Wednesday, 2 January 2013

राजस्थान दर्शन








गरीबरथ    बोरीवली ते जयपूर (२२ सकाळी ७ वाजता )

 जयपूर  दर्शन

   लक्ष्मीनारायण मंदिर : मोती डुंगरी च्या पायथ्याशी सफेद संगमरवरी मंदिर. सुबक लक्ष्मीनारायण मूर्ती व सुंदर  नक्षीकाम  हे वैशिष्ट. परिसर व छान  बाग. गुलाबी  रंगाची  बोगनवेल.   १९८८ मध्ये बिर्ला कुटुंबीयांनी बांधले
 जंतरमंतर   जयपूर:  जंतरमंतर, महाराज जयसिंग यांची आकाशाचा वेध घेणारी   अशी, अभूतपूर्व प्रयोगशाळा. सूर्याच्या सावली  वरून  जयपूर शहराची  वेळ पाहण्याचे   यंत्र     आकाशातील ग्रहस्थिती, राशी ठरवण्याचे यंत्र, ध्रुव पट्टी,अशी अनेक यंत्र. अभ्यासाचा विषय आणि आम्हाला कंटाळा



अमेर पॅलेस : जयपूर शहर वसण्याअगोदरची राजधानी आमेर राजवाडा. राजा मानसिग, मिर्झा राजा जयसिंग आणि सवाई जयसिंग अशा तीन पिढ्यांनी दोन शतके हे  बांधकाम केले असे सांगतात. मावठा सरोवरातील शांत पाणी, राजवाडा पाहण्यासाठी कठीण चढाचा रस्ता चढावा लागतो.  येथेच असलेली राजघराण्याची  कुलदेवता प्राणप्रतिष्ठा करून तिची स्थापना करण्यात आली आहे . उद्यान राजवाडा आरसे, जडाव काम महाराणी छत्री, राजांची स्मारके,


सिटी पॅलेस :  हे येथल्या अनेक आकर्षणातील एक. जुन्या शहराच्या मध्यभागी असलेला हा राजवाडा   राजस्थानी  आणि   मुघल शैलीचा उत्तम नमुना आहे. भुर्‍या   पांढर्‍या  संगमरवरी स्तंभावर असलेल्या कोरीव कमानी, सोनेरी रंगीत खड्यांच्या फुलांच्या नक्षीकामाने जविलेल्या आहेत. दि पॅलेस येथील   संग्रहालयात आहेत  राजांचे पेहराव, मुगल व रजपूत राजांची शस्त्रास्त्रे, तलवारी, रत्नजडीत सुंदर  म्याने, कलादालनात आहेत पेंटिग्ज, गालिचे,   राजांच्या वापरातल्या वस्तू, साडेपाच किलोची तलवार

 हवा महाल         हवामहल हे येथील आणखी एक आकर्षण. पाच मजली ही गुलाबी रंगाच्या दगडात बांधली गेलेली वास्तू जाळीच्या वाळूच्या खिडक्यांनी अधिक सुंदर बनली आहे.राजघराण्यातील स्त्रियांना शहरातील चहलपहल, मिरवणुका पाहता याव्यात म्हणून ही वास्तू बांधली गेल्याचे सांगतात.

पिंक सिटी        १८७६ मध्ये तत्कालीन महाराज सवाई मानसिंग यांनी इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स ऑफ वेल्स युवराज अल्बर्ट यांच्या स्वागतासाठी पूर्ण शहर  गुलाबी रंगाने रंगवले होते. तेव्हापासूनच शहराचे नाव गुलाबी शहर म्हणजेच पिंक सिटी असे नाव पडले आहे.


 रणथंबोर :  राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्हय़ातील अरवली पर्वत आणि विंध्य पर्वतामध्ये हे राष्ट्रीय उद्यान , व्याघ्र प्रकल्प. बंद असलेली सफारी नुकतीच सुरु  होती.  अधिक  पदरमोड करून  हे   स्थळ आयत्यावेळी घेतले. उघड्या जिप्सी मधून व काही जणांनी उघड्या ट्रव्हलर मधून जंगल दर्शन  घेतले. मोर,इतर पक्षी, हरणं , मोठ्या  मोठ्या  शिंगाची  सांबर, रानगाई ,रानमांजर याचं दर्शन झाले. परंतु ज्याच्या साठी  उत्सुकता होती तो रुसून/  लपून  बसला होता. तो आजूबाजूला  आहे याची  ग्वाही पावलाचे ठसे बघून चालक  देत होता, वेडीवाकडी वळण घेऊन पाठपुरावा चालला होता. मन निराश झालं होतं. इतक्यात दुस-या चालकाचा मेसेज आला.  त्यांना तो दिसला. क्षणार्धात चालकांनी जिप्सी त्या ठिकाणी नेली. तो झाडाच्या  आड स्वस्थ बसला होता. राज्याचाच रुबाब होता. फोटो घ्यायची घाई होती. प्रत्यक्ष दर्शन झाले, प्रतीमा राहून गेली. थोड्यावेळे नंतर स्वारी उठली,मोठी जांभई  देऊन जबडा दाखवला,पुढच्या पायावर ताण देऊन आळस झटकून जंगलाकडे वळला, भेटीची वेळ संपल्याची ती खुण होती. आमच्या सगळ्याच्या चेह-यावर     त्याच्या भेटीचा आनंद दिसत होता. उघड्या वाहनातील  बोचरी हवा आणि थंडी हा एक  अनुभव होता. जंगलातही नियम असतात हे विसरल्यामुळे अतीप्रसंग ओढवणार होता परंतु टळला. 





 जयपूर ते अजमेर  

  अजमेर दर्गा:  अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा हे भारतातील मुस्लिमांचे सर्वांत पवित्र स्थळ आहे. मुस्लिमांशिवाय इतर धर्मातील लोकही या दर्ग्याच्या दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे एका अर्थी हे स्थळ राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. हा दर्गा म्हणजे प्रसिद्ध मुस्लिम संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांची समाधी आहे.  दर्ग्याच्या समोरच मोठी डेंग (भले मोठे पातेले) ठेवले आहे. बादशाह अकबर व जहांगीरने ते दिल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून आजपर्यंत त्यात काजू, बदाम, इलायची, केशर टाकून खीर  केली जाते व गरीबांना वाटली जाते



 पुष्कर  ब्रह्मदेव मंदिर  राजस्थानातील अजमेर जिल्ह्यात पुष्कर गावात श्री ब्रह्मा चे प्रसिध्द मंदिर आहे. ,पुष्कर तळया च्या काठी बसलेले आहे. एका बाजूला इंद्र (वारीपती) तर दुस-या बाजूला  कुबेर (धनपती)  व्दारपाल आहेत. वेळे चे नियोजन न केल्या मुळे पुष्कर मेळा हुकला.
  ब्रम्ह घाट  - एक दिवस  अगोदरच बाळासाहेब यांच्या अस्थी विसर्जित केल्याचे सागितले.    छानसा जोधपुरी फेटा घेतला





 अजमेर ते बिकानेर                               
 करणीमाता देवूळ :  करणीमाता मंदिर ही नवलाई. बिकानेरहून 30 कि.मी. दूरवर देशनोक गाव.   तिथले करणीदेवीचे मंदिर म्हणजे उंदरांचे  मंदिर. उंदरांना  ‘काबा’  म्हटले जाते. अरे हो उन्दिरात हि भेदभाव आहे. जे मंदिराच्या गाभा-यात आहेत ते  अधिक पुण्यवान व बाहेर आहेत ते कमी पुण्यवान. उंदीराना   दुध मिठाई चा  भोग दिला जातो. मंदिरातील उंदीर बाहेरच्या उंदिराना आत येऊ देत नाहीत.उंदीरा मध्ये सुध्दा आहेरे नाहीरे  चा संघर्ष आहे.





 उंट संशोधन केंद्र   : बिकानेर जिल्ह्यात उंट संशोधन केंद्र  आहे. उंटाच्या  वेगवेगळ्या जाती आहेत. मेवाडी, राजस्थानी , जुनागड(गुजरात ), उंटाचे संग्रहालय , उंटाच्या दुधाचे आईसक्रिम,   दुधाचा चहा विक्री केंद्र  , उंट  सफारी हि आकर्षण. 



  
                                   
बिकानेर          

 जुनागढ (लालगढ )  सन १४८८ मध्ये राव भिकाजी याने वसवलेले हे शहर राजा रायंसंग याने बांधलेला जुनागढ फोर्ट साठी प्रसिद्ध आहे. ३७ बुरूज आणि ९८६ मीटर लांबीची भिंत असलेल्या किल्ल्यातील राजवाडे प्रेक्षणीय. चंद्रमहल, फूलमहाल येथील कांचेवरील नक्षीकाम व आरसे अप्रतिम  
  

  बिकानेर ते जैसलमेर  संपूर्ण दिवस प्रवासात  तंबूत राहण्याची व्यवस्था   (२७)  दुस-या दिवशी पटवारी कि हवेली  गडीसर  तलाव 

 संध्याकाळी थर वाळवंट व सूर्यास्त ,
काही मंडळीनी उंट सवारीचा अनुभव घेतला तर काहींनी  उंटाचा  त्रास वाचविण्यासाठी  उंट गाडीचा आसरा घेतला. वाळवंट छानच पण माणसाच्या गर्दीमुळे  नैसर्गिकता हरवली.   राजस्थानी लोककला कार्यक्रम

      जोधपुर
                       १४५९ मध्ये राव जोधा  यांनी हे शहर वसवले म्हणून  जोधपुर. मेहरान गढ १२५ मीटर उंच पहाडा वर राव जोधा  नि  पाया  भरणी  केली नंतरच्या  मानसिंह , सवाई  जयसिंह    यांनी  वेगवेगळ्या  इमारती बांधल्या. मोती महल ,  सुख महल फुल महल  मेहरान  गढ  (मयूर गढ ) खासगी मालकी   जोधपुर राव जाधोजी वारश्या कडे.
 मेहरान गढ पाहील्या नंतर खरेदीचा  अवघड किल्ला  सर केला. बाधणी ची साडी,ड्रेस मटेरिअल , कॉटन , सिफोन, सिल्क , पल्लू, ब्लौस पीस, किनार ,काठ, पदर  आणि    काय  काय?

 माउंट अबू     सूर्यास्त  Sun Set point







      
                                    नक्कीलेक,    प्रजापती ब्र्हम्कुमारी मंदिर  गुरुशिखर गुरु दत्त मंदिर.



  देलवाडा जैन मंदिर  ११ ते १३ व्या शतकातील  मंदिरं , संगमरवरा  वरील अजोड नक्षीकाम हे विशेष, परिसरात  हर अर्देशवर मंदिर, खरतरसाही पाशवर्नाथ मंदिर आणि  भगवन महावीर स्वामी मंदिर आहेत     ( तीनही  मंदिर छता वरील कोरीव काम लाजबाब.)






 उदयपुर





१ डिसेंबर   हळदीघाट  पाहीला  महाराणा प्रताप यांच्या ऐतिहासिक कामगिरीची आठवण झाली. स्वामी भक्त  चेतक घोडा. 







                           
 उदयपुर चे प्रमुख आकर्षण म्हणजे सिटी पॅलेस आणि लेक पॅलेस.सिटी पॅलेस उदय मिर्झा सिंग ने १५५९ मध्ये पिचोला ह्या सरोवराच्या किनार्‍यावर बांधला. ह्या  महालात हॉटेल, म्युझियम, मंदिर,  आहे  २४ व्या पिढीचे राजे अरविंदसिंह आहेत.





 उदयपुर ते जयपूर (४१८  कि ) संध्याकाळी जयपूरच्या रजई फाक्टोरीत  खरेदी.  खरेदीतील आनंद     दुस-या   कोणत्याच गोष्टीत नसल्याचे जाणवले.



 
 जयपूर  दुपारी २.३०  ते बोरीवली दुस-या दिवशी सकाळी ७.२०.

Friday, 28 December 2012

रतन टाटा सर





 आज २८ डिसेंबर २०१२ टाटा ग्रुप चे अध्यक्ष सर रतन टाटा  यांचा ७५ वा वाढदिवस. त्यांनीच केलेल्या नियमा प्रमाणे आज ते निवृत्त होत आहेत. टाटा उद्योग विश्वाचे वारस  म्हणून
श्री सायरस मेस्त्री  कडे सूत्र सोपवून.




दादाभाई नौरोजी यांना आपण भारतीय स्वातंत्र्याचे पितामह मानतो तसेच जमशेटजी टाटा हे भारतीय उद्योजकतेचे जनक मानले जातात. स्वामी विवेकानंद  शिकागोला जाताना सर  जमशेट्जी   टाटा सहप्रवासी होते. स्वामीजींनी टाटाना सागितले कि नुसते तंत्रज्ञान आयात न करता आपल्याकडील मनुष्यबळ कसे विकसित होईल या कडे लक्ष द्यायला हवे व आपले मित्र  म्हैसूरच्या महाराजांना जमशेदजींना हवे असलेले साहाय्य करण्यास सांगितले. त्यातून प्रेरणा घेऊन  म्हैसूर येथे जमशेदजींनी यांनी  ‘भारतीय विज्ञान अनुसंधान संस्था’  (Research Institute of Science for India) स्थापन केली. असं पूर्व संचित लाभलेला, टाटा समूह हा राष्ट्रासाठी समृध्दी निर्माण करणारा उद्योग समूह आहे.

144 वर्षांची प्रदीर्घ  परंपरा असणाऱ्या या उद्योगसमुहाचे नेतृत्व असे होते, आहे..
1868-1904 : जमशेटजी टाटा 
1904-1932 : सर दोराबजी टाटा
1932-1938 :
सर नौरोजी साफलाटावाला
1938-1991 :
जे.आर.डी. टाटा 
1991-2012 : 
रतन टाटा
2012 ,   : सायरस मेस्त्री 

रतन टाटा ह्यांनी १९६२ साली अमेरिकेत कॉर्नेल विद्यापीठात स्थापत्यशास्त्रातील पदवी मिळवली. नवीन काहीतरी डिझाइन करायचे वेड त्यांना तेव्हापासूनच होते. आय.बी.एम.मध्ये नोकरी मिळत असूनही आजारी आजीसाठी रतन टाटा भारतात परतले. सुरवातीला टिस्को मध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरी केली ती अगदी थेट तेथील शॉप फ्लोअरवर! काही हजार कामगारांमधील एक कामगार बनून!  १९७१ साली टाटा समूहातील नेल्को कंपनीच्या कार्यकारी संचालक पदावर नेमणूक झाली. एकंदरीत वाईट परिस्थिती सुधारण्या पलीकडे होती. १९७७ मध्ये त्यांना एम्प्रेस मिलची जबाबदारी देण्यात आली. ह्या कापड गिरणीची अवस्थाही वाईट होती. कुप्रसिद्ध कापड उद्योगातील संपाने एम्प्रेस मिल हि बंद पडली. १९८१ साली टाटा इंडस्ट्रीज त्यांच्याकडे आली. टाटा इंडस्ट्रीजच्या माध्यमातून त्यांनी टाटा टेलिकॉम , केल्ट्रॉन , फायनान्स , हनीवेल , एलेक्सी अशा कंपन्यांची सुरुवात केली. १९८८ साली. सुमंत मुळगावकरांकडून त्यांनी  टेल्को ची सूत्रे घेतली. त्याच वेळी कामगाराचा मोठा संप झाला. कामगार नेते राजन नायर जोरात होते. रतन टाटांनी कामगारांना सागितले कि  तुम्ही माझ्या डोक्याला  गन  लावल  तर  तुम्ही चाप ओढू शकता किंवा गन खाली ठेवू शकता मी डोके हलवणार नाही. अश्या ठाम व मुत्सद्दीपणे त्यांनी संप मिटवला.
१९९१ साली त्यांनी टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतली. त्यावेळी जे आर डी च्या जुन्या सहका-या कडून त्यांना सहकार्य मिळाले नाही. काही ठिकाणी विरोध झाला. पुढे यातील काही मंडळी निवृत्त झाली. त्यांनी संपूर्ण समूहात सुसूत्रता आणली. लोगो पासून कंपनीच्या नावापर्यंत सुलभता आणली जसे टेल्को चे टाटा मोटार्स झाले.
जागतिक स्तरावरील हॉटेल, टेटली,कोरस ह्या कंपन्या टाटा समूहात आणल्या. टाटा समूह आंतरराष्ट्रिय स्तरावर नेला. १९९१ साली रतन टाटा समूहाचे अध्यक्ष झाले तेव्हा समूहाचे बाजारमूल्य ७९४३ हजार कोटी होते. आज ते ४,६२,००० हजार कोटी आहे. २१ वर्षात ५८ पटीने वाढले   यावरून त्यांच्या कामाचा झपाटा, प्रगतीचा वेग लक्षात येतो. उद्योगातील प्रगती, महसूल मधील वाढ या साठी टाटा उद्योग समूह ओळखला जात नाही. टाटा समूहाची ओळख आहे. राष्ट्रीय संपत्ती निर्माण करणारा समूह, टाटा  म्हणजे सामाजिक बांधिलकी.  २६/११ ला ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या कामगारांना , परिसरातील बळी पडलेल्या सगळ्यांना मदत केली. त्यांच्या घरी जाऊन रतन टाटांनी विचारपूस केली. टाटांनी आपल्या कार्यशैली तून जगभर आपल्या विषयी विश्वास निर्माण केला आहे. त्याचा अनुभव ब्रिटन मधील एक कंपनी घेताना आला. तेथील कामगारांनी मागणी केली कि आमची कंपनी टाटांनी घ्यावी. टाटा म्हणजे  विश्वासार्हता.
अशी मोठी परंपरा , इतिहास असणा-या टाटा समूहाचा वारसा श्री सायरस मेस्त्री कडे देताना  सर रतन टाटा सांगतात "'एखाद्याला आपल्या प्रभावाखाली ठेवणे मला योग्य वाटत नाही,'तुम्ही नेहमी 'स्वतःचे' असायला हवे. तुम्हाला स्वतःला काय वाटते ते नेहमी ऐका आणि तुम्हाला काय करायचे आहे ते ठरवा.'

आपल्या लाडक्या  कुत्र्यां बरोबर