Wednesday, 4 March 2026

स्वस्थता - आरोग्य - आहार

 

आयुर्वेदानुसार स्वस्थ असणे म्हणजे काय?  

समदोषः समाग्निश्च समधातु-मलक्रियः । प्रसन्नात्मेन्द्रिय-मनः स्वस्थ इत्यभिधीयते ॥    सुश्रुतसंहिता (सूत्रस्थान 15.41)

ज्याच्या त्रीदोष, अग्नि, धातू आणि मलक्रिया संतुलित आहेत, तसेच ज्याचे आत्मा-इंद्रिये-मन प्रसन्न आहेत, तो मनुष्य “स्वस्थ” मानला जातो.

समदोषता (Homeostasis): वात-पित्त-कफ यांचे संतुलन म्हणजे शारीरिक कार्यांची सुसूत्रता.

समाग्नि (Metabolic balance): पचन व रूपांतरण-क्रिया योग्य; अति/मंद अग्नि नसणे.  (जठराग्नि, भूताग्नि व धात्वाग्नि-पचन, पंचभुताचे अंशीकरण, सप्तधातूचे पोषण रूपांतरंण )

समधातु (Tissue integrity):  धातूंचे (सप्तधातू -रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र) पोषण, निर्माण व क्षय - प्रक्रिया संतुलित.

मलक्रिया-सम्यकता (Elimination): मल ((पुरीष, मूत्र, स्वेद) निर्मिती व उत्सर्जन नियमानुसार.

मानसिक-आध्यात्मिक प्रसन्नता: केवळ रोगाभाव नव्हे; शरीर + मन + आत्म यांचे सम्यक स्वास्थ्य.

 

दिनचर्या, ऋतुचर्या, आहारचर्या  दिनचर्या कशी असावी आणि ऋतु प्रमाणे आपला आहार कसा असावा या विषयी मार्गदर्शक तत्त्वे.

ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठेत् स्वस्थो रक्षार्थमायुषः। दन्तधावनं तु कर्तव्यं कषायकटुतिक्तकैः।

 अभ्यङ्गं आचरेन्नित्यं स जराश्रमवातहः। अर्धशक्त्या तु व्यायामः।


आयुष्याचे रक्षण करण्यासाठी निरोगी मनुष्याने ब्रह्ममुहूर्ताला उठावे. कडू-तिखट-कषाय द्रव्यांनी दात स्वच्छ करावेत. दररोज तेलाने अभ्यंग करावा; तो वार्धक्य, थकवा व वात कमी करतो. आपल्या शक्तीच्या अर्ध्या मर्यादेपर्यंत व्यायाम करावा.

 

हेमन्तशिशिरौ शीतौ, वसन्तो ग्रीष्म एव च।
 
सहा ऋतू — हेमंत, शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद.

तत्रानुसारतः कुर्यात् आहारविहारविनियमम्।”
 प्रत्येक ऋतूनुसार आहार-विहार बदलावा.

ऋतु प्रमाणे काय खावे याचे संक्षिप्त नियम   निसर्ग जसा बदलतो, तसा आहार-विहार बदला.”
उष्णतेत शीतलता, थंडीत उष्णता, दमटपणात हलकेपणा, कोरडेपणात स्निग्धता. विरुद्धगुणांनी दोष संतुलित करणे हेच ऋतुचर्येचे तत्त्व.

( ऋतु , मराठी,इंग्रजी महीने , शरीरात होणारे दोष , आहाराची घ्यायची काळजी .)

वसंत:                चैत्र–वैशाख, Mar–May -  कफ प्रकोप लघु, रुक्ष, कडू-तिक्त-कषाय; उद्वर्तन, व्यायाम वाढवा.

ग्रीष्म:                 ज्येष्ठ–आषाढ, May–Jul     अग्नि मंद, वात संचय शीतल, द्रव, मधुर; श्रम कमी, दिवा-निद्रा अल्प.

वर्षा:                 श्रावण–भाद्रपद , Jul–Sep    अग्नि दुर्बल लघु, उष्ण, आंबट-लवण; उकळलेले पाणी, स्वच्छता.

शरद:                आश्विन–कार्तिक, Sep–Nov  पित्त प्रकोप तिक्त, मधुर, शीतल; सूर्यताप टाळा.

शीत ऋतु हेमंत:     मार्गशीर्ष–पौष,   Nov–Jan   अग्नि तीव्र गुरु, स्निग्ध, उष्ण आहार; अभ्यंग, व्यायाम.

शीत ऋतु शिशिर:  माघ–फाल्गुन, Jan–Mar     अग्नि तीव्र गुरु, स्निग्ध, उष्ण आहार; अभ्यंग, व्यायाम.

 

आहाराविषयी आयुर्वेद काय म्हणतो आहे.  इकडे मात्रा म्हणजे प्रमाण.

 

मात्राशी स्यात्। उष्णं स्निग्धं मात्रावद् जीर्णे वीर्याविरुद्धम्। अजीर्णे भोजनं विषम्।


योग्य प्रमाणात आहार घ्यावा. मात्रा-नियमन: अर्धपेट अन्न, चतुर्थांश जल, चतुर्थांश रिक्त. उष्ण, स्निग्ध, योग्य प्रमाणात

आधीचे अन्न पचल्यावर व विरुद्ध गुण नसलेले अन्न घ्यावे. 

अपचनावर भोजन करणे म्हणजे विषासमान.

Wednesday, 28 January 2026

माझी देवपूजा !

  भगवंताला प्रिय असलेली आठ पुष्पे. 

काल आदरणीय सुधा मूर्ती कडून एक श्लोक एकला,  त्यांत  विष्णू ला प्रिय असलेल्या आठ पुष्पा चे वर्णन आहे. 

अहिंसा प्रथमं पुष्पं पुष्पमिन्द्रियनिग्रहः । सर्वभूतदयापुष्पं क्षमापुष्पं विशेषतः ॥

ज्ञानपुष्पं तपः पुष्पं ध्यानपुष्पं तथैव च । सत्यपुष्पमष्टमं प्रोक्तं विष्णोः प्रीतिकरं भवेत् ||

 

दररोज देवपूजेत फुलेहारअक्षता अर्पण करतात . भारतीय आध्यात्मिक परंपरा सांगते की भगवंताला बाह्य फुलांपेक्षा अंतःकरणातील सद्गुण अधिक प्रिय असतात. हेच सत्य सांगणारा एक अत्यंत सुंदर श्लोक पद्मपुराण / स्कंदपुराण (भक्ती-कांड) मध्ये आहे — (अष्टपुष्पी).  श्लोकात भगवंताला अर्पण करावयाची आठ श्रेष्ठ पुष्पे सांगितली आहेत. हाच संदर्भ मा. सुधा मूर्ती देत होत्या. 

या श्लोकात पाठभेद आहे. काही ठिकाणी ज्ञान तप एवजी दान आणि योग असा भेद आहे. त्याचं कारण ही आहे. ज्ञान आणि तप कठीण आहे. परंतु सर्वसामान्य लोकांना दान आणि योग आचरणात आणता येतील.  

 

अहिंसा प्रथमं पुष्पं पुष्पमिन्द्रियनिग्रहः । सर्वभूतदयापुष्पं क्षमापुष्पं विशेषतः ॥

ध्यानपुष्पं दानपुष्पं योगपुष्पं तथैव च । सत्यपुष्पमष्टमं प्रोक्तं विष्णोः प्रीतिकरं भवेत् ॥

 

पहिले पुष्प आहे अहिंसाकोणत्याही जीवाला विचाराने, शब्दाने किंवा कृतीनेही इजा न करणे. अहिंसा हीच सर्व धर्मांची मुळं आहेत.

दुसरे पुष्प आहे इंद्रियनिग्रहआजच्या भोगप्रधान काळात इंद्रियांवर संयम ठेवणे ही खरी साधना आहे.

तिसरे पुष्प आहे सर्वभूतदयासर्व प्राणीमात्रांविषयी करुणा ठेवणे. देव मंदिरात नसून प्रत्येक जीवामध्ये आहे, ही जाणीव.

चौथे पुष्प आहे क्षमाअपमान सहन करूनही द्वेष न बाळगणे. क्षमा ही दुर्बलतेची नव्हे, तर आत्मिक शक्तीची निशाणी आहे.

पाचवे पुष्प आहे ज्ञानआत्मा आणि परमात्म्याचा विवेक, अज्ञानाचा नाश करणारे तेज.

सहावे पुष्प आहे तपकेवळ उपवास नव्हे, तर मन, वाणी आणि आचरणाचे शुद्धीकरण.

सातवे पुष्प आहे ध्यानईश्वरचिंतनात मन स्थिर करणे, अंतर्मुख होणे.

आणि आठवे, अंतिम पुष्प आहे सत्यविचार, शब्द आणि कृती यांची एकरूपता.

पाठभेदतील दोन गुणां विषयी.

 दानगरजूंसाठी आपले काहीतरी देणे. दान म्हणजे केवळ धन नव्हे, तर वेळ, श्रम आणि ममत्व अर्पण करणे.

  योगजीवनात संतुलन. कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा समन्वय.

 

ही आठ पुष्पे जर आपल्या जीवनात उमलली, तर देव वेगळा शोधावा लागत नाही. आपले जीवनच पूजा बनेल.