Friday 21 October 2016

हळूहळू मरतोय

 मरतोय  हळूहळू (Die  slowly) ही कविता  ब्राझीलच्या मार्था मेडीरॉस (Martha Medeiros) या कवियत्रींची. परंतु सोशल मेडिया वर ती नोबेल विजेते  पाब्लो नेरुदा ( Pablo Neruda )  यांच्या नावावर दिली जाते. 
पाब्लो नेरुदा फाऊंडेशन ने म्हटलंय की  चुकून ह्या कवितेचं श्रेय  पाब्लो नेरुदा ला दिलं जाते. ही कविता  ब्राझीलच्या मार्था मेडीरॉस ह्या स्तंभ लेखिकेची आहे. ह्या स्पॅनिश कवितेची वेगवेगळी इंग्रजी भाषांतर झालेली आहेत. 

 
  
You start dying slowly ;
if you do not travel,        
if you do not read,            
If you do not listen to the sounds of life,
If you do not appreciate yourself.  

You start dying slowly:                      
When you kill your self-esteem,         
When you do not let others help you.  

You start dying slowly ;                      
If you become a slave of your habits,  
Walking everyday on the same paths… 
If you do not change your routine,          
If you do not wear different colours          .
Or you do not speak to those you don’t know. 
You start dying slowly:                     
If you avoid to feel passion           
And their turbulent emotions;               
Those which make your eyes glisten    
And your heart beat fast.                         

You start dying slowly:                        
If you do not risk what is safe for the uncertain,
If you do not go after a dream,            
If you do not allow yourself,               
At least once in your lifetime,
To run away.....
You start dying Slowly !!!                   
Love your life Love yourself...```       
 
तुम्ही हळूहळू मरताय !

प्रवास, भटकंती  करत नसाल , 
वाचत नसाल काही
जीवन संगीत ऐकू येत  नसेल.
स्वतः चं कौतुक नसेल.
तर थोडे थोडे मरताय . 

जेव्हा  स्वतःच्याच  प्रतिष्ठेला धक्का पोहचवता.
जेव्हा  भलेपणाची  मदत अव्हेरता.
 मारतोय हळूहळू 
 
सवयीचे गुलाम असता
मळलेल्या वाटेनेच रोज चालत राहता,
नावीन्य शोधत नसाल.
वेगवेगळे रंग परिधान करत नसाल.
अपरिचितांना  टाळत असाल.
तर हळूहळू मरताय!  

हृदयाची गती  वाढवणारी  उत्कटता,
डोळ्यातली   चमक
आणि  भावनांची उर्मी हरवली असेल 
तर मरताय हळूहळू.   

 संदिग्धतेत सुरक्षेचं आव्हान स्वीकारत नसाल.
 स्वप्न   झपाटत नसतील.
 जीवनात  एकदा तरी पळून जाण्याची संधी घेतली  नसेल.
 तर   मरताय हळूहळू !  

 स्वतः वर प्रेम करा, जीवनावर प्रेम करा.






  कवितेच्या काही  आवृत्यामध्ये खालील कवने आढळतात. 

He who makes television his guru
dies slowly.
He or she who abandon a project before starting it,
who fail to ask questions on subjects he doesn't know,
he or she who don't reply when they are asked something they do know,
die slowly.

Let's avoid death in small doses,
reminding oneself that  

Only a burning patience will lead
to the attainment of a splendid happiness.
                                                                                                                           
 
जो टीव्ही वर जास्त वेळ व्यतीत करतो.
हळूहळू मरत असतो

प्रकल्प सुरु करण्यापूर्वी जो सोडून देतो 
अज्ञात विषयी प्रश्न विचारणं ज्याला जमत नाही 
जो ज्ञात असलेल्या विषयी उत्तर देत नाही
मरत असतो हळूहळू.   

लक्षात ठेवू या ! जिवंत राहण्यासाठी श्वासोश्वासा पेक्षा खूप मोठी किंमत द्यावी लागते.
चला कणाकणाने मरण टाळू या !

 फक्त कमालीचा संयमच भव्य आनंदा प्रत घेऊन जाईल. 

Thursday 20 October 2016

ये, दार उघडंच आहे






श्रीमती महादेवी वर्मा (१९०७-१९८७) यांची एक प्रसिद्ध कविता !!   सांगते !  
         जगणं, इतकंही अवघड नाहीये रे! 
गए तुम!!द्वार खुला है
अंदर जाओ..पर तनिक ठहरो ड्योढी पर पड़े पायदान पर
अपना अहं झाड़ आना..मधुमालती लिपटी है मुंडेर से
अपनी नाराज़गी वहीँ उड़ेल आना ..तुलसी के क्यारे में
मन की चटकन चढ़ा आना..अपनी व्यस्ततायें बाहर खूंटी पर ही टांग आना
जूतों संग हर नकारात्मकता उतार आना..बाहर किलोलते बच्चों से
थोड़ी शरारत माँग लाना..वो गुलाब के गमले में मुस्कान लगी है
तोड़ कर पहन आना..लाओ अपनी उलझने मुझे थमा दो
तुम्हारी थकान पर मनुहारों का पँखा झल दूँ..देखो शाम बिछाई है मैंने
सूरज क्षितिज पर बाँधा है
लाली छिड़की है नभ पर..प्रेम और विश्वास की मद्धम आंच पर चाय चढ़ाई है
घूँट घूँट पीना..सुनो इतना मुश्किल भी नहीं हैं जीना....





आलास..?                                            ये, दार उघडंच आहे ...आत
ये
पण क्षणभर थांब.


दारातील पायपुसण्यावर
अहंकार झटकून ये.


भिंतीला बिलगून वर चढलेल्या
मधुमालतीच्या वेलावर
नाराजी सोडून ये.


तुळशीपाशी मनाचे सारे ताप सोडून ये.
बाहेरच्या खुंटीला सारे व्याप टांगून ये.


पायातल्या चपलांबरोबर
मनातली नकारात्मकताही काढून ठेव.


बाहेर खेळणाऱ्या मुलांकडून
थोडा खेळकरपणा मागून आण.
गुलाबाच्या कुंडीतलं थोडं हसू
चेहेऱ्याला लावून आण.


ये.
तुझी सारी दुःखं, सारे प्रश्न
माझ्यावर सोपव.
तुझ्या दमल्या-भागल्या जीवाला
प्रेमाच्या चार गोड शब्दांचे विंझणवारे घालते.


ही बघ.
तुझ्यासाठीच ही संध्याकाळ अंथरली आहे मी.
सूर्य क्षितिजाला बांधलाय आणि
आकाशी गुलालाची उधळण केलीयं.
अन
प्रेम आणि विश्वासाच्या मंदाग्नीवर
चहा उकळत ठेवलाय.
तो घोट घोट घे.


ऐक ना.
इतकंही अवघड नाहीये रे जगणं.


 













Sunday 9 October 2016

शहाणं करणारं सप्तक



     
सप्तक ,प्रा महेश एलकुंचवार यांच्या सात भाषणांचं पुस्तक. वास्तवाचं भान आणून, विचारांना चालना देऊन  अंतर्मुख करणारी ही भाषणं.मुळातच वाचायला हवीत.  त्यांच्या नाटकांच्या विषया बद्दल , भाषे विषयी ते परखड आत्मपरीक्षण करतात. त्यातील काही त्रुटी बद्दल ते मोकळे पणे बोलतात आणि विकासातला एक टप्पा म्हणून स्वीकार करतात. आपल्या नाटकातील बलस्थानं, त्यातील भाषेचं महत्त्व विशद करून आपल्याला एक नवीन दृष्टिकोन ही देतात. 
.' वाडा चिरेबंदी' या नाटकाची पार्श्वभूमी सांगताना म्हणतात, स्वातंत्र्योत्तर काळात ब्राहमण कुटुंबाचं  विशेषतः खेड्यातल्या- गुदमरणे , त्यांची पडझड मला स्पष्ट दिसत होती. ही प्रक्रिया अजून संपलेली नाही. जुन्याची मोडतोड होते व नवीनचा स्वीकार करवत नाही अशा वेळी माणूस शाश्वत काहीतरी शोधात असतो आणि मानवी संबंधाइतकं, त्यातल्या ताणासह  शाश्वत दुसरं काय आहे? सर्व प्रक्रियेत माणसाचं हीण  आणि त्याचा भलेपणा असं काही हातात हात घालून येतात, की पाहणारा विस्मितच होतो. वाडा चिरेबंदी मधल्या माणसांसमोर अंधारच आहे. पण त्या अंधारात स्वतःचे क्षुद्र स्वार्थ जपता जपताच त्यांचा परस्परांसाठी जीवही तुटत असतो. सर्वांच्या तळाशी असते नितळ माणुसकी. मानवी जीवनातीलं,धूसरपणे का होईना, जाणवलेलं हे सत्य. 
आपली खेड्यातील संस्कृती  लोप पावत चालली आहे  याच वर्णन करताना म्हणतात, खेड्यात गिरणी आल्याबरोबर जातं गेलं व ओवीही गेली. विहिरीवर पंप आल्याबरोबर मोटेवरची गाणी गेली. टीव्ही  आल्याबरोबर देवळातली कीर्तनं ओस पडू लागली. 

मूळं  न हरवलेला समाज मागे वळून पहात नाही; त्याची नजर पुढेच असते- भविष्याकडे.  मागचा एखादा धागा, एखादी परंपरा जीर्ण झाल्यामुळे, निरुपयोगी झल्यामुळे तुटला; तरी त्या समाजाच्या आत्मविश्वासाला धक्का बसत नाही. कारण जुनं गेलं तरी नवीन परंपरा , नवीन विचार, नवीन कलाप्रकार हा समाज निर्माण करीतच असतो. 
 
ललित लेखना विषयी म्हणतात , या लेखनातली व्यैयाक्तिकता जर गळून पडली नाही, अनुभवाचं  साधारणीकरण झालं नाही तर लेखनाचा अर्थ संकुचिततेमुळे नष्टप्राण होईल. आपल्या अनुभवापेक्षा आपण नेहिमीच लहान असतो. अनुभव व्यक्त करताना लेखकानं स्वतःचा मी पणा एका मोठया सार्वभौम मी पणात वितळवला तर त्या अनुभवाला कलेचं स्वरूप प्राप्त होतं. ललित लेखनाचा प्रवास कसा असावा हे सांगताना रॉबर्ट फ्रॉस्टनंचं उल्लेख देतात अश्या लेखनाची सुरवात आनंदातून होते व त्याचा शेवट होतो तेव्हा आपल्याला एक शहाणपण आलेलं असतं.

भाषेविषयी काय म्हणतात बघा  ज्या मानवसमूहाने आपली भाषा गमावली, हरवली आहे त्यांची संस्कृती मृतप्राय व्हायला वेळ लागत नाही, कारण भाषा हा संस्कृतीचाच हुंकार असतो. 

ज्याला एक भाषा उत्तम येते, त्याला दुसरीही भाषा उत्तमच येते  . कारण अशा व्यक्तीनं भाषा मूल्यवान आहे , तिला स्वयंशिस्त आहे व शुद्धता हा तिचा निकष आहे हे तत्त्व अंगी बाणवलेलंच असतं. असं तत्त्व अंगीभूत केलेल्या माणसाला जबाबदारीची जाणीव असते व भाषेची मोडतोड करून तो भाषेचा व स्वतःचाही सन्मान खंडित होऊ देत नाही. 

भाषा हरवलेला समाज,परक्या भाषेवर गुजराण करू पाहणारा  समाज  नकळतच कणाहीन होतो. स्वतः जवळ बढाई मारण्यासारखं काही उरलं नाही की ती उणीव मोठे मोठे शब्द वापरून आपण भरून काढतो.


घरोघरीचं चित्र  कसं नेमकं उभं केलं आहे . दुस-याला जबाबदार धरण्याची आणि स्वतःची जबाबदारी टाळण्याची  वृत्ती. कशी मांडली आहे बघा.  

अ ब्लू स्टॊकिंग म्हणजे विदुषी ,   वर्गात विचारलं सांगा बरं महाराष्ट्रातल्या ब्लू स्टॊकिंग  कोण? वर्गात शांतता , मग मीच म्हटलं पंडिता रमाबाई , इरावती कर्वे , दुर्गाबाई भागवत , मालतीताई बेडेकर , शकुंतला परांजपे ही नावं माहित नाही तुम्हाला? शांतता. ८० मुलांचा वर्ग, पण ८० घरात ही वंदनीय नावं निघत नव्हती, त्या पोरांना काय दोष द्यायचा. या दु:स्थितीला जबाबदार कोण हे स्पष्ट आहे. या अनुभवावरून आपण आता तरी सावध होणार की नाही?

जन्मलेला प्रत्येक जीव छळणारे प्रश्न घेऊन येतो आणि जन्मभर उत्तरं शोधत राहतो. अखेर आयुष्यात सापडतं काय? तर आणखी प्रश्न. उत्तरं सापडतच नाहीत. असंही असेल की उत्तरं नसतातच. प्रश्नच फक्त असतात. 

जीवनाचा अर्थ सांगण्यासाठी , उपनिषदांपासून अगदी कृष्णमूर्तीपर्यंत सा-यांनी उत्तरं देऊन ठेवलेली आहेत. पण ती उपयोगाला येत नाहीत. कितीही मूलभूत असली, तरी ती दुस-याची उत्तरं. त्यानं आत्मप्रत्यय कसा येईल? वाचून माहिती मिळते. त्या माहितीचं आधी ज्ञान झालं, भाग्यवान असाल तर, ते ज्ञान अनुभव झालं तरच काही विसावा. वाचलेल्या उत्तरांनी बुद्धीचं समाधान होईल कदाचित; पण मन शांत नाहीच होत.


भाषा आपलं बोलणं ,वागणं  देहबोली , संस्कृती कसं बदलतं हे पहा. 
तरुण पिढीची मराठीची झालेली फारकत व इंग्रजीशी सलगी त्यांच्या देहबोलीतूनसुद्धा व्यक्त होऊ लागली आहे. इंग्लिश भाषेबरोबर येणारी देहबोली त्यांनी अंगिकारली आहे. कुठल्याही फुटकळ कारणानं आनंद झाला की ही मंडळी उजव्या हाताची मूठ उंचावून हे $ $ असा चित्कार करतात. त्यामागोमाग किंकाळ्या,मिठ्या व उपहारगृहात जाऊन खाणं, अभिजात संस्कृती नाही. आनंदच्या आविष्काराची ही आवाजी व उथळ पद्धत आली तरी केव्हा व कशी आपल्यात? मग केव्हातरी लक्षात आलं की मनात आनंद नसतोच मुळात. मग बाह्य कारणं शोधावी लागतात, किंकाळून स्वतःला खात्री करून द्यावी लागते की आनंद झाला आहे बरं आपल्याला. 

 


असे अनेक विचार या भाषणातून व्यक्त झालेलं आहेत जे आपल्याला अंतर्मुख करून विचार करायला लावतात व अंतरी शहाणपण जागवत राहतात.  वाचायलाच हवं श्रेणीतील पुस्तक