर्माण करणारा उद्योग समूह आहे.

144 वर्षांची प्रदीर्घ  परंपरा असणाऱ्या या उद्योगसमुहाचे नेतृत्व असे होते, आहे..
1868-1904 : जमशेटजी टाटा 
1904-1932 : सर दोराबजी टाटा
1932-1938 :
सर नौरोजी साफलाटावाला
1938-1991 :
जे.आर.डी. टाटा 
1991-2012 : 
रतन टाटा
2012 ,   : सायरस मेस्त्री 

रतन टाटा ह्यांनी १९६२ साली अमेरिकेत कॉर्नेल विद्यापीठात स्थापत्यशास्त्रातील पदवी मिळवली. नवीन काहीतरी डिझाइन करायचे वेड त्यांना तेव्हापासूनच होते. आय.बी.एम.मध्ये नोकरी मिळत असूनही आजारी आजीसाठी रतन टाटा भारतात परतले. सुरवातीला टिस्को मध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरी केली ती अगदी थेट तेथील शॉप फ्लोअरवर! काही हजार कामगारांमधील एक कामगार बनून!  १९७१ साली टाटा समूहातील नेल्को कंपनीच्या कार्यकारी संचालक पदावर नेमणूक झाली. एकंदरीत वाईट परिस्थिती सुधारण्या पलीकडे होती. १९७७ मध्ये त्यांना एम्प्रेस मिलची जबाबदारी देण्यात आली. ह्या कापड गिरणीची अवस्थाही वाईट होती. कुप्रसिद्ध कापड उद्योगातील संपाने एम्प्रेस मिल हि बंद पडली. १९८१ साली टाटा इंडस्ट्रीज त्यांच्याकडे आली. टाटा इंडस्ट्रीजच्या माध्यमातून त्यांनी टाटा टेलिकॉम , केल्ट्रॉन , फायनान्स , हनीवेल , एलेक्सी अशा कंपन्यांची सुरुवात केली. १९८८ साली. सुमंत मुळगावकरांकडून त्यांनी  टेल्को ची सूत्रे घेतली. त्याच वेळी कामगाराचा मोठा संप झाला. कामगार नेते राजन नायर जोरात होते. रतन टाटांनी कामगारांना सागितले कि  तुम्ही माझ्या डोक्याला  गन  लावल  तर  तुम्ही चाप ओढू शकता किंवा गन खाली ठेवू शकता मी डोके हलवणार नाही. अश्या ठाम व मुत्सद्दीपणे त्यांनी संप मिटवला.
१९९१ साली त्यांनी टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतली. त्यावेळी जे आर डी च्या जुन्या सहका-या कडून त्यांना सहकार्य मिळाले नाही. काही ठिकाणी विरोध झाला. पुढे यातील काही मंडळी निवृत्त झाली. त्यांनी संपूर्ण समूहात सुसूत्रता आणली. लोगो पासून कंपनीच्या नावापर्यंत सुलभता आणली जसे टेल्को चे टाटा मोटार्स झाले.
जागतिक स्तरावरील हॉटेल, टेटली,कोरस ह्या कंपन्या टाटा समूहात आणल्या. टाटा समूह आंतरराष्ट्रिय स्तरावर नेला. १९९१ साली रतन टाटा समूहाचे अध्यक्ष झाले तेव्हा समूहाचे बाजारमूल्य ७९४३ हजार कोटी होते. आज ते ४,६२,००० हजार कोटी आहे. २१ वर्षात ५८ पटीने वाढले   यावरून त्यांच्या कामाचा झपाटा, प्रगतीचा वेग लक्षात येतो. उद्योगातील प्रगती, महसूल मधील वाढ या साठी टाटा उद्योग समूह ओळखला जात नाही. टाटा समूहाची ओळख आहे. राष्ट्रीय संपत्ती निर्माण करणारा समूह, टाटा  म्हणजे सामाजिक बांधिलकी.  २६/११ ला ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या कामगारांना , परिसरातील बळी पडलेल्या सगळ्यांना मदत केली. त्यांच्या घरी जाऊन रतन टाटांनी विचारपूस केली. टाटांनी आपल्या कार्यशैली तून जगभर आपल्या विषयी विश्वास निर्माण केला आहे. त्याचा अनुभव ब्रिटन मधील एक कंपनी घेताना आला. तेथील कामगारांनी मागणी केली कि आमची कंपनी टाटांनी घ्यावी. टाटा म्हणजे  विश्वासार्हता.
अशी मोठी परंपरा , इतिहास असणा-या टाटा समूहाचा वारसा श्री सायरस मेस्त्री कडे देताना  सर रतन टाटा सांगतात "'एखाद्याला आपल्या प्रभावाखाली ठेवणे मला योग्य वाटत नाही,'तुम्ही नेहमी 'स्वतःचे' असायला हवे. तुम्हाला स्वतःला काय वाटते ते नेहमी ऐका आणि तुम्हाला काय करायचे आहे ते ठरवा.'

आपल्या लाडक्या  कुत्र्यां बरोबर