Tuesday 30 April 2013

धर्माचं ढोग हीच अनैतिकता



 धर्माचं ढोग  हीच अनैतिकता - राजन खान 

 मी कुठल्याच धर्माचा नाही , देवाचं अस्तित्व नाकारणारा आहे. देव, धर्म आणि जात काल्पनिक आहे. असे  प्रतिपादन राजन खान यांनी  संजीवनी व्याख्यानमालेत " धर्म आणि नैतिकता" या विषया वर बोलताना केले. ते पुढे म्हणाले, आजपर्यत झालेला सर्व भ्रष्टाचार देव ,धर्म मानणा-या लोकांनीच केला आहे.  या देश्यातील 60% लोक गरीब आहेत. सर्व देव मानणारे आहेत तरी देव त्याचं भल्ल का करत नाही? गरीब अधिका अधिक गरीब होत चालले आहेत. भ्रष्टाचारी अधिका अधिक  श्रीमंत  होत  चालले  आहेत. आणि  देवबाप्पा काहीच  करायला  तयार  नाही . हि  या देशाची  वाईट  अवस्था  आहे.   या जगात एक हि मुसलमान खरा मुसलमान नाही, एक हि हिंदू खरा हिंदू नाही, एक हि ख्रिश्चन खरा ख्रिश्चन नाही. त्या त्या धर्माचे ढोंग करणारे फार आहेत. गर्वसे कहो म्हणणारे तेवढ्या पुरतेच त्या त्या धर्माचे आहेत.  धर्म व त्याचे आचरणाचे नियम इमानदारीने पाळले तर जग बरेचसे शांत होइल. प्रत्येक धर्म मुलभूत पणे एक शिकवण देतो, दुस-या माणसाला माणूस म्हणून वागव, किमंत दे.  धर्माचा गर्व मानणारे, सर्वच्या सर्व जण धर्माचे भोत आहेत. खरे धार्मिक नहित.   दोन पर्याय आहेत, एक धर्म सोडा व जे जगायचे आहे तसे जगा. किवा विनंती पूर्ण सागणे आहे कि जो धर्म आहे  तो तरी निट पाळा , इमानदारीत पाळा.  कुठलाच धर्म मरणाला पर्याय देऊ शकत नाही. मारण्या आधी जगणार का हा प्रश्न आहे.  मला वाटते बिन धर्माचं नैतिक जगता येते. नैतिकता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून दुस-या माणसाशी मायेने, आपुलकीने आणि माणसा सारखं वागणे म्हणजे नैतिकता.  पाळायचा असेल तर खरोखर धर्म पाळा, नाहीतर  धर्म सोडा. धर्माचं ढोग नाही करायचं हेच जास्ती अनैतिक आहे. .  आपला   धर्म  शोधा   त्याचा  अभ्यास करा व   खरोखरचा धर्म  पाळा.

Tuesday 23 April 2013

संजीवनी व्याख्यानमाला 2013

आपल्याला नवा भारत घडवायचा आहे ----- स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद म्हणतात आपल्याला नवा भारत घडवायचा आहे. आपले देव आता जुने झाले आहेत.  आपल्याला नवा देव ,नवे वेद आणि नवा धर्म  हवा आहे. असे  प्रतिपादन  डॉ दत्तप्रसाद दाभोलकर  यांनी  संजीवनी व्याख्यानमालेत पाहिलं पुष्प गुंफताताना केले. पुढे  म्हणाले  वयाच्या तिसाव्या वर्षी  स्वामी  विवेकानंद सांगतात कि माझा देश व त्याला झालेला रोग व त्यावरील  औषध   मला समजलेले  आहे. त्यासाठी नव्या रचनाचा स्वीकार करायला हवा. बुद्धदेव पासून राजा राममोहन राय पर्यंत सर्व समाज सुधारकांचे प्रयत्न फसले कारण त्यांनी धर्मावर आघात केला. आपल्याला धर्माचा आधार घेऊन धर्मातील अपप्रवृत्तीवर आघात करावा लागेल.





 माणसाने आयुष्यात यश कसं मिळवावे हे विवेकानंदाचं  आयुष्य आपणास सागते. सगळ्या प्रतिकूल परिस्थितून मार्ग काढून स्वामीजी सर्व धर्म परिषदेत विजय पताका फडकावतात. यश मिळवण्यासाठी  आयुष्यात चार गोष्टी येतात. तुम्ही नशीब मानत नाही परंतु नियती मानता म्हणजे Theory of Probability किंवा भगवत गीता ज्याला "दैवम चैवात्र पंचमम' म्हणते.  म्हणजेच   प्रयत्न, निष्ठा, निश्चय आणि भक्तीच्या सहाय्याने ध्येयप्राप्तीकडे मार्गक्रमणा करणे. दुसरी गोष्ट प्रचंड कष्ट करावे लागतात.  कष्टाला पर्याय नसतो. तिसरी गोष्ट तुमच्या विषयावर तुम्ह्ची विलक्षण पक्कड असावी लागते. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा स्व:ता वर प्रचंड विश्वास असावा लागतो, मी हे करीनच.