Thursday, 3 November 2011

शोध स्व: चा

जीवन म्हणजे स्व: शोधण्याचा प्रवास !!!. आध्यात्मिक भौतिक सर्व प्रकारच्या प्रगति साठी स्व: ची ओळख  पटणे महत्वाचे. आचार्य विनोबा  या विषयी म्हणतात.

        आपण अनेक लोकांना भेटतो पण स्वत: ला भेटायला कधी उत्सुक असतो का?
        "बहुता दिसं आपुली भेटी जाली"  असे कधी होते का?
         स्वत: ला भेटणे मोठे कठिन काम आहे, लोक आरशात चेहरा पाहतात
          आणि समजतात की स्वत:ची भेट झाली,
                       स्वत:ची भेट म्हणजे योग!!
स्वत:ला जाणून घेण्याविषयी, जीवन प्रवासात त्याचे असलेले महत्त्व  वेगवेगळ्या विचारवंतानी असे मांडले आहे.
स्वत:ला अधिकाधिक जाणा आणि त्याची जबाबदारी स्वीकारा! आपण विचार कसे करतो, चालतो कसे ,बोलतो कसे  याचे जागते अवधान ठेवा. जेवढे तुम्ही स्वत:ला जाणल तितके अधिक चांगले  ----   लोरेल मेलिन
खरे तर आपण स्वत:ला नीटसे ओळखत नाही आपले अंतरंग,आपल्याला काय हवे आहे आणि आपल्या विचाराची पद्धत जाणून घ्या --- लीन ग्राबहों
स्वत:वर  पूर्ण विश्वास ठेवा आणि स्वत:तल्या चैतन्यशक्ति वर श्रद्धा !!            -- डॉ नार्मन व्हिंसेंट पिल
आपण समस्येला प्रतिसाद कसा देतो, हे आपल्याला पाहता आले पाहिजे --- रिचर्ड कार्लसन
जो स्वत:ला सर्वोतम रितीने पेश (सादर) करतो असा माणूस कधीच अयशस्वी होत नाही - ओ स्वेट merdan
स्वत:ला जाणणे आणि  स्व:ची पूर्ण जबाबदारी स्वीकारणे महत्वाचे. परस्पर सबंधात स्व: चे वर्तन अंतर्मुखतेने तपासा    - लेस ब्राउन
स्वत:ला कमी लेखु नका ! न्यूनगंड  व् अहगंड या दोहोपासून चार हात दूर रहा   -- वेन डायर
प्रथम तुम्ही स्वत:चे अंतरंग जाणून घ्या विश्वातील अनंत रहस्याची उत्तरे तुमच्यातल्या प्रत्येक पेशी वर कोरलेली आहेत, त्याचे सखोल ज्ञान  होण्यासाठी  प्रयत्न  करा      -------  डन मीलमन
स्व:ला सर्वस्वी जाणणे आणि स्वत:च  स्वत:चे असणे महत्वाचे आपल्याला आपल्या सामर्थ्य , मर्यदाची जाणीव हवी          ---   डेव्ह पेल्झार
लक्षात ठेवा सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुमच्या आतच दडलेली असतात फ़क्त ती उत्तरे एकण्या साठी तुमचे मन आतंरिक दृष्टया कमालीचे शांत व् अक्रिय असावे लगते --  डेवी फोर्ड
 प्रत्येक  दिवस  आरशासमोर  उभे रहा आणि आपल्याच नजरेला नजर द्या, स्वत:शी संवाद साधा आणि आत्मावलोकन करा  ------   मार्क हँसान  

गर्दित स्वत:ला हरवू नका ! स्वत:चा मार्ग स्वत: च शोधून काढ़ा !!    -------  रिक वारेन
स्वत:ला ओळखणे म्हणजे प्रत्येक विचारांचे वा भावनांचे नेमके भान  ठेवणे   -------  जिम रोहन.
तुम्ही म्हणजे हे जग आहात तुम्ही स्वत:त प्रथम परिवर्तन घडवून आणा मग या जगात परिवर्तन घडेल     ---- डेविड होकीन्स
तुम्ही स्वत:ची मैत्री  केलीत तर तुम्हाला कधी एकाकीपणा वाटणार नाही     ------ माक्सवेल मंताझ

                          उध्दरेदात्मनाss त्मानम  नात्मानमवसादयेत  !
                          आत्मैव ह्या त्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मन: !!
आपणच आपला उध्दार करायला हवा , आपण घात करणारी कृत्ये करू नयेत, आपणच आपले मित्र असतो , आपण आपले शत्रु होऊ शकतो.
 
पटतंय  कुछ कुछ !!!!!
 

Friday, 14 October 2011

सामवेब

निर्म सरोवराच्या परिसरातील १२ गावात  सामवेदी ब्राह्मण वसलेले आहेत. मंदिरात व्  राज दरबारात संगीत नृत्य नाट्य कलाकार म्हणून प्रसिद्ध होते. ते गायक व् नायक होत. राज्यानी ह्या लोकाना शंकराचार्य  समाधी  मंदिरात संगीत सेवेसाठी नियुक्त केले होते. सनई,चौघडा,मृदंग ,भेरी, वीणा ,इत्यादि वादनात पारंगत होते.मंदिरात आरती भजन सेवा सदर करीत. भुवेनेश्वरी देवी आणि विमला देवी त्यांची कुलदैवत. बुद्ध काळी सामवेदी ओरीसातुन स्थलांतरित झाले इ स पूर्व १८२५ मंध्ये या लोकांच वसईत आगमन  झाले असे म्हणतात. परंतू लिखित वा सांस्कृतिक पुरावा उपलब्ध नाही.

    या समाजात व्यवसाय सबंधीत आडनावे आहेत ती अशी.
काव्य ,नाट्य लेखन व् नाट्य कलाकार  म्हणजे नायक पुढे झाले नाईक.
 ब्रास किंवा पितळेची संगीत वाद्या वाजवत ते वर्ताकाह पुढे वर्तक झाले , नाटकातील मुख्य पात्र म्हणजे महापात्र पुढे झाले म्हात्रे
मुख्य संगीत दिग्दर्शक जे इतर संगीत कलाकाराना मार्गदर्शन करत ते  जोशिह  त्याचे नंतर जोशी झाले.
कार्यक्रमाचे निवेदन करणारे वाच्ये तदन्तर  वझे झाले,
 पट्टे,कपडे पट ,मुकुट ईत्यादी नायकाचे मेकअप करणारे पट्टेलिक नंतर झाले पाटील, तसेच देशमुख हे आडनाव सामवेदी मधे प्रचलित आहे.

ह्या सर्व मंडळीची गोत्रे खालील  प्रमाणे
भारद्वाज , कश्यप , अत्री , कौशिक , वशिष्ठ , अंगिरस

राजा प्रताप बिंबाच्या काळी ह्या लोकानी शेती व्यवसाय स्वीकारला , सामवेदी समाजाची मुख्य गांवं उमराले , बोळीज , गास ,कोफरड, भुइगाव , वाघोली , नवाले , वटार , नाला मर्देश , नंदीग्राम

वेद- पुराणे  
 वेद व्यासमुनिनी वेदांच्या चार शाखा केल्या   ऋग्वेद ,सामवेद, यजुर्वेद अथर्ववेद.  व्यासांनी  सरस्वती नदीतीरी शम्याप्रास नावाचा आश्रम स्थापिला. यामध्ये मंत्रांच्या संहिता तयार केल्या. वेदराशीतील विशिष्ट ऋचांची क्रमवारी लावून ऋग्वेद निर्मिला. गायनायोग्य ऋचांना सामवेद हे नाव दिले. यज्ञक्रियेचा तपशील यजुर्वेदातून मांडला. अथर्ववेदात गूढविद्या सांगितली. व्यासांकडून पैलऋषी ऋग्वेद शिकले. यजुर्वेदात व्यासशिष्य वैशंपायन निष्णात झाले. सामवेदात जैमिनी तयार झाले. अथर्ववेद सुमन्तु मुनींनी व्यासांपाशी अभ्यासिला. 
सामवेदाच्या हजार शाखा होत्या त्यातील   कौथुमी, जैमिनीय व्  राणायणीय  शाखा आज मिलातात. जैमिनीय शाखा कर्नाटक मध्ये , कौथुमीय गुजरात व्  मिथिला मंध्ये आणि  राणायणीय महाराष्ट्र मध्ये आहेत.




 निर्म परिसरातील सामवेदी ब्राह्मण ओरीसातुन स्थलांतरित झाले  असे एक मत असून     दूसरा  मत प्रवाह  म्हणतो गुजरात मधून. त्यासाठी सामवेदी बोली भाषा व् गुजराथी भाषेतील साम्यस्थळाचा दाखला देतात.




 डॉ. अ.व्यं.सावजी, नागपूर आपल्या ‘चित्पावन ब्राह्मणांचा उगम आणि विकासया  पुस्तकात  म्हणतात सोपारा येथे दहा हजार सामवेदी ब्राह्मण होते ते सर्वच्या सर्व समुद्रमार्गे दाभोळला व तेथून चिपळूणला पोचले व तेथे त्यांनी नव्याने वसाहत केली.


 ह्या सगळ्या मतमतांतरचा धुन्डोळा  घ्यायला हवा. आपल्याला अलेक्स हले ( Alex  Haley)  सारख्या संशोधक लेखकाची  गरज आहे. जो आपले कुळ अणि मूळ शोधेल.  

 (सामवेब - वेबवर सामवेदी वर उपलब्ध माहिती )