Wednesday, 3 September 2025

कण-क्षण

 

आचार्य अत्रेंचं एक खूप प्रसिध्द  नाटक आहे. “ब्रह्मचारी”.  नवीन संचात ही हे नाटक आलं होतं आजचा आघाडीचा कलाकार श्री प्रशांत दामले यांनी काम केल्याचं आठवत त्यात मूळ समर्थ रामदासांच्या रचनेवर आधारित एक गीत होते. शब्द होते.

घटिका गेली पळे गेली, तास वाजे ठणाणा;
आयुष्याचा नाश होतो, राम का रे म्हणाना ॥

एक प्रहर दोन प्रहर, तीन प्रहर गेले;
चौथा प्रहर संसारात, चावटीने नेले ॥

रात्र काही झोप काही, स्त्रीसंगे गेली;
ऐशी आठ प्रहरांची, वासलात झाली ॥

दास म्हणे तास वाजे, सकळां स्मरण देतो;
वेळोवेळी राम म्हणा, म्हणोनी झणकारितो ॥

 

यात म्हटलंय , वेळ, काळ झटपट निघून चालला आहे. आयुष्य हातातून निसटून चाललाय. या काळाचा उपयोग करून जीवनात चांगलं काही मिळावा. समर्थाच्या वेळी जीवनात राम असणे ही सर्वोच्च  प्राप्ती होती. राम मिळवा त्याच्या सद्गुणाचा आठव करून आपल्या जीवनात ते गुण उतरवा. गुण कालातीत आहेत. घड्याळाची टिकटिक दर्शविते कि आयुष्यातील एक एक क्षण कमी होतो आहे. वेळेचा सदुपयोग करा.

भारतीय संस्कृतीत कण आणि क्षण ही मोजमापाची एकक आहेत. कण म्हणजे वस्तूचा सूक्ष्म भाग. क्षण म्हणचे काळाचा अल्प भाग. अंदाजे ४-६ सेकंद. संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे.

क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थं च साधयेत् । क्षणे नष्टे कुतो विद्या कणे नष्टे कुतो धनम् ॥

विद्या आणि धन मिळवण्यासाठी प्रत्येक क्षण आणि प्रत्येक छोट्या संधीचा उपयोग करावा. जर एक क्षण वाया गेला तर विद्या  मिळणार नाही आणि कण वाया गेला तर धन. आपल्यात एक म्हण आहे, एक गेली वेळा वरचे गेले सोळा.

काळाचा महिमा अपरंपार आहे. TIME IS MONEY असं म्हटलं जाते. याचा अर्थ जीवनात वेळेचे नियोजन योग्य प्रमाणे करा. वेळ मौल्यवान आहे.

क्षणाचा उपयोग करून विद्या मिळावा व कणा कणाने धन धान्य कमवा .

 

 

No comments:

Post a Comment