Saturday 14 September 2019

छोडो यार !!

एखादी गोष्ट घट्ट धरून ठेवण्याने  आपण खंबीर आहोत असं वाटतं. पण कधीतरी गोष्ट सोडून देणं  शहाणपण ठरतं. 

आपल्यापैकी बहुतेकांना   काही गोष्टी सोडून देणं खूप अवघड जाते. एखादी गोष्ट नाही जमली, एकत्र काम करणं जमलं नाही तर त्याचा खेद करतो. आपल्याला शिकवलं गेले आहे की कितीही कठीण परिस्थितीत घेतलेले काम सोडू नका, हार मानू नका. परंतु ह्याचे दुष्परिणाम होताना दिसतात. अपूर्ण कामं  ताण तणाव निर्माण करतात .  अपराधीपणाची भावना जागृत होते आणि त्याचा भविष्यातील  कामावर विपरीत परिणाम होतो. 
ज्या  गोष्टींना आपण खूप महत्व देतो, जी  मूल्य जगण्याचा  मार्ग होतात तीच खूप जाचक ठरतात.

उद्दिष्ट,ध्येय ठरवणं आणि गाठण्यासाठी अहोरात्र ध्यास घेणे उत्तमच. परंतु जीवनाच्या प्रवासात काही उद्दिष्ट , ध्येय कालबाह्य होतात अश्यांचा विचार करणे फेर आढावा घेणे आवश्यक असते.  
खूपवेळा प्रयत्न करून , मनासारख्या गोष्टी घडत नाहीत , परत परत काहीतरी राहून जातं अश्यावेळी जसं आहे तसं स्वीकारता आलं पाहिजे. 
अश्या वेळी सोडून  देऊन पुढे गेलं पाहिजे. 
तुम्हाला सहज काही गोष्टी सोडून देता येतात का ?  जर तुम्ही हट्टीपणे ,दुराग्रहाने पाठपुरावा करत राहात असाल तर दुस-या संधी धूसर होतात .   वेळीच गोष्टी सोडून देता आल्या नाहीतर दु:ख च देतात .
जुनी ध्येय , धोरण , माणसं पुन्हा पुन्हा काळाच्या कसोटीवर तपासून घ्यायला हवीत.  
एखादी गोष्ट सोडून देणे म्हणजे  पराभव नव्हे. 
सोडून देणे  म्हणजे पराभवाची खूणगाठ नव्हे. 
सोडून दिले  म्हणजे उपयोगाचं राहिलं  नसावं.   
सोडून दिले म्हणजे सर्व प्रयत्न करूनही इच्छित फळ मिळत नसावं. 
सोडून देणे म्हणजे अधिक चांगल्या गोष्टी वर लक्ष केंद्रित करणे.  
सोडून देण्याने अधिक चपळता, लवचिकता बाणू शकते. 
सोडून दिल्या मुळे नवीन संधी मिळू शकतील.  
बऱ्याच प्रकरणात सोडून देण्याने नवीन  उत्तम  पर्याय उपलब्ध होतात, नवीन ध्येय,माणसं जोडली जातात जी पुढे जाण्यात मदतगार होतात. 
सोडून दिल्या मुळे धक्क्याची तीव्रता कमी होते, मानसिकता अधिक लवचिक होते. 
बघा 
आतातरी  काही काही गोष्टी सोडणं इष्ट  वाटतं ना ! की आव्हानं !!!
(इंग्रजी लेखाचं स्वैर भाषांतर ,त्रुटी अर्थातच माझ्या )

Tuesday 3 September 2019

उघड्या डोळ्यांनी केलेली साधना

गुलजार साहेबची  पुस्तकां विषयी  "किताबें झाँकती हैं बंद आलमारी के शीशों से" ही एक सुंदर कविता आहे. त्यामध्ये पुस्तकां मुळे  नाती कशी बनतात ह्याचं वर्णन आहे. पुस्तकं देण्या घेण्याने नाती निर्माण होतात. अश्याच नात्यांचा , प्रेमाचा अनुभव नुकताच घेतला. पुस्तकं आपलं जीवन घडवतात , सुमृद्ध करतात , अर्थ देऊन जीवन अर्थपूर्ण करण्यात साह्यभूत होत असतात. आणि पुस्तकं देणारे हात !! ते देतात आकार , दिशा आणि व्हिजन.
अनेक  जेष्ठ श्रेष्ठ सहृदयी मित्रांनी  छान  पुस्तकांशी दुर्मिळ योग जुळवून आणला  .






 त्यातील एक  पुस्तक "तिसरा नेत्र "  श्री शुभ विलास दास यांच्या Open Eyed Meditation  (उघड्या डोळ्यांनी केलेली साधना ) या मूळ पुस्तकाचं भाषांतर आपल्या जीवनातील दैनंदिनी घटनांचा रामायण आणि  महाभारतातील  शिकवणीद्वारे धुंडाळलेला अर्थ.

साधना, चिंतन म्हणजे अंतर्चक्षूंनी पाहिलेलं सत्य, म्हणून " तिसरा नेत्र ".


 


















दैनंदिन व्यवहारात आपण कसं वागायला पाहिजे, काय दक्षता घ्यायला हवी. हे रामायण महाभारतातील छोट्या छोट्या उदाहरणांनी समजून सांगितले अहे. 
सद्यस्थितीतील   संपर्कक्षेत्रांच्या बाहेर जाण्याच्या भीतीवर एक प्रकरण आहे. लेखक  म्हणतात लोक आजकाल फेसबुक ,ट्विटर ,व्हाट्सअँप , मोबाईल इत्यादींद्वारे सतत कनेक्टेड , ऑनलाईन राहण्याचा प्रयत्न करीत असतात. थोडावेळ मोबाईल पहिला नाही तर  चुटपुट लागते. मला सर्व विसरल्याची भीती सतावत राहते. लोकांना चोवीस तास संपर्कक्षेत्रात राहण्याचा नाद जडला आहे. तथापि व्यक्तिगत प्रगतीसाठी एकांताची आवश्यकता असते. हे प्रभू रामाचं उदाहरण देऊन सांगतात.
 नेतृत्वाची कला , उपाधिरहित नेतृत्व , चिर नेतृत्व, अनिश्चितता आणि नेतृत्व इत्यादी प्रकरणातून नेतृत्व गुणा विषयी प्रतिपादन करतात. एका ठिकाणी म्हणतात.  " ज्यावेळी  नेता , लोकांनुसार किंवा  परिस्थितीनुसार   आपल्यात  बदल घडवून आणत नाही त्यावेळी ते नेतृत्व करण्यामध्ये आणि भावी नेते निर्माण करण्यामध्ये अपयशी ठरते."

नातेसंबंध , मैत्री या विषयावर संबंधांचा योग , खरे प्रेम , चिरकाल मैत्री मैत्रिसूत्र , आवडते नावडते इत्यादी प्रकरणे आहेत.
 प्रेमाचे खरे स्वरूप म्हणजे  आपल्या इच्छा , आकांक्षा  एषोआराम यांचा त्याग करण्याची मनोवृत्ती.
 

आपल्या रोजच्या व्यवहारातील शंका , चांगलं काय वाईट काय या विषयी द्विधा असे अनेक विषय ह्या पुस्तकात हाताळले आहेत. जगणं अधिक प्रगल्भ करण्यास मदत करेल असं पुस्तक. 

Friday 2 August 2019

लवकर उठा आणि शहाणे व्हा.

नुकतंच रॉबिन शर्माचं The 5 AM Club हे पुस्तक पाहण्यात आलं , चाळून पाहिलं. रॉबिन शर्मा व्यवस्थापन या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचं व्यक्तिमत्त्व, त्याच्या शब्दात म्हणायचं तर Be Wise Early Rise म्हणजे लवकर उठा आणि शहाणे व्हा. तस हिंदीत ही म्हटलं जातं जल्दी सोये , जल्दी जागे , दुनियामे सबसे आगे !! लवकर उठण्याचं महत्व आपल्याला नवीन नाही लहानपणा पासून आपण ऐकत आलो आहोत, त्यामुळे  पहाटेच्या प्रहराला "राम प्रहार"  म्हटलं गेलं आहे. आजच्या भाषेत " Holy Hours" सकाळी लवकर उठा अभ्यास करा, पहाटेच्या एकांतात केलेला अभ्यास चांगला.   कॊणातही चांगलं काम त्याचं चिंतन मनन करा रामदास स्वामी सांगतात की "प्रभाते मनी राम चिंतीत जावा "आणि इकडे फक्त दशरथ पुत्र राम अपेक्षित नसून, जे जे उत्तम उदात्त उन्नत चं चिंतन. वैदिक प्रार्थनेत " प्रभाते कर दर्शनम " चा मंत्र दिला आहे. In current scenario , Take  stock of whats in your hand, rather everything in your hand, pay gratitude to rest of the world who are always helpful.हेच सूत्र रॉबिन शर्मा आपल्या नव्या पुस्तकात आधुनिक आजच्या भाषेत विस्तारानं मांडतात,
  • पहाटे ५ वाजताचा  एकांत तुमच्या मेंदूला सर्वोत्कृष्ठ काम करायला चालना देईल. पहाटेच्या रामप्रहरी मेंदूची आकलन शक्ती परमोच्च असते नेमक्या भाषेत सांगायचं तर बॅटरी फुल चार्ज असते.  या वेळी मन विचलित होत नाही , अतिकाळजी आणि चिंता मुक्त स्थितीत असते. सूर्योदयाच्या वेळेची सकारात्मक ऊर्जेचा लाभ होतो त्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहू शकता. ज्यामुळे कामावर लक्षकेंद्रित करता येते व कामं चांगली होतात. 
  • पहाटे ५ वाजता उठण्यासाठी शरीराला योग्य विश्रातीची आवश्यकता असते. रोजच्या झोपेतूनच शरीराची झीज भरून येत असते. प्रभावी पणे काम करण्यासाठी ,प्रगतीसाठी  विश्राती ही तितकीच महत्त्वाची. मोबाईल टीव्ही इत्यादी उपकरणं विश्रातीच्या आड येत असतात. ती झोपे पूर्वी पाहणे बंद  केली पाहिजेत. रात्री वेळेवर झोपलात तर सकाळी उठणे सोप्प होईल. 
  • पहाटेच्या प्रहाराची उपयुक्तता वाढवण्यासाठी  ते   २०/२०/२०  सूत्र  सांगतात   दिवसाच्या सुरवातीची २० मिनिटं  व्यायाम करा. घाम येण्याने विचारशक्ती  सुधारते. पुढची २० मिनिटं एकाग्रतेत घालावा , ध्यान , धारणा मेडिटेशन करा. एकांतेत घालवलेला हा वेळ मनाला शांतता देईल. आणि शेवटची २० मिनिटं शिक्षणासाठी वापरा यामध्ये एखादं पुस्तक वाचा, डॉक्युमेंटरी बघा , कोणतीही कृती करा जी शिकायला मदत करेल, तुमची उन्नती करेल.
पहाटे ५ वाजता उठणे अवघड नाही, मनाचा निश्चय करायला हवा. लवकर उठण्यासाठी काही सोप्प्या गोष्टी लेखक सुचवतात 
  • रात्रीचं जेवण वेळेत घ्या, उशीरा घेऊ नका. लवकर जेवल्यामुळे   झोप चागंली होऊन पूर्ण  होईल.      
  • अलार्म झाल्याबरोबर अंथरूण सोडा. अजून थोडं झोपू हा विचार झटका. आळस टाळा.
  • तंदुरुस्त रहा. नियमित व्यायाम करा..तबेतीची काळजी घ्या.  
  • मोठी स्वप्न बघा , उच्चं ध्येय ठेवा जी तुम्हाला झोपू देणार नाहीत.
  • मन आणि अंथरुणाची लढाई आहे. अंथरुणावर मात करून लवकर उठा ,  Put mind over mattress. , लवकर उठल्याने  निवांती , अधिक कुशलता, आणि खूप काही मिळेल ज्याची अनुभूती स्वतः घ्या!
आपलं जीवन मौल्यवान आहे.  विश्वातील आपलं स्थान अद्वितीय आहे  हे सर्व साध्य करू शकता, लवकर जागे व्हा !!!
बेंजामिन फ्रँकलीन यांनी एका ठिकाणी नमूद केलं : मेल्यावर झोपायला भरपूर वेळ मिळेल. ( Benjamin Franklin once noted: “there will be plenty of time to sleep when you are dead.”  )

Saturday 8 June 2019

निरीक्षणं आणि धडे

श्री आनंद मोरे यांचं श्री आर. गोपालक्रिष्णन यांच्या क्रॅश : लेसन्स फ्रॉम एन्ट्री ॅण्ड एग्झिट ऑफ सीईओज्’ या पुस्तकावरील म्हणजेच  अपयशी नेतृत्वाकडून मिळणारे धडे  वरच परीक्षण लोकसत्तेत वाचनात आलं. 
अनेक कंपन्यांनी व्यावसायिकसीईओनेमले; त्यांपैकी काही जणांना अपयशामुळे पायउतार व्हावे लागले. अशा १५ उदाहरणांचा अभ्यास  या पुस्तकांत मांडण्यात आला आहे.
लेखक आर. गोपालक्रिष्णन   यांनी पहिल्या भागात जोसेफ जॉन कॅम्पबेल या अमेरिकी पुराण अभ्यासकाच्या १९४९ मधील हीरो विथ थाऊजंड फेसेस’ (हजार चेहऱ्यांचा नायक) या ग्रंथाचा आधार घेतला आहे.  अभ्यासानंतर लेखक   नित्कर्षा पर्यंत पोहचून एखाद्या सिद्धांत मांडतो   कॅम्पबेल यांच्या मते, जगभरातील कुठल्याही पुराणकथेतील नायकाच्या आयुष्यात काही टप्पे कायम दिसून येतात.  
‘सुरवातीची स्थिती , जग 
                       साहसाची हाक 
                              द्विधा मन: स्थिती   
                                     सल्लागाराचा प्रवेश 
                                              उंबरठा ओलांडणे   
                                                        परीक्षांचा काळ   
                                                                  खडतर आव्हानांची सुरुवात 
                                                                                                 सत्त्वपरीक्षा 
                                                                                                                विजय 
                                                                                                                       बक्षीस
                                                                                                                            पुनस्र्थापना 
                                                                                                                                             नायकत्व
याच टप्प्यांतून जगातील सर्व पौराणिक कथा फिरतात.कथा पुरुषाला  अश्या प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागतं आणि शेवटी प्राप्त होते  नायकत्व किंवा  देवत्व.मग ती रामायणातील रामाची कथा असो वा महाभारतातील कृष्णार्जुनाची कथा असो किंवा अन्य समाजांतील कोणत्याही पौराणिक नायकाची कथा असो.
लेखक आपली निरीक्षणं मांडतो आणि त्याच बरोबर कारण मीमांसा करतो. बघा ! 
पॉवर टेन्ड्स टु करप्ट ॅण्ड ॅब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॅब्सोल्यूटलीहे लॉर्ड ॅक्टन यांचे विधान नकारात्मक आहे 
अधिकारांमुळे मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो आणि व्यक्तीची अगम्य भविष्याचा वेध घेण्याची क्षमता कमी होऊन अति-आत्मविश्वास वाढतो; परिणामी चहूबाजूंनी येणारे संकेत ओळखण्यास तो कमी पडतो,’ 
आरशाचे काम करणाऱ्या साहाय्यकांचे महत्त्व सांगताना लेखक म्हणतात   "आपल्यातील दोष आपल्याला हळुवारपणे सांगून त्यापासून आपल्याला दूर ठेवणारे सहकारी आपला खरा हितचिंतक असतो"
मोठय़ा अधिकारांबरोबर मला नियम लागू होतच नाहीत असा समज होता. इतरांप्रति तुच्छता  स्वभावात येते . तिच्यामुळे -हा होतो.  या उलट  
"मोठय़ा अधिकारांबरोबर मोठय़ा जबाबदा-या  येतात"  

Monday 3 June 2019

मुंगी उडाली आकाशी------ग्रेटा थनबर्ग

 
ग्रेटा थनबर्ग
  स्वीडनमधील एक शालेय बालिका. स्वीडनमधील नवव्या इयत्तेतील मुलगी ग्रेटा थनबर्ग ही हवामानबदलाच्या बातम्या ऐकून अस्वस्थ होत असे. तिने तिसरीत- म्हणजे वयाच्या आठव्या वर्षी ‘हवामानबदल’ हा शब्द ऐकला आणि ती त्याच्या खोलात जाऊ लागली. ग्रेटाच्या शाळेत पर्यावरणाची हानी, हवामान- बदलामुळे होणारे भयंकर परिणाम यांविषयी माहिती दिली जायची, वृत्तपट दाखवले जायचे. त्याचवेळी जगभर होणाऱ्या घडामोडी जाणून घेत असताना संवेदनशील ग्रेटा दु:खी होत असे. जाहीर पणे हवामानबदला वर बोलायला सुरवात केली .  सुरुवात अर्थात घरापासूनच! कार्बनच्या पाऊलखुणा जाणणाऱ्या ग्रेटाने तिचे वडील (विख्यात अभिनेते) स्वान्त आणि आई (प्रसिद्ध नृत्यांगना) मलेना यांना शाकाहारी होण्यास प्रवृत्त केले. दोघांना विमानप्रवास बंद करायला लावला. या छोटय़ा मुलीने आई-वडिलांना उच्चभ्रू, उधळ्या जीवनशैलीकडून साधेपणाकडे नेले.  (मुलं ही आईवडिलांना घडवतात )

२०१७ च्या ऑक्टोबर महिन्यात स्वीडनच्या जंगलात भयानक वणवा पेटला, तर २०१८ साली युरोपभर उष्णतेची लाट पसरली.  ती १५ वर्षांची चिमुकली मात्र गप्प बसली नाही. एक दिवस तिने बोर्ड रंगवला *_'पर्यावरणासाठी शाळेचे आंदोलन'_* आणि तो बोर्ड घेऊन ती सरळ स्वीडनच्या संसद भवनासमोर जाऊन बसली.
ती एकटीच बसली होती. येणारे-जाणारे तिच्याकडे कुतूहलाने पाहत होते, बोर्ड वाचत होते, पण तिच्या या आंदोलनात कुणीही सामील झाले नाही.
तरी ती मागे हटली नाही. रोज तो बोर्ड घेऊन ती संसदेसमोर बसू लागली. ही हिंमत आपल्यात कधी येईल का? शाळा बुडते म्हणून तिचे आईवडील रागावले. तिने त्यांचेही ऐकले नाही. तिच्यासाठी पर्यावरण वाचवणे महत्त्वाचे होते.
रोज तिला संसद भवनासमोर बसलेली पाहून हळूहळू एकेक सामील होऊ लागला. सकाळी ६ वाजता ही पोर घरातून निघायची, संसद भवनासमोर बोर्ड घेऊन बसायची आणि दुपारी ३ वाजता घरी परतायची.
*२० ऑगस्ट २०१८ पासून हा सिलसिला सुरू झाला.*
त्यानंतर ती  शुक्रवारी सतत आंदोलनं करत आहेत. ‘Fridays For The Future’ हे आंदोलन विविध देशांत पोहोचलं आहे. जर्मनी, बेल्जियम, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि जपानमध्ये ही आंदोलनं झाली आहेत. शुक्रवारी जवळपास 100 देशांत हे आंदोलन झालं.
दर शुक्रवारी ग्रेटा लोकांना हवामान- बदलाविरोधात कृतिशील होण्याचे आवाहन करू लागली. तिच्या बातम्या जगभर जात राहिल्या आणि तिला ओसंडून पाठिंबा मिळू लागला. ग्रेटा नामक बालिकेचे हवामानबदलाविषयीचे विचार ऐकण्यासाठी तिला जगभरातून आमंत्रणे येऊ लागली
ग्रेटा म्हणाली, ‘संपूर्ण मानवजात अभूतपूर्व संकटाला सामोरे जात असताना आपले नेते अतिशय बालिश वर्तन करीत आहेत. आपण जागे होऊन र्सवकष बदल घडवणे अनिवार्य आहे.’
मी ग्रेटा थनबर्ग! मी १६ वर्षांची असून, पुढील पिढय़ांच्या वतीने आपल्याशी संवाद साधत आहे. आपण म्हणता, आम्ही लहान आहोत. परंतु आम्ही हवामानाचे शास्त्र जे सांगत आहे त्याचीच उजळणी करीत आहोत. आम्ही वेळ वाया घालवतो याची तुम्हाला काळजी वाटत आहे. पण तुम्ही विज्ञानाचा संदेश ऐकून आमचे हिरावलेले भविष्य परत मिळवून द्याल, त्याक्षणी आम्ही शाळेत परत जाऊ. याचसाठी हा अट्टहास आहे. हे अती आहे काय? तुमच्या मुला-नातवंडांप्रमाणे २०३० साली मीदेखील ३० वर्षांची होईन. हे वय फारच महत्त्वाचे असते असे तुम्ही आम्हाला सांगता. पण आमच्यासाठी ते तसे असेल का, हे काही मला सांगता येत नाही. ‘मोठी स्वप्ने बघा’ असे आम्हाला लहानपणी सांगितले गेले. तुम्ही आम्हाला खोटी आशा दाखवली, आमच्याशी खोटे बोलत आलात. आमचे भवितव्य अंध:कारमय आहे याची जाणीवच आमच्यापकी कित्येकांना नाही. जगाची कधीही भरून न निघणारी हानी घडविणाऱ्या घटनांची साखळी २०३० पासून सुरू होईल. हा संहार होऊ द्यायचा नसेल तर आतापासूनच तातडीने कर्ब उत्सर्जन निम्म्यावर आणण्यासाठी कृती निकडीची आहे. हवेचे प्रदूषण, तापमानवाढ व आपत्ती यासंबंधीची आय.पी.सी.सी. (इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज)ची आकडेवारी अनेक छुप्या संभाव्यतांचा विचार करू शकत नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. थोडक्यात, आपण कडेलोटाकडे जात आहोत, अशी ही आणीबाणी आहे. मी बोलतेय ते आपल्याला ऐकू येतेय ना?
ती सर्वांना सांगतेय " तुमचे मतभेद विसरून तुम्ही कृती केली पाहिजे. आम्हा मुलांना आमची आशा व स्वप्ने परत हवी आहेत, म्हणून आम्हाला हे करावे लागत आहे. मी बोलतेय ते आपल्याला ऐकू येतेय ना?"
जागतिक हवामान परिषदेस संबोधित करण्याचा मान शाळकरी ग्रेटाला मिळाला आणि २०० राष्ट्रांच्या प्रमुखांना तिने जाहीर फटकारले : ‘हवामानबदल समजून सांगण्याएवढे तुम्ही प्रगल्भ नाही. तुम्ही आम्हा बालकांवर अवाढव्य ओझे लादले आहे. लोकप्रिय होण्यासाठी धडपडण्याची मला आस नाही. मला आपली सजीव पृथ्वी आणि हवामान यांची काळजी आहे.’  , ‘पृथ्वीवरील अमूल्य संपदा ओरबाडून काही कंपन्या, काही लोक आणि काही धोरणकत्रे हे बेसुमार संपत्ती कमावत आहेत. येथे जमलेल्यांपकी अनेक जण या गटातील आहेत. परंतु त्यामुळे तुम्ही तुमच्या बालकांना संकटांच्या खाईत लोटत आहात.’ ती जगातील धोरणकर्त्यांना म्हणाली, ‘तुम्ही आशावादी असावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही अस्वस्थ होणे आवश्यक आहे. मला दररोज वर्तमानाची भीती वाटते. तुम्हालाही तशी भीती वाटली तरच तुमचे वर्तन संकटकाळातून बाहेर काढण्याचे असेल. घराला आग लागल्यावर आपण आटोकाट प्रयत्न करू, तसे शर्थीचे प्रयत्न तुम्ही करा. कारण आपल्या घराला खरोखरीच आग लागलेली आहे.’



तिच्यामुळे स्फूर्ती घेऊन हवामानबदल रोखण्याचे आवाहन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत कित्येक पटीने वाढ होत आहे. स्वतच्या देशाला व जगाला जाग आणण्यासाठी लाखो मुले शाळा बंद ठेवत आहेत. १५ मार्च २०१९ रोजी ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत १२० राष्ट्रांतील १५ लाख विद्यार्थ्यांनी ‘हवामानबदल रोखण्यासाठी राजकीय नेत्यांनी कृती करावी’ हे बजावण्यासाठी शाळा बंद पाडल्या.
जगाचे भविष्य घडविणाऱ्या दहा किशोरवयीन मुलामुलींचा ‘पुढील पिढीचे नेते’ असा गौरव ‘टाइम’ साप्ताहिकाने २७ मे २०१९ च्या विशेषांकात केला आहे. आणि अर्थातच मुखपृष्ठावर झळकत आहे- ग्रेटा! मोठय़ांना उद्देशून ‘तुम्हाला ऐकू येतंय ना?’ असे काकुळतीने वारंवार विचारणारी ग्रेटा ‘टाइम’ला म्हणाली, ‘नऊ महिन्यांपूर्वी माझं बोलणं कुणाच्याही कानांपर्यंत जात नव्हतं. आता संपूर्ण जग मला ऐकते आहे.’  


ग्रेटामधील निर्मळता व प्रांजळपणा लहानथोरांना खेचून घेत आहे. नॉर्वे सरकारने २०१९ च्या नोबेलसाठी १६ वर्षांच्या ग्रेटा थनबर्ग हिचे नाव सुचवले आहे आणि त्याला जगभरातून समर्थन मिळते आहे. तिच्या अवस्थांतराविषयी ग्रेटा म्हणते, ‘शाळेत मी अबोल, बुजरी, भिडस्त, मागे राहणारी म्हणून प्रसिद्ध होते. आणि आता मला सतत बोलावे लागत आहे आणि लोक ऐकत आहेत असा विचित्र विरोधाभास घडून आला आहे.’

(नवाकाळ ,लोकसत्ता वरून )

Friday 31 May 2019

एरोमॉडेलिंग









आपल्या रौप्यमोहत्सवी वाटचालीत  संजीवनी परिवार सतत विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम आयोजित करत असते, विद्यार्थ्यांचं कुतुहूल जागृत करणारा शैक्षणिक उपक्रम म्हणजेच आजचा नाविन्यपूर्ण एरोमॉडेलिंग शो.. 







चित्तथरारक व आकर्षक कसरतीनी एरोमॉडेलिंग शो  रंगला.   सुखोई, राफाएल तेजस,  ट्रेनर विमान,  तरंगणारी ग्लायडर उडती तबकडी, बॅनर टोइंग इत्यादी विमानाच्या आकर्षक व थरारक कसरतीने उत्तरोत्तर छान रंगत गेला.   विमान उड्डाण कसं करत , हवेत तरंगत कसं राहते कोलांट्या उड्डया मारताना पाहून विद्यार्थी मंडळी हरखुन गेली.








 


प्रात्यक्षिकाचं उदघाटन महानगर पालिकेचे प्रभाग सभापती श्री निलेश देशमुख ह्यांच्या हस्ते करण्यात आले.









ही प्रात्यक्षिकं ममावती क्रीडा मंडळ सत्पाळे च्या मैदानावर झाली. लिटल विग्स इंडियाच्या श्री सदानंद काळे यांच्या मार्गदर्शना खाली अथर्व व अक्षय काळे यांनी कसरतीचं सुरेख दर्शन घडवलं. श्री राकेश वर्मा यांच्या हेलिकॉफ्टर व फाईटर विमानाच्या कसरतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 
आपल्या विद्यार्थ्यांनी , मुलांनी  क्रिकेट,फुटबॉल , टेनिस इत्यादी छंदाबरोबरच एरोमॉडेलिंग चा छंद जोपासावा त्यातून उद्याचे फाईटर पायलट तयार होतील असं प्रतिपादन सदानंद काळे यांनी केलं.







 त्या अगोदर सेंट जोसेफ महाविद्यायातील सभागृहात श्री सदानंद काळे यांनी  विद्यार्थ्यांशी संवाद साधला सुमारे चारशे विद्यार्थी उपस्थित होते.  त्यांनी  सोप्या व शैलीदार भाषेत विमान शास्र उलगडून दाखवलं. आणि समर्पक ऊत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना विमानांच्या प्रतिकृतींचे संच  बक्षिस दिले.













कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री आनंद पाटील ह्यांनी केले तर अध्यक्षस्थान श्री सुभाष वझे  होते  . सुत्रसंचालन श्री सुनील म्हात्रे ह्यांनी केले.



या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपाध्यक्ष श्री आलेक्स परेरा व विल्सन सर उपस्थित होते त्यांनी
महाविद्यालयातर्फे श्री सदानंद काळे यांना शाल श्रीफळ देऊन स्वागत केलं.






















काही क्षणचित्रं





कार्यक्रमाची कल्पना मांडणारे व त्यासाठी महत्वाच योगदान देणा-या  श्री. योगेश पाटील यांचे काळे सरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाला श्री जयप्रकाश ठाकूर , श्री यशवंत पाटील , श्री प्रफुल ठाकूर, श्री निलेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.















































Monday 13 May 2019

माणसाने माणसाशी माणसासम वागणे हेच आमचे मागणे


आई वडिलांचा आंतरजातीय विवाह मी एक वर्षाचा असताना त्यांची हत्या झाली. आजोबानी (आईच्या वडिलांनी )मला लोणावळ्याच्या बालग्राम मध्ये ठेवलं. आई , बाबा काय असतात हे माहित नाही. इतर मुलांना त्यांचे आईवडील शाळेत सोडायला यायचे तेव्हा आम्ही लपून त्यांच्या कडे पाहायचो आणि वाटायचं असं आम्ही  काय पाप केलं होतं की आम्हाला आई बापाचं प्रेम मिळू नये, असे मनोगत अनाथांचा नाथ , एकता निराधार संघाचा संस्थापक व अठरावर्षावरील अनाथ मुलांचं सामाजिक पुनर्वसन करणाऱ्या श्री सागर रेड्डी यांनी वसईतील संजीवनी व्याख्यानमालेत व्यक्त केले. प्रसिद्ध मुलाखतकार श्रीमती स्मिता गवणकर यांनी  त्यांची मुलाखत घेतली. 


वय वर्ष अठरा पर्यंत आंतरभारती बालग्राम मध्ये आसरा मिळाला. त्यानंतर एकदम रस्त्यावर ,समोर अनेक प्रश्न. रेल्वे स्टेशन वर राहिलो, केबल टाकण्याचं काम केलं. अनेक प्रयत्न नंतर एक दाता मिळाला त्यामुळे इंजिनिअर होऊ शकलो एल अँड टी मध्ये नोकरीला लागलो. दिवाळीच्या वेळी बालग्राम मध्ये भेटण्यासाठी गेलो तेव्हा अप्पू ताईची भेट झाली. ती  अप्पू ताई जिने मला लहानपणी आईची माया दिली होती. लग्नानंतर तिच्यावर दुर्दैव ओढवलं होतं, तिचा चेहरा झोपू देत नव्हता तिथून एकता निराधार संघाची सुरुवात झाली. आज  एकता निराधार संघ महाराष्ट्र ,कर्नाटक आंध्रप्रदेश येथे कार्यरत आहे. . संवादाच्या ओघात त्यांनी संस्थेची कार्यप्रणाली ,पुढील योजना सहभाग कसा देता येईल इत्यादी गोष्टी सांगितल्या.













यावेळी संजीवनी परिवार तर्फे एकता निराधार संघाला एकावन्न हजार रुपयाचा कृतज्ञता निधी अर्पण करण्यात आला. 
माणसाने माणसाशी माणसासम वागणे हेच आमचे मागणे 





































सुरवातीला नरेश जोशी यांनी पाहुण्याची ओळख करून दिली व व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी साह्य करणाऱ्या  वसई जनता सहकारी बँक , बेसिन कॅथॉलिक सहकारी बँक, भारत पेट्रोलियम , इंडियन ऑइल तसेच सर्व जाहिरातदार, हितचिंतक याचे आभार मानले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंत म्हात्रे होते. 








व्याख्यानाला प्रसिद्ध साहित्यिका सौ वीणाताई गवाणकर , वसई जनता बँकेचे श्री महेश देसाई,श्री संतोष देशमुख    बस्सीनं कॅथॉलिक बँकेचे महाव्यवस्थापक श्री आग्नोलो पेम , साब्रा संघाचे अध्यक्ष श्री राजन नाईक , श्री बबनशेठ नाईक,यशवंत पाटील  उपस्थित होते. 








































कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी नाईक हिनं केलं तर ईशस्तवन सौ उर्मिला नाईक हिने सादर केलं. 

तरुणांनी खूप वाचलं पाहिजे खूप ऐकलं पाहिजे.











तरुणांनी खूप वाचलं पाहिजे , खूप ऐकलं पाहिजे सार्वजनिक ठिकाणी जाऊन त्यात सहभागी झालं पाहिजे. मोबाईलची खिडकी म्हणजे सर्व काही नाही. तरुण रंगकर्मीनी काही दिवस  तरी नाटक करायला हवं. त्यातील अनुभव आयुष्यभर पुरेल. नाटक म्हणजे टीम वर्क आहे. ते सर्व टीमचं असतं. असे मार्गदर्शन सिने नाट्य दिग्दर्शक श्री चंद्रकांत कुलकर्णी यांनी वसई तील  संजीवनी व्याख्यानमालेत केलं. नाट्यक्षेत्रातील संशोधक दिग्दर्शक गिरीश पतके यांनी त्यांची मुलाखत घेतली.





 
यावेळी  ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले, युवा काष्ठशिल्पकार श्री सचिन चौधरीचा सत्कार   जेष्ठ रंगकर्मी, निर्माता श्री सुनील बर्वे व लोकप्रिय साहित्यिका वीणाताई गवाणकर ह्याच्य हस्ते करण्यात आला.


आपल्याकडे कीर्तन ,व्याख्यानमाला , श्रवणभक्तीची परंपरा आहे. जोपर्यंत कोणीतरी बोलत राहावे आणि कोणालातरी ऐकत राहावं असं वाटत राहील तो पर्यंत थिएटर जिवंत राहील असं ते पुढे म्हणाले.  





नाटक हे खूप प्रभावी माध्यम आहे. नाटकात पाहिलेली गोष्ट,ऐकलेली वाक्य कायमस्वरूपी   स्मरणात राहतात. नाटकाचं एक शास्र आणि मानसशास्र आहे. ठरवून अंधार करून घेतात व दृश्यमान चौकटीत स्वतः ला जोडून घेत अनुभूती घेत असतात.

















सुरवातीला हेमंत नाईक यांनी पाहुण्याची ओळख व प्रास्ताविक केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्कर्ष मंडळाचे श्री काशिनाथ नाईक होते.   कु. निधी नाईक हिने सूत्रसंचालन केलं तर सौ तेजल पाटील हिने ईशस्तवन सादर केलं. 







कार्यक्रमाला वीणाताई गवाणकर, शिल्पकार सचिन चौधरी श्री सुनील बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.