अधिष्ठानं तथा कर्ता
करणं च पृथग्विधम् । विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम् ॥ १८-१४ ॥
कर्मफळ पाच घटकांवर
अवलंबून असते: १.अधिष्ठान, २.कर्ता, ३.कर्त्याला
उपलब्ध असणारी साधने, ४.कर्त्याने केलेले प्रयत्न, ५.दैव .
यत्तदग्रे विषमिव
परिणामेऽमृतोपमम् । तत्सुखं सात्त्विकं प्रोक्तमात्मबुद्धिप्रसादजम् ॥ १८-३७ ॥
जे आरंभी
जरी विषाप्रमाणे वाटले, तरी परिणामी अमृताप्रमाणे असते,
ते परमात्मविषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न होणारे सुख सात्त्विक
म्हटले गेले आहे.
विषयेन्द्रियसंयोगाद्यत्तदग्रेऽमृतोपमम्
। परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम् ॥ १८-३८ ॥
जे सुख विषय आणि
इंद्रिये यांच्या संयोगाने उत्पन्न होते, ते प्रथम
भोगताना अमृतासारखे वाटत असले तरी परिणामी विषासारखे असते. म्हणून ते सुख राजस
म्हटले गेले आहे.
यदग्रे चानुबन्धे च
सुखं मोहनमात्मनः । निद्रालस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम् ॥ १८-३९ ॥
जे सुख भोगकाळी आणि
परिणामीही आत्म्याला मोह पाडणारे असते, ते झोप,
आळस व प्रमाद यांपासून उत्पन्न झालेले सुख तामस म्हटले आहे.
शमो दमस्तपः शौचं
क्षान्तिरार्जवमेव च । ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् ॥ १८-४२ ॥
अंतःकरणाचा निग्रह, इंद्रियांवर ताबा ठेवणे, धर्मासाठी कष्ट सहन करणे,
अंतर्बाह्य शुद्ध राहणे, दुसऱ्यांच्या
अपराधांना क्षमा करणे, मन, इंद्रिये व
शरीर सरळ राखणे, वेद, शास्त्र, ईश्वर व परलोक इत्यादींवर विश्वास ठेवणे, वेदशास्त्रांचे
अध्ययन-अध्यापन करणे आणि परमात्मतत्त्वाचा अनुभव घेणे, ही
सर्वच्या सर्व ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत.
बुद्ध्या विशुद्ध्या
युक्तो धृत्यात्मानं नियम्य च । शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च
॥ १८-५१ ॥
विविक्तसेवी लघ्वाशी
यतवाक्कायमानसः । ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः ॥ १८-५२ ॥
अहङ्कारं बलं दर्पं
कामं क्रोधं परिग्रहम् । विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते ॥ १८-५३ ॥
विशुद्ध बुद्धीने युक्त; हलके, सात्त्विक आणि नियमीत भोजन घेणारा; शब्दादी विषयांचा त्याग करून, एकांतात शुद्ध ठिकाणी
राहणारा; सात्त्विक धारणाशक्तीने अंतःकरण व इंद्रिये
यांच्यावर संयम ठेवून, मन, वाणी आणि
शरीर ताब्यात ठेवणारा; राग-द्वेष पूर्णपणे नाहीसे करून
चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा; अहंकार,
बळ, घमेंड, कामना,
क्रोध, संग्रहवृत्ती यांचा त्याग करून नेहमी
ध्यानयोगात तत्पर असणारा; ममतारहित व शांतियुक्त असा पुरुष
सच्चिदानंदघन ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो.
ईश्वरः सर्वभूतानां
हृद्देशेऽर्जुन तिष्ठति । भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ १८-६१ ॥
हे अर्जुना, अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने शरीररूपी यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व
प्राण्यांना त्यांच्या कर्मांनुसार फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे.
तमेव शरणं गच्छ
सर्वभावेन भारत । तत्प्रसादात्परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् ॥ १८-६२ ॥
हे भारता (अर्थात
भरतवंशी अर्जुना), तू सर्व प्रकारे त्या
परमेश्वरालाच शरण जा. त्या परमात्म्याच्या कृपेनेच तुला परमशांती आणि सनातन परमधाम
मिळेल.
No comments:
Post a Comment