ऐकण्यात गोडी ठेव, तुझे कल्याण इच्छितो, काही
गोष्टी पुन्हा सांगतो. माझा प्रभाव ना देव
जाणतात ना महर्षि. दोन्ही ही महान आहेत. सर्व प्रकारच्या देवांचे आणि महर्षीचे मूळ
मी आहे. मी जन्मरहित आहे, मीच उगमस्थान आहे.
हे जो ओळखतो तो मोह न ठेवता, पातकातून मुक्त होतो. सत्यता, शम,
निग्रह, तप, दातृत्त्व, संतोष, अहिंसा, समता, क्षमा, नैतिक
गुण, बुद्धी आणि ज्ञान भौतिक भाव. लाभालाभ, जन्म, नाश
स्थूल, निर्मोहता भाव माझ्या पासूनच उत्पन होतात. सात महर्षि, चार मनु हे माझ्या
संकल्पातून उत्पन्न झाले. हा माझा विस्तार नीट जो जाणतो त्याला भक्तियोगाचा लाभ
होतो. सर्वांचे मूळ आणि प्रेरणा माझ्यापासून आहे हे जाणुन माझी भक्ती करतात. ईश्वर
चिंतनात मग्न राहून ते आनंदात राहतात. अश्या प्रकारे एकमेकांस बोध देत,
सदासर्वदा भगवंताचे कीर्तन करत आनंदाने असतात,
भगवंताला प्रेमपूर्वक भजतात त्यांना मी स्वत:हून भेटतो. मी ज्ञान-दीप प्रकट करतो
आणि अज्ञानरुपी अंधकार घालवितो.
अर्जुन म्हणाला, तू
व्यापक, सगुण, निर्गुण निराकार आहेस. तू मोक्ष धाम आहेत. असित, देवल,
व्यास, नारद आणि तू स्वत: याला पुष्टी दिलेली आहे,
तू सांगीतले ते सत्य मानतो. देव, दानव
तुझे रूप जाणत नाही. परमेश्वराचे रूप परमेश्वरा शिवाय कोण जाणणार? तुझ्या असंख्य विभूती आहेत, मला
दिव्य विभूती सांग. तुझे निरंतर चिंतन कसे करावे, कसं जाणावे? कोणकोणत्या विविध रुपात तुझे ध्यान करावे हे
सांग. हे जनार्दना! विभूतीचे विस्ताराने वर्णन करून सांग.
भगवंत म्हणाले, बरं, माझ्या
दिव्य विभूती सांगतो, माझा विभूतीं
विस्तार कधीच संपत नाही. आत्मा रूपाने मी सर्वांच्या हृदयात राहतो, सर्व
प्राणीमात्रांचा मी आदी, मध्य, आणि शेवट आहे. पुढे भगवंताने विविध विभूती सांगितल्या
आहेत.
या विभूतीचे चिंतन गुण विकासासाठी आहे.
१) आपल्या ठिकाणी जो गुण दिसत असेल त्याचा उत्कर्ष
साधणे.
२) ज्या गुणाची उणीव दिसत असेल त्या विषयी आदर वाढविणे.
घट घट मे साई रमता, कुटक वचन मत बोल रे. - कबीर. –
२१ व्या श्लोकापासून विभूती वर्णन. विभूतीचे सार, गुण
विशेष.
·
आदित्यांत
महाविष्णू : बारा महिन्याचे बारा आदित्य. ह्यांची रूपे सौम्य,प्रखर,आवृत
इत्यादी असली तरी विष्णू एकच. आदित्यांतील अधिदैवत.
·
सूर्य
: अधिभूत होय. वर डोक्यावर दिसतो तो सूर्य आधिभौतिक.
·
मरीची
: मरीची म्हणजे जल. पाऊस घेऊन येणारा मोसमी वारा श्रेष्ठ.
·
नक्षत्रांत
चंद्रमा – सौम्य, सेवामुर्ती आहे. चंद्र २७ दिवस २७ नक्षत्रांना भेटतो, चंद्र
भ्रमण.
·
वेदात
सामवेद : गाण्याला सुलभ, त्यावेळच्या रागामध्ये त्यांना
बसविले आहे,पन्नास एक मंत्र सामवेदाचे आहेत. बाकी ऋग्वेदातील निवडलेले आहेत. गाता येतो
म्हणून श्रेष्ठ. भगवान श्रीकृष्ण स्वत: सामवेदी होते.
·
देवात
इंद्र : पाऊस पडणारा.
·
चेतना
म्हणजे जीवन शक्ती.
·
इंद्रियांत
मन : मनाच्या आधारे बाकी इंद्रिय चालतात म्हणून मन श्रेष्ठ.
·
कुबेर
– यक्ष रक्ष योनीत. कुबेर जगातील सर्व धनाचा स्वामी.
·
अग्नी आठ वसू
मध्ये अग्नी. वसू म्हणजे वसती स्थानाच्या देवता.
o
स्वच्छ
पाणी, आप
o
मोकळी
हवा, अनिल
o
भरपूर
प्रकाश, प्रभास
o
उषेच
दर्शन , प्रत्यूष
o
दिशा
सूचक, ध्रुव
o
चंद्रभोगी
आंगण, सोम
o
टणक
जमीन, धरा
o
अग्निहोत्राची
व्यवस्था, अग्नी
·
मेरू –
उच्च शिखरामध्ये
·
पुरोहीतात
बृहस्पती : वाणीची अधिदैवत. ओंकार प्रतिक,
गणपती रूप.
·
स्कंद
सेनानीत : स्कंद आणि गणपती दोघे बंधू.
कुमार ही म्हणतात.
·
जलात
सागर. गंभीर, शांत, खोल.
·
एकाक्षर
ॐकार
·
महर्षित भृग: ब्राह्ममिमांसेचा जीज्ञासु, वरुणशिष्य.
·
जप सर्व यज्ञात :
मंत्रादिकांची तदर्थ भावनापुर्वक पुन: पुन: आवृत्ती. जप करून त्याच्या अर्थाचे
पुन: पुन: चिंतन करावे.
·
हिमालय : शांत, निश्चयाची मूर्ती, स्थैर्य प्रतिक.
·
अश्वत्थ : पिंपळ मृतांच्या
दहनक्रीयेला प्रशस्त मानलेला. संसाराच्या अनित्यतेचा स्मारक. अ+श्व + त्थ = अ -नाही , श्व -उद्या - त्थ - टिकणारा . उद्या न टिकणारा दिनभंगुर. वृक्ष
म्हणजेच कापला जाणारा व्रश्च (व्रश्चनात
वृक्ष)
·
नारद देवर्षी मध्ये भक्ती करणारा, गुणगान करणारा, द्रष्टा ऋषी म्हणजेच दृष्टी असलेला पुरुष.
·
गंधर्वातील चित्ररथ
·
कपिल मुनी – सिद्ध पुरुष.
·
घोड्यात उच्चै:श्रवा : समुद्र मंथनातून उत्पन्न
·
गजेन्द्रात ऐरावत
·
मनुष्यामध्ये राजा.
·
आयुधा मध्ये वज्र तपस्येच, त्यागाचं
लक्षण
·
गाईत कामधेनु
·
प्रजोत्पदानात कामदेव
उत्पत्ति हेतू.
·
सर्पात वासुकी
·
नागात शेषनाग
·
जलात वरुण देवता
·
अर्यमा आर्य मनाचा , आर्याचा
मानीव पूर्वज.
·
यम नियती देवता. ओढणारा मी यम
·
दैत्यात प्रल्हाद परम भक्त ,
निर्भयता
·
मोजणा-यात काळ मी , काळाचे सतत भान, क्षणघटिका दिकांनी
जीवनाचे मापन करणारा.
·
पक्षात गरुड पशु मध्ये सिंह
·
वेगवंतात वायू, वीरा मध्ये राम, नदी मध्ये गंगा, नदी म्हणजे नाद
करणारी.
·
सर्व विद्या मध्ये आधात्म
विद्या,सृजनाचा आदी,मध्य,अंत , तर्काशास्र मध्ये सत्य.
आनंद : संतोष, निश्चिंत वृत्ती , लीला-विनोद. “लीला
विनोदे संसार तरिजे रया.” - ज्ञानदेव
श्लोक ८ : सर्व
प्रेरणा परमेश्वराची आहे हे ओळखून वाट्यास आलेले काम त्याची भक्ती समजून करीत
जावे.
श्लोक ९ : सारे
चिंतन आणि जीवन परमेश्वराला वाहून सहकार वृत्तीने एकमेकांस बोध देत देत हरी
कीर्तनात रंगून जावे.
श्लोक १० : अशी
निष्काम भक्ती करणारास ईश्वरकृपेने यथाकाळी सहजच ज्ञान लाभ होत असते.
श्लोक ११ : या
ज्ञानाची क्षेम चिंता ही भक्ताला करावी लागत नाही.
कर्म , भक्ती, ज्ञान, मोक्ष चार श्लोकात.
अज्ञान तम घालवी
हे सगळं जाणून काय करशील अर्जुना! शंभरापैकी एकाच अंशाने
सारे विश्व व्यापले आहे.