Friday 31 May 2019

एरोमॉडेलिंग









आपल्या रौप्यमोहत्सवी वाटचालीत  संजीवनी परिवार सतत विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम आयोजित करत असते, विद्यार्थ्यांचं कुतुहूल जागृत करणारा शैक्षणिक उपक्रम म्हणजेच आजचा नाविन्यपूर्ण एरोमॉडेलिंग शो.. 







चित्तथरारक व आकर्षक कसरतीनी एरोमॉडेलिंग शो  रंगला.   सुखोई, राफाएल तेजस,  ट्रेनर विमान,  तरंगणारी ग्लायडर उडती तबकडी, बॅनर टोइंग इत्यादी विमानाच्या आकर्षक व थरारक कसरतीने उत्तरोत्तर छान रंगत गेला.   विमान उड्डाण कसं करत , हवेत तरंगत कसं राहते कोलांट्या उड्डया मारताना पाहून विद्यार्थी मंडळी हरखुन गेली.








 


प्रात्यक्षिकाचं उदघाटन महानगर पालिकेचे प्रभाग सभापती श्री निलेश देशमुख ह्यांच्या हस्ते करण्यात आले.









ही प्रात्यक्षिकं ममावती क्रीडा मंडळ सत्पाळे च्या मैदानावर झाली. लिटल विग्स इंडियाच्या श्री सदानंद काळे यांच्या मार्गदर्शना खाली अथर्व व अक्षय काळे यांनी कसरतीचं सुरेख दर्शन घडवलं. श्री राकेश वर्मा यांच्या हेलिकॉफ्टर व फाईटर विमानाच्या कसरतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 
आपल्या विद्यार्थ्यांनी , मुलांनी  क्रिकेट,फुटबॉल , टेनिस इत्यादी छंदाबरोबरच एरोमॉडेलिंग चा छंद जोपासावा त्यातून उद्याचे फाईटर पायलट तयार होतील असं प्रतिपादन सदानंद काळे यांनी केलं.







 त्या अगोदर सेंट जोसेफ महाविद्यायातील सभागृहात श्री सदानंद काळे यांनी  विद्यार्थ्यांशी संवाद साधला सुमारे चारशे विद्यार्थी उपस्थित होते.  त्यांनी  सोप्या व शैलीदार भाषेत विमान शास्र उलगडून दाखवलं. आणि समर्पक ऊत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना विमानांच्या प्रतिकृतींचे संच  बक्षिस दिले.













कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री आनंद पाटील ह्यांनी केले तर अध्यक्षस्थान श्री सुभाष वझे  होते  . सुत्रसंचालन श्री सुनील म्हात्रे ह्यांनी केले.



या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपाध्यक्ष श्री आलेक्स परेरा व विल्सन सर उपस्थित होते त्यांनी
महाविद्यालयातर्फे श्री सदानंद काळे यांना शाल श्रीफळ देऊन स्वागत केलं.






















काही क्षणचित्रं





कार्यक्रमाची कल्पना मांडणारे व त्यासाठी महत्वाच योगदान देणा-या  श्री. योगेश पाटील यांचे काळे सरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाला श्री जयप्रकाश ठाकूर , श्री यशवंत पाटील , श्री प्रफुल ठाकूर, श्री निलेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.















































Monday 13 May 2019

माणसाने माणसाशी माणसासम वागणे हेच आमचे मागणे


आई वडिलांचा आंतरजातीय विवाह मी एक वर्षाचा असताना त्यांची हत्या झाली. आजोबानी (आईच्या वडिलांनी )मला लोणावळ्याच्या बालग्राम मध्ये ठेवलं. आई , बाबा काय असतात हे माहित नाही. इतर मुलांना त्यांचे आईवडील शाळेत सोडायला यायचे तेव्हा आम्ही लपून त्यांच्या कडे पाहायचो आणि वाटायचं असं आम्ही  काय पाप केलं होतं की आम्हाला आई बापाचं प्रेम मिळू नये, असे मनोगत अनाथांचा नाथ , एकता निराधार संघाचा संस्थापक व अठरावर्षावरील अनाथ मुलांचं सामाजिक पुनर्वसन करणाऱ्या श्री सागर रेड्डी यांनी वसईतील संजीवनी व्याख्यानमालेत व्यक्त केले. प्रसिद्ध मुलाखतकार श्रीमती स्मिता गवणकर यांनी  त्यांची मुलाखत घेतली. 


वय वर्ष अठरा पर्यंत आंतरभारती बालग्राम मध्ये आसरा मिळाला. त्यानंतर एकदम रस्त्यावर ,समोर अनेक प्रश्न. रेल्वे स्टेशन वर राहिलो, केबल टाकण्याचं काम केलं. अनेक प्रयत्न नंतर एक दाता मिळाला त्यामुळे इंजिनिअर होऊ शकलो एल अँड टी मध्ये नोकरीला लागलो. दिवाळीच्या वेळी बालग्राम मध्ये भेटण्यासाठी गेलो तेव्हा अप्पू ताईची भेट झाली. ती  अप्पू ताई जिने मला लहानपणी आईची माया दिली होती. लग्नानंतर तिच्यावर दुर्दैव ओढवलं होतं, तिचा चेहरा झोपू देत नव्हता तिथून एकता निराधार संघाची सुरुवात झाली. आज  एकता निराधार संघ महाराष्ट्र ,कर्नाटक आंध्रप्रदेश येथे कार्यरत आहे. . संवादाच्या ओघात त्यांनी संस्थेची कार्यप्रणाली ,पुढील योजना सहभाग कसा देता येईल इत्यादी गोष्टी सांगितल्या.













यावेळी संजीवनी परिवार तर्फे एकता निराधार संघाला एकावन्न हजार रुपयाचा कृतज्ञता निधी अर्पण करण्यात आला. 
माणसाने माणसाशी माणसासम वागणे हेच आमचे मागणे 





































सुरवातीला नरेश जोशी यांनी पाहुण्याची ओळख करून दिली व व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी साह्य करणाऱ्या  वसई जनता सहकारी बँक , बेसिन कॅथॉलिक सहकारी बँक, भारत पेट्रोलियम , इंडियन ऑइल तसेच सर्व जाहिरातदार, हितचिंतक याचे आभार मानले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंत म्हात्रे होते. 








व्याख्यानाला प्रसिद्ध साहित्यिका सौ वीणाताई गवाणकर , वसई जनता बँकेचे श्री महेश देसाई,श्री संतोष देशमुख    बस्सीनं कॅथॉलिक बँकेचे महाव्यवस्थापक श्री आग्नोलो पेम , साब्रा संघाचे अध्यक्ष श्री राजन नाईक , श्री बबनशेठ नाईक,यशवंत पाटील  उपस्थित होते. 








































कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निधी नाईक हिनं केलं तर ईशस्तवन सौ उर्मिला नाईक हिने सादर केलं. 

तरुणांनी खूप वाचलं पाहिजे खूप ऐकलं पाहिजे.











तरुणांनी खूप वाचलं पाहिजे , खूप ऐकलं पाहिजे सार्वजनिक ठिकाणी जाऊन त्यात सहभागी झालं पाहिजे. मोबाईलची खिडकी म्हणजे सर्व काही नाही. तरुण रंगकर्मीनी काही दिवस  तरी नाटक करायला हवं. त्यातील अनुभव आयुष्यभर पुरेल. नाटक म्हणजे टीम वर्क आहे. ते सर्व टीमचं असतं. असे मार्गदर्शन सिने नाट्य दिग्दर्शक श्री चंद्रकांत कुलकर्णी यांनी वसई तील  संजीवनी व्याख्यानमालेत केलं. नाट्यक्षेत्रातील संशोधक दिग्दर्शक गिरीश पतके यांनी त्यांची मुलाखत घेतली.





 
यावेळी  ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले, युवा काष्ठशिल्पकार श्री सचिन चौधरीचा सत्कार   जेष्ठ रंगकर्मी, निर्माता श्री सुनील बर्वे व लोकप्रिय साहित्यिका वीणाताई गवाणकर ह्याच्य हस्ते करण्यात आला.


आपल्याकडे कीर्तन ,व्याख्यानमाला , श्रवणभक्तीची परंपरा आहे. जोपर्यंत कोणीतरी बोलत राहावे आणि कोणालातरी ऐकत राहावं असं वाटत राहील तो पर्यंत थिएटर जिवंत राहील असं ते पुढे म्हणाले.  





नाटक हे खूप प्रभावी माध्यम आहे. नाटकात पाहिलेली गोष्ट,ऐकलेली वाक्य कायमस्वरूपी   स्मरणात राहतात. नाटकाचं एक शास्र आणि मानसशास्र आहे. ठरवून अंधार करून घेतात व दृश्यमान चौकटीत स्वतः ला जोडून घेत अनुभूती घेत असतात.

















सुरवातीला हेमंत नाईक यांनी पाहुण्याची ओळख व प्रास्ताविक केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्कर्ष मंडळाचे श्री काशिनाथ नाईक होते.   कु. निधी नाईक हिने सूत्रसंचालन केलं तर सौ तेजल पाटील हिने ईशस्तवन सादर केलं. 







कार्यक्रमाला वीणाताई गवाणकर, शिल्पकार सचिन चौधरी श्री सुनील बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. 




विचाराची कमळें उमलवणारा विचार सूर्य म्हणजे कबीर.



 
कहत कबीर सुनो भाई साधो म्हणजे  कबीर सांगतात  ऐका  विचार करा आणि साध्य करा. असा  मतितार्थ आहे  असे प्रतिपादन सुप्रसिद्ध निवेदिका , संत साहित्याच्या अभ्यासक श्रीमती धनश्री लेले यांनी वसईतील  संजीवनी व्याख्यानमालेत प्रथम पुष्प गुंफताना केले . त्या "कहत कबीर" या विषयावर बोलत होत्या. महाराष्ट्रांत संत ज्ञानेश्वर , तुकाराम महाराज, स्वामी रामदास तसे उत्तरेत संत कबीर. मनामनात विचाराची कमळें उमलवणारा विचार सूर्य म्हणजे कबीर.








 ते सांगतात मी हिंदू नाही मुसलमान ही नाही मी माणूस आहे.  त्यांनी दोन्ही धर्मातील वाईट चालीवर प्रहार केले . एक वेळ ते म्हणतात  मुल्ला होकर बांग पुकारे वो क्या साहेब बहिरा है । त्याच बरोबर हेही सांगतात की " पत्थर पूजे हरी मिले तो मैं पूजूँ पहाड़ ।"

संजीवनी व्याख्यानमालेला  एक अधिष्ठान प्राप्त झाल्याचं त्यांनी सुरवातीला सांगितलं आणि परिवाराला रौप्यमहोत्सवी वाटचाल पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं.
 




त्यांनी पुढे संत कबीरा च्या दोह्यातील  आणि संत तुकारामाच्या अभंगातील साम्यस्थळं  उलगडून दाखवली.   तसेच पंढरपूर व तुळशीमाळ व बुक्क्याचा उल्लेख कहत कबीर  हरिसे मिठा लागे तुळशी बुक्का ह्या दोह्यांचा दाखल देऊन केला.  


सुरवातीला श्रीमती अनिता नाईक यांनी प्रास्ताविक व पाहुण्याची ओळख करून दिली अध्यक्षस्थानी  केएमपीडी  स्कुल च्या मुख्याध्यपिका श्रीमती वंदना नाईक होत्या  कु धनाली जोशी हिने  सूत्रसंचालन केलं. सौ रीमा नाईक हिने ईशस्तवन सादर करून  सूंदर वातावरण निर्माण केलं तर  कौस्तुभ पाटील व मंगेश नाईक यांनी सुरेख साथ दिली. 
 



रसिक ,जाणकार , योग्य ठिकाणी दाद देणारे श्रोते हेच वक्त्यांना प्रोत्साहित करत असतात असे श्रोते लाभणं ही वक्त्यांची पुण्याई




भाषणाच्या ओघात आलेले काही दोहे. कबिरा विषयी औसुक्य वाढवणारे होते 
  • "हरी को धुंडन मै चला, जा पोहोचा हरीद्वार, पग थके, हरी न मिले, क्यूकी हरी थे मेरे द्वार" 
  • मुल्ला होकर बांग पुकारे वो क्या साहेब बहिरा है
  • " पत्थर पूजे हरी मिले तो मैं पूजूँ पहाड़ ।"
  • गुरु तो ऐसा चाहिए, शिष्य सों कछु न लेय। शिष तो ऐसा चाहिए, गुरु को सब कुछ देय।। 
  •  नैनम मे श्याम बसे 
  • मागनसे  मरना भले 
  • छोड दिया बैकुठं हरी भाव भगतका भुखा