Thursday 28 September 2017

"कालपरवा " साधना प्रकाशन नी प्रकाशित केलेलं श्री रामचंद्र गुहा यांचं नवं पुस्तक Politics and Play ह्या स्तंभातील निवडक लेखांचा  श्रीमती कुमुद कारकरेंनी केलेला अनुवाद. 
श्री रामचंद्र गुहा, इतिहास, राजकारण,समाजकारण,पर्यावरण आणि क्रिकेट या पाचही क्षेत्रांत संशोधनपर लेखन करणारे स्तंभलेखक. त्यांची सर्वच मत पटतील असं नाही, परंतु विचार करणा-यांनी  आपली मतं तपासून  तर  घ्यावी. 


अनटचेबल : गांधीवादी आणि आंबेडकरवादी यामध्ये अस्पृश्यता विषयी गांधीवादी आणि आंबेडकरवादी विचारसरणीतील फरक छान पद्धतीने मांडला आहे. अस्पृश्यता निर्मूलनाचा एक मार्ग , जुलूम करणा-याची सद्सदविवेक बुद्धी जागी करणे ;तर दुसरा मार्ग पाश्चिमात्य किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेले साखळी संडास बांधून त्याचा प्रसार करणे. अस्पृश्यतेचा त्याग करून त्या पापातून मुक्त होऊन हिंदू धर्माने पवित्र व्हावे असे गांधींना वाटत होते तेव्हा सामाजिक उच्चंनीचता किंवा पक्षपात हाच हिंदू तत्वज्ञानाचा गाभा आहे असे आंबेडकर म्हणत होते. काळाच्या ओघात गांधींची हरिजन ही उपाधी मागे पडली आणि आंबेडकरांनी पुरस्कारलेली दलित ह्या उपाधीचा स्वीकार केला. 

तिहासकारांचे इतिहासकार या मध्ये सर्वपल्ली गोपाल (डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे चिरंजीव) यांच्या पुस्तकांचा , मतांचा उल्लेख आला आहे. त्यांनी म्हटलंय बहुसंख्यांक जमातीचा जातीयवाद हा अल्पसंख्यांकांच्या जातीयवादापेक्षा अधिक धोकादायक आहे. कारण बहुसंख्यांकांचा जातीयवाद राष्ट्रवाद म्हणून मिरवला जाण्याचा धोका असतो. 
आणीबाणी विषयी त्यांनी म्हटलंय १९७५ ते १९७७ या दोन वर्षातील घडामोडींनी या देशात नेहरू या नावाला काळे फासले आहे. पण १९८६ ते १९८८ दरम्यान ज्या काही गोष्टी घडल्या(शहाबानो प्रकरण) त्यांच्यामुळे नेहरू आणखीनच बदनाम झाले. आणि २००९ ते २०१३ दरम्यान झालेल्या घटनांनी नेहरूंच्या वारसांनी त्यांचे नाव धुळीला मिळवले आहे. एस गोपाल ,गांधी आणि सुभाषचंद्र विषयी लिहतात. गांधींनी हिंदू चालीरीती व रूढी यांच्यामधील पडदा , अस्पृश्यता या सारख्या प्रथांना आव्हान देऊन त्यांच्याविषयी लोकमत जागृत करण्याचा प्रयत्न केला. बोसना मात्र भारतीय प्राचीन वैभव इतिहास वाचून एक प्रकारचे स्मरणरंजन होत असे. बोस यांना पडलेली पश्चिमेची भुरळ सैद्धांतिक बाबीसंबंधी नसून संघटनात्मक पद्धतीविषयी होती. तेथील पक्षशिस्त आणि स्वयंसेवी संघटना त्यांना आकर्षित करीत होती. 

विध्वंस की विकास या मध्ये लेखक म्हणतात नर्मदा बचाओ व मेधा पाटकर यांचा करिष्मा , धैर्य , सह्का-याशी , कार्याशी असेलेली त्यांची प्रतिबद्धता याचा आदर करीत असतानाही त्यांच्या या संघर्षातील एकूण डावपेचांबाबत  माझ्या   मनात थोडा संदेह आहे हा विषय अमेरिकन संघराज्याच्या आमसभेसमोर नेऊन आंतरराष्ट्रीयीकरण झाले, ही मोठी चूक होती. 

मंडेलांचे भारताशी जडलेले नाते : मंडेलांच्या जीवनावर गांधीजींचा प्रभाव होता हे सर्वश्रुत आहे. त्याच बरोबर दक्षिण आफ्रिकेतील राजकीय आणि सामाजिक जीवनावर भारतीयांचा खूप प्रभाव होता. द. आफ्रिकेतील पहिल्या संसदेत ४० पेक्षा अधिक भारतीय खासदार होते. त्याबद्दल मंडेला कडे तक्रार करण्यात आली तेव्हा ते म्हणाले खरे आहे त्यांच्या संख्येच्या मानाने खासदारांची संख्या जास्त आहे परंतु त्यांनी संघर्षात योगदान केलेले आहे त्या मानाने ती संख्या थोडी अल्पच आहे. 

मोदींच्या जमान्यात आंबेडकरांची वचने: घटनासमितीतील भाषणात आंबेडकरांनी तीन इशारे दिले होते.  आजच्या परिस्थिती ते किती लागू आहेत, ह्याचं विवेचन म्हणजे हा लेख. पहिला धोका म्हणजे विरोधासाठी संयम सोडून रस्त्यावर उतरणे (अराजकाचे व्याकरण ) दुसरा मुद्दा राजकीय लोकशाही आणि सामाजिक लोकशाही यांच्यामधील भेद , राज्यघटना १८ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा हक्क देऊन राजकीय समानतेची ग्वाही देतो परंतु सामाजिक समानता ......   तिसरा इशारा सध्याच्या वातावरणात निकडीने लक्षात घेण्याची गरज आहे असे ते म्हणतात. भारतीयांनी कोणत्याही नेत्याचे अंधानुकरण करू नये. कृतज्ञता बाळगणे यात गैर काही नाही. कृतज्ञता व्यक्त करताना आत्मसन्मान विसरता येणार नाही. 

नेहरू-गांधी घराणेशाहीचा उदयास्त : या लेखात लेखक फार परखडपणे काग्रेसच्या सद्यस्थिती बद्दल मत मांडतात. नेहरू गांधी कुटूंबाच्या छायेतून दूर होण्यात किंवा पूर्णपणे अलग होण्यावरच काँग्रेसचे पुनरुत्थान अवलंबून आहे. 

इंदिराजींचा अहंभाव आणि भयभ्रम : या लेखात इंदिरांची एकंदरीत मानसिकता व्यक्तिमत्वातील अहंपणा आणि त्यावेळी त्यांच्या मनातील भय यांच चांगल्या प्रकारे विश्लेषण केलं आहे. त्याच बरोबर इंदिरा आणि मोदी यांच्या व्यक्तिमत्वातील साम्यस्थळे दाखवली आहेत. 

धार्मिक श्रद्धा: ईश्वरी आणि आसुरी : आस्तिक आणि नास्तिक वादाबाबत गांधीजी म्हणतात कोणत्याही धर्माचे स्वरूप दैवी आहे की आसुरी आहे हे ठरविणे, त्या धर्माचा आचार कारणा-यांच्या हाती असते. लेखक म्हणतात मी स्वतःपूर्णपणे नास्तिक नाही , पण मी अज्ञेयवादी आहे ईश्वर आहे की नाही, हे मला माहीत नाही आणि मी अशीही माणसे पाहतो, ज्याची श्रद्धा त्यांना पूर्णपणे निस्वार्थी बनवते.  

अभिव्यक्तीस्वातंत्र्यातील सात  धोके : अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा सध्या जोरात आहे. लेखक सात धोके सांगतात १) पुराण, जुने  कायदे  २) न्यायव्यवस्थेतील अपूर्णता ३) पोलिसदलाचे वर्तन ४) आविष्कार स्वातंत्र्याचा जाहीर पुरस्कार न करणे   ५) सरकारी जाहिरातींवरील प्रसारमाध्यमांचे अवलंबन ६) आर्थिक जाहिरातींवरील प्रसारमाध्यमांचे अवलंबन  ७) व्यावसायिक किंवा सैद्धतीक लेखक वर्ग  हे सर्व धोके समजून घेण्यासाठी मूळ लेख वाचणे आवश्यक 

वर म्हटल्याप्रमाणे कालपरवा या पुस्तकातील काही मतमतांतरे पटतील असं नाही पण अधिक प्रगल्भ होण्यासाठी ,. वैचारिक पद्धती विकसती करण्यासाठी असं काही वाचायला हवं 

Thursday 7 September 2017

नद्यां वाचवा जागरूकता मोहीम :

 
भारतीय नगरं नदीच्या काठी वसली आहेत आणि आपली  संस्कृती नदीच्या किनारी समृद्ध होत गेली आहे. गंगा , यमुना , सिंधू ,सरस्वती , कावेरी गोदावरी नर्मदा अश्या असंख्य नद्यां आपल्या जीवनरेखा आहेत. नद्यांचं महत्व आपल्या जीवनात खूप मोठं आहे त्यांना आपण मैया , मा ,आई माता म्हणतो, मानतो, नद्या  आपली तीर्थक्षेत्रं आहेत. 

पुराणकाळा पासून अस्तित्वात असेलल्या नद्या , वाढती लोकसंख्या, उद्योगीकरण वृक्षतोड , सांडपाणी , जलउपसा , रेतीवाळू उपसा या मुळे मृतावस्था कडे वाटचाल करत आहेत.  वेळीच आपण सुधारलो नाहीतर.


 
छोट्या छोट्या नद्या लुप्त झाल्या आहेत. काही मोठ्या नद्या आठमाही बनल्या आहेत उन्हाळ्यात नद्यांची पात्रं कोरडी होतात. आपल्या देशातील ४०% पेक्षा जास्त लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर जावं लागतंय. 


ईशा  फाउंडेशन नी सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या मार्गदर्शना खाली " नद्यां वाचावा  जागरूकता मोहीम  सुरु केली आहे. ३ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी वरून सुरु झालेली यात्रा २ ऑक्टोबर २०१७ ला हिमालयाच्या पायथ्याशी पूर्ण होईल. 



आपल्या नद्या मृत होत आहेत , मोठाली पात्रं  कोरडी पडत आहेत आपण काही केलं नाही तर पंधरावर्षात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न  भीषणरूप धारण करील यांची जाणीव  भारतवर्षात   निर्माण व्हावी हे मुख्य उद्दिष्ट. जमिनीची पाणीधारण करण्याची क्षमता वाढावी म्हणून नदीच्या किनारी दोन्ही बाजूला एक किलोमीटर पर्यंत वृक्षलागवड करावी, सरकारी जमीन असेल तिथे वनखात्यांनी तर खाजगी जमीन असेल तेथे शेतक-यांनी फळांची झाडे लावावी.  राज्य आणि केंद्र सरकारनी नद्यांविषयी धोरण जाहीर करावं
 
या जागरूकतेच्या मोहिमेत प्रत्येकांनी   म्हणजे जो  पाण्याचा उपभोक्ता आहे त्या सर्वांनी  सहभागी व्हायला पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीची काळजी घ्यायला हवी. 

Saturday 2 September 2017

विंदांच्या सहवासात एक स्मरणीय कार्यक्रम
                                



विंदांच्या जन्म शताब्दीनिमित्त्य २३ ऑगस्ट २०१७ लापॉप्युलर प्रकाशनतर्फे यशवंतराव चव्हाण केंद्रात आयोजिण्यात आलेल्या या कार्यक्रमात सत्याचा शोध घेणारे विंदा, विज्ञान आणि कविता यांचा मिलाफ घडवून आणणारे, मार्क्स ,ज्ञानेश्वर यांना आपल्या कवितेत आणणारे विंदा, खोडकर-मस्तीखोर छोटे होत छोटय़ांच्या विश्वात धम्मालमज्जा करणारे विंदा.. अशा विंदांच्या बहुपेडी व्यक्तित्वाचे वैभव विदांचे पुत्र आनंद ,उदय करंदीकर, कन्या जयश्री काळे, ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र, किशोर कदम उर्फ सौमित्र यांनी उपस्थितांना उलगडून दाखवले.

सुरवातीलाच श्री रामदास भटकळ यांनी विंदाचं ६० वर्षांच्या सहवासानंतरही कसे कळले नाही हे त्यांच्याच कवितेचा आधार घेऊन सांगितलं

असा मी तसा मी कसा मी कळेना,

कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची;
कधी वाढता वाढता व्योम व्यापी
कधी धावतो विश्व चुंबावयाला
कधी आपणाला स्वहस्तेच शापी
कधी याचितो सत कधी स्वप्न याची
कधी धावतो काळ टाकुन मागे
कधी वर्षतो अमृताच्या सरी अन
कधी मृत्युच्यी भाबडी भीक मागे
कधी दैन्यवाणा, निराधर होई
कधी गुढ, गंभीर, आत्मप्रकाशी
कधी गर्जतो सागराच्या बळाने;
कधी कापतो बोलता आपणाशी!
कधी आपणा सर्व पिंडात शोधी;
कधी पाहतो आत्मरुपात सारे;
कधी मोजीतो आपणाला अनंते
अणुरुप होती जिथे सुर्य, तारे
टळेना अहंकार साध्या कृतीचा;
गळेना महापुच्छ स्वार्थी स्मृतीचे;
कधी घेतसे सोंग ते सत्य वाटे!
कधी सत्य ते वाटते सोंग साचे!
कधी संयमी, संशयात्मा, विरागी
कधी आततायी, कधी मत्तकामी
असा मी.. तसा मी.. कसा मी कळेना;
स्वतःच्या घरी दुरचा पाहुणा मी!






कवी आपल्या मनातील द्वंद्व फार छान पद्धतीने मांडतात जणू ते आपल्या समोर आरसाच धरतात. आपलं प्रतिबिंब या कवितेमधून दिसतं आणि कविता आपली होऊन जाते.

काव्य गायनाची सुरवात विंदांच्या कन्या जयश्री काळे यांनी त्या काळात दीडशे मुलांच्या वर्गात तीन-चारच मुली असत. त्याही उच्चभ्रू. हा किस्सा सांगून त्यांना उद्देशून विंदांनी केलेली कविता, सादर करून कायर्क्रम एका उंचीवर नेला.



माझी घाई काहीही
जाणून आहे अंतरी
लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी

तू झुंजू-मुंजू हासशी
जाई जुइचे बोलशी
मी वेंधला मग सांडतो थोड़ा चहा बाहिवरी

तू बोलता साधे सुधे
सुचवून जाशी केवढे
मी बोलतो वाचाल सा अन पंडीती काहीतरी

होशी फुलासह फूल तू
अन चांदण्या सह चांदणे
ते पाहणे इतकेच मी बघ मानले माझ्या करी

म्हणतेस तू मज आवडे
हा रांगडा सीधेपणा
विश्वास मी ठेवू कसा ह्या हुन्नरी शब्दावरी

लिहिती बटा भालावरी
उर्दू लिपीतील अक्षरे
हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी

लागेल जन्मावे पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी...

कर्तव्य चांगल्याप्रकारे निभावून मानसिकता कशी ठेवायला हवी हे सांगणारी दुसरी कविता म्हणली,

केले कुणास्तव ते किती,
हे कधी मोजू नये;
होणार त्याची विस्मृती;
त्याला तयारी पाहिजे.

डोक्यावरी जे घेऊनी
आज येथे नाचती,
घेतील ते पायातळी;
त्याला तयारी पाहिजे.

सत्यास साक्षी ठेवुनी
वागेल तो, बोलेल जो,
तो बोचतो मित्रांसही!
त्याला तयारी पाहिजे.

पाण्यामध्ये पडलास ना?
पाणी कसेही ते असो-
आता टळेना पोहणे;
त्याला तयारी पाहिजे

कवी सौमित्र यांनी विंदाच्या लघुनिबंधांचे आपल्या खास शैलीत वाचन केले.त्यापैकीपुरुष आणि पिशव्याया लघुनिबंधात लग्नानंतरमाणसाळलेलेपुरूष कशा पद्धतीने मान खाली घालून पिशव्या घेऊन बाजारहाटला जातात, याचे जे काही वर्णन विंदांनी केले आहे, ते सौमित्रच्या तोंडून ऐकताना मजा आला. सकाळचा कैफ ह्या निबंधाने अंतर्मुख केलं.

ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र यांनी विंदांच्या सहज आणि मोकळ्या स्वभावाचे त्यांना आलेले अनुभव कथन केले. खास करून NCPA मध्ये स्वतः बद्दलची लघुफिल्म पाहिल्यानंतर विंदांनी म्हटलं होतं " सुमे, लघुफिल्म मधला विंदा पाहून झाला असल्यास -या विंदा बरोबर चल घरी.

लहानपणी मला अनामिक भीती वाटायची, ती दूर करण्यासाठी विंदांनी बालकवितांचा उपाय शोधून काढला आणि तो यशस्वी झाला असं सांगून त्यांच्या लहान मूलगा उदय करंदीकर यांनी बालकविता म्हणून दाखवल्या. आपला पत्ता गणपती बाप्पा एटू लोकांचा देश ,



तिबेटाच्या
जरा खाली
हिमालयाच्या
जरा वर
एटू लोकांचा
अद्भुत देश
प्रत्येकाजवळ
उडते घर,
टिंग म्हणता
येते खाली,
टुंग म्हणता
जाते वर..









जीवन विषयक दृष्टी, तत्त्वज्ञान , हिंदू संस्कृतीतील प्रतिमाना नवे अर्थ देण्याचं काम ,मार्क्सचा विरोधविकासवाद, भौतिकवाद इत्यादी विषय विंदांच्या कवितेचे भाग होते, असे सांगून विंदांचे जेष्ठ पुत्र आनंद करंदीकर यांनी जनता अमर आहे , ब्रम्हानंद,सदगुरु वाचून सोय ह्या कविता सादर केल्या.

जनता अमर आहे

जनतेच्या पोटामध्ये
आग आहे, आग आहे;
जनतेच्या डोळ्यांमध्ये
शंकराचा राग आहे ...
जनतेच्या ऐक्यामध्ये
लाव्हाची लाट आहे;
जनतेच्या पायांपुढे
प्रकाशाची वाट आहे ...
जनतेच्या हृदयामध्ये
अन्यायाची कळ आहे;
जनतेच्या बाहूंमध्ये
सागराचे बळ आहे ...
जनतेच्या एच्छेमध्ये
नियतीचा नेट आहे;
जनतेच्या हातांमध्ये
भविष्याची भेट आहे ...
जनतेच्या नसांमध्ये
लाल लाल रक्त आहे;
जनतेच्या सत्तेखाली
पृथ्वीचे तख्त आहे ...
जनतेच्या मुक्तीसाठी
अजून एक समर आहे;
आणि जिचा आत्मा एक
ती जनता अमर आहे ...
जगण्यामध्ये ब्रह्मानंद.


कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचे हस्ताक्षरं 
 बरगड्यांच्या तुरुंगातून
मी हृदयाला मुक्त केले;
जिथे जिथे धमनी आहे
तिथे माझे रक्त गेले.

दिक्कालाच्या जबड्यामधील
लवलवणारी जीभ मी;
आसक्तीच्या गर्भामधील
धगधगणारे बीज मी.

माझ्या हातात महायंत्र;
माझ्या मुखात महामंत्र.


सगळे मिळून सगळ्यांसाठी
मरण्यातही मौज आहे;
सगळे मिळून सगळ्यांसाठी
जगण्यामध्ये ब्रह्मानंद.







ज्येष्ठ समीक्षक विजया राजाध्यक्ष यांनी विंदांच्या घेतलेल्या मुलाखतीचा काही अंश यावेळी दाखविण्यात आला. या निमित्ताने खुद्द विंदांनी सादर केलेल्यामाझ्या मना बन दगड..’ आणिआईन्स्टाईनया दोन कविता ऐकता आल्या.