निर्मानमोहा जितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः । द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसञ्ज्ञैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत् ॥ १५-५ ॥
ज्यांचे मान व मोह नष्ट
झाले,
ज्यांनी आसक्तिरूप दोष जिंकला, ज्यांची
परमात्म्याच्या स्वरूपात नित्य स्थिती असते आणि ज्यांच्या कामना पूर्णपणे नाहीशा
झाल्या आहेत, ते सुख-दुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त
झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोचतात.
न तद्भासयते सूर्यो न
शशाङ्को न पावकः । यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ १५-६ ॥
ज्या परमपदाला
पोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाहीत, त्या
स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्य प्रकाशित करू शकतो, ना चंद्र,
ना अग्नी; तेच माझे परमधाम आहे.
सर्वस्य चाहं हृदि
सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च । वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव
चाहम् ॥ १५-१५ ॥
मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासूनच
स्मृती, ज्ञान आणि अपोहन ही होतात. सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य
आहे. तसेच
वेदांतांचा कर्ता आणि वेदांना जाणणारासुद्धा मीच आहे.
No comments:
Post a Comment