आपलं
सुख म्हणजे इंद्रियाचे सुख. इंद्रियांच्या मागणीला शेवट नसतो. मना सारखे घडले कि
सुख नाही तर दु:ख.
ज्ञानेश्वर
माऊली ज्ञानेश्वरीच्या दुस-या अध्यायात सांगतात.
इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोक उपजती ।ते अंतर आप्लविती
। संगें येणें ॥
११२ ॥
इंद्रिये
विषयांचे सेवन करतात, त्यामुळे सुखदु:खे उत्पन्न होतात. ते मग आपल्या
संसर्गाने अंत:करण ग्रासून टाकतात.
जयां
विषयांच्या ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं ।तेथ दुःख आणि कांहीं । सुखही दिसे ॥ ११३
॥
ज्या
विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते,
त्या विषयांच्या ठिकाणी काही
दु:ख व थोडे सुखही दिसते. (त्या विषयांपासून कधी दु:ख तर कधी सुख प्राप्त होते).
देखें
शब्दाचि व्याप्ति । निंदा आणि स्तुति ।तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ॥ ११४
॥
निंदा
व स्तुती ही शब्दांची व्याप्ती आहे. कर्णद्वाराने जसे निंदेच्या किंवा स्तुतीच्या
शब्दांचे सेवन होईल तसे क्रोध किंवा लोभ अंत:करणात उत्पन्न होतात.
मृदु
आणि कठीण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण ।जे वपूचेनि संगें कारण । संतोषखेदां ॥ ११५ ॥
मृदु
व कठीण हे स्पर्श या विषयाचे दोन भाग आहेत. ते त्वचेच्या संयोगाने संतोषाला व
दु:खाला कारण होतात.
भ्यासुर
आणि सुरेख । हें रूपाचें स्वरूप देख ।जें उपजवी सुखदुःख । नेत्रद्वारें ॥ ११६ ॥
भेसूर
व सुरेख ही रूप या विषयाची दोन स्वरूपे आहेत. ती नेत्रद्वारे सुखदु:ख उत्पन्न
करतात.
सुगंधु
आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु ।जो घ्राणसंगें विषादु । तोषु देता ॥ ११७ ॥
सुगंध
व दुर्गंध हे गंध या विषयाचे दोन भेद आहेत. ते नाकाच्या संयोगाने सुख व दु:ख
उत्पन्न करतात.
तैसाचि
द्विविध रसु । उपजवी प्रीति त्रासु ।म्हणौनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥ ११८ ॥
त्याचप्रमाणे
(कडू व गोड) दोन प्रकारचा रस आवड व नावड उत्पन्न करतो. म्हणून या विषयांची संगती
अधोगतीला नेणारी आहे.
देखें
इंद्रियां आधीन होईजे । तैं शीतोष्णांतें पाविजे ।आणि सुखदुःखीं आकळिजे । आपणपें ॥
११९ ॥
जेव्हा
मनुष्य इंद्रियाच्या ताब्यात जातो,
तेव्हा त्याला शीतोष्णाचा
अनुभव घ्यावा लागतो आणि मग तो स्वत: सुखदु:खाच्या तडाख्यात सापडतो.
या
विषयांवांचूनि कांहीं । आणीक सर्वथा रम्य नाहीं ।ऐसा स्वभावोचि पाहीं ।
इंद्रियांचा ॥ १२० ॥
इंद्रियांचा
स्वभावच असा आहे की त्यांना या विषयांवाचून दुसरे काहीच गोड लागत नाही.
हे
विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें ।कां स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ॥ १२१ ॥
हे
विषय आहेत तरी कसे ? मृगजळ जसे आभासात्मक किंवा स्वप्नात पाहिलेला
हत्ती जसा भासमय असतो.
देखैं
अनित्य तियापरी । म्हणौनि तूं अव्हेरीं ।हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा ॥ १२२ ॥
तसे
हे विषय क्षणभंगुर आहेत. पहा. याकरता हे धनुर्धरा, तू त्यांचा त्याग कर, त्यांच्या नादी मुळीच लागू नकोस.
इंद्रियें
जें जें म्हणती । तें तेंचि जे पुरुष करिती ।ते तरलेचि न तरती । विषयसिंधु ॥ ३४८ ॥
इंद्रिये
जे म्हणतील, ते
तेच जे पुरुष करतात, इंद्रियांच्या
नादाने जे वागतात, ते
विषयसागराच्या पलीकडे गेले असले तरी ते खरोखर गेले नाहीत असे समजावे.
तैसीं
इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें
करिती ।तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ॥ ३५३ ॥
त्याप्रमाणे
ज्याची इंद्रिये ताब्यात असतात व तो म्हणेल तसे करतात त्याची बुद्धि स्थिर झाली
आहे असे समज.
No comments:
Post a Comment