Friday 18 November 2011

निर्मळ यत्रौत्सव

निर्मळ यात्रेच विशेष महत्त्व आहे . दिवाळी पासूनच यात्रेचे वेध लागत असतात , लोकभाषा मधे " दिवाळी आली खायाला जत्रा आली न्यायाला " अशी म्हण प्रचलित आहे. म्हणजे दिवाळीत खायची चंगळ तर जत्रेला भेट देण्याची पर्वणी  





श्रीमत शंकराचार्य मंदिर, निर्मळ
वैकुंठी चतुर्थीला दीपदान, पोर्णिमेला दीपोत्सव, दिपमाळ उजळण्यानी यात्रेच्या माहोलला सुरवात होते .

कार्तिक कृ एकादशीला निर्मळ तिर्थात अंघोळी व् द्वादशीला पालखी सोहळा . इ पू ४०४ मधे कार्तिक कृ एकादशीला पुरीचे पाचवे  जगतगुरु शंकराचार्य विध्यारण्य स्वामीनी विमलेश्वराच्या मागे समाधी घेतली तेव्हा पासून  एकादशीला दूर दुरून  भाविक स्नाना साठी निर्मळला भेट देउन श्रीमत शंकराचार्यच्या समाधीचे दर्शन घेत असतात . द्वादशीला श्रीमत शंकराचार्याच्या  पादुकांची  व् विमलेश्वराच्या प्रतिमेची  पालखी  काढण्यात येते श्रीमंत पेशव्यानी नेमलेले इनामदार या सोहळ्य|त  सहभागी होत असतात. पालखी मंदिराच्या पायरी कडील दक्षिण मार्गाने सुलेश्वर मंदिरामागुन  ,निर्मळनाका , गणेश मंदिर,हनुमान मंदिराच्या समोरून सकाळी समाधी मंदिरात पोहचते. 


समाधी  मंदिराच प्रवेशद्वार

पालखिनंतर येणार्‍या  रविवारी चर्च  चा सणख्रिश्‍चनाचा यात्रोत्सव साजरा होतो.
परिसरातील जनजीवनावर यात्रेचा प्रभाव होता काही लोक व्यवहार यात्रेमध्ये पार पडत असत. तेव्हा भांडी मुख्यता पितळेची असत , जुनी भांडी देऊन नविन घेणे,   भांडी खरेदी  लोणच्या साठी  लिंब खरेदी  यात्रे मधे  होत असे. तसेच महिलाचा बांगड्या भरण्याचा दिवस असे .  यात्रा पंधरा पंधरा दिवस चालत असे. 
                                                                                                               


                                                                                                                                   


यात्रेच्या निमित्ताने  कुटुंब प्रमुख  मुलं मुलीना, लेकीसुनाना  यात्राखर्च (यात्रेचे पैसे )देत असत.अशी प्रथा या परिसरात  पाली जात असे.

महाविष्णु समोरील गरुड़ मंदिर

यात्रेमधे बाहुल्याचे खेळ, पाळणे , चकरी, मौतका कुवा , हसरे आरसे , इत्यादि मनोरंजनाचे खेळ असतात.    खेळण्याची ,  मिठाई ची,  सुकेळी   ,खजुराची  दुकाने  असतातसध्या भंडिवाले ,  बांगडी  वाली मंडळी कमी दिसतात, काळा बरोबर ही मंडळी दुसर्‍या व्यवसायात गेली असावी.

आजही यात्रा दहा दिवस चालते, नालासोपारा , वसई  स्टेशन कडील मंडळी  यात्रेला येतात  त्यामुळे संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत यात्रेत गर्दी असते
(संदर्भ निर्मळ महात्म्य )



श्रीमत शंकराचार्य स्वामी विध्यारण्य यांची समाधी

Thursday 3 November 2011

शोध स्व: चा

जीवन म्हणजे स्व: शोधण्याचा प्रवास !!!. आध्यात्मिक भौतिक सर्व प्रकारच्या प्रगति साठी स्व: ची ओळख  पटणे महत्वाचे. आचार्य विनोबा  या विषयी म्हणतात.

        आपण अनेक लोकांना भेटतो पण स्वत: ला भेटायला कधी उत्सुक असतो का?
        "बहुता दिसं आपुली भेटी जाली"  असे कधी होते का?
         स्वत: ला भेटणे मोठे कठिन काम आहे, लोक आरशात चेहरा पाहतात
          आणि समजतात की स्वत:ची भेट झाली,
                       स्वत:ची भेट म्हणजे योग!!
स्वत:ला जाणून घेण्याविषयी, जीवन प्रवासात त्याचे असलेले महत्त्व  वेगवेगळ्या विचारवंतानी असे मांडले आहे.
स्वत:ला अधिकाधिक जाणा आणि त्याची जबाबदारी स्वीकारा! आपण विचार कसे करतो, चालतो कसे ,बोलतो कसे  याचे जागते अवधान ठेवा. जेवढे तुम्ही स्वत:ला जाणल तितके अधिक चांगले  ----   लोरेल मेलिन
खरे तर आपण स्वत:ला नीटसे ओळखत नाही आपले अंतरंग,आपल्याला काय हवे आहे आणि आपल्या विचाराची पद्धत जाणून घ्या --- लीन ग्राबहों
स्वत:वर  पूर्ण विश्वास ठेवा आणि स्वत:तल्या चैतन्यशक्ति वर श्रद्धा !!            -- डॉ नार्मन व्हिंसेंट पिल
आपण समस्येला प्रतिसाद कसा देतो, हे आपल्याला पाहता आले पाहिजे --- रिचर्ड कार्लसन
जो स्वत:ला सर्वोतम रितीने पेश (सादर) करतो असा माणूस कधीच अयशस्वी होत नाही - ओ स्वेट merdan
स्वत:ला जाणणे आणि  स्व:ची पूर्ण जबाबदारी स्वीकारणे महत्वाचे. परस्पर सबंधात स्व: चे वर्तन अंतर्मुखतेने तपासा    - लेस ब्राउन
स्वत:ला कमी लेखु नका ! न्यूनगंड  व् अहगंड या दोहोपासून चार हात दूर रहा   -- वेन डायर
प्रथम तुम्ही स्वत:चे अंतरंग जाणून घ्या विश्वातील अनंत रहस्याची उत्तरे तुमच्यातल्या प्रत्येक पेशी वर कोरलेली आहेत, त्याचे सखोल ज्ञान  होण्यासाठी  प्रयत्न  करा      -------  डन मीलमन
स्व:ला सर्वस्वी जाणणे आणि स्वत:च  स्वत:चे असणे महत्वाचे आपल्याला आपल्या सामर्थ्य , मर्यदाची जाणीव हवी          ---   डेव्ह पेल्झार
लक्षात ठेवा सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुमच्या आतच दडलेली असतात फ़क्त ती उत्तरे एकण्या साठी तुमचे मन आतंरिक दृष्टया कमालीचे शांत व् अक्रिय असावे लगते --  डेवी फोर्ड
 प्रत्येक  दिवस  आरशासमोर  उभे रहा आणि आपल्याच नजरेला नजर द्या, स्वत:शी संवाद साधा आणि आत्मावलोकन करा  ------   मार्क हँसान  

गर्दित स्वत:ला हरवू नका ! स्वत:चा मार्ग स्वत: च शोधून काढ़ा !!    -------  रिक वारेन
स्वत:ला ओळखणे म्हणजे प्रत्येक विचारांचे वा भावनांचे नेमके भान  ठेवणे   -------  जिम रोहन.
तुम्ही म्हणजे हे जग आहात तुम्ही स्वत:त प्रथम परिवर्तन घडवून आणा मग या जगात परिवर्तन घडेल     ---- डेविड होकीन्स
तुम्ही स्वत:ची मैत्री  केलीत तर तुम्हाला कधी एकाकीपणा वाटणार नाही     ------ माक्सवेल मंताझ

                          उध्दरेदात्मनाss त्मानम  नात्मानमवसादयेत  !
                          आत्मैव ह्या त्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मन: !!
आपणच आपला उध्दार करायला हवा , आपण घात करणारी कृत्ये करू नयेत, आपणच आपले मित्र असतो , आपण आपले शत्रु होऊ शकतो.
 
पटतंय  कुछ कुछ !!!!!