Tuesday 26 October 2021

"कृतज्ञता"

 

कृतज्ञता

 मेलोडी बीटीची खालील वाक्य  प्रभावित करतात 

 

"कृतज्ञता जीवनात परिपूर्णता आणते. समाधानी बनवते, हव्यास सुटतो. नकाराचं होकारात रूपांतर करते. गोंधळ ,गडबडीत सुसूत्रता निर्माण करते. द्विधा अवस्था नाहीशी करून  लक्खपणा आणते,    साध्या जेवणाचं  रूपांतर   पंचपक्वांनाच्या  मेजवानी होऊन जाते. .घराला घरपण आणते. आणि आपपर भाव निघून आपलेपणा जोपासते. 

 

जीवनात कृतज्ञता नसेल तर स्वर्गाचा  नरक होऊन जाईल.   

जीवनात खूप विपुलता असेल परंतु   कृतज्ञता नसेल तर भरल्यापोटी ही तुम्हाला उपाशी आहोत असं वाटेल
कृतज्ञता नसेल तर

 कोणताही काम आनंद देणार नाही, कामाचं समाधान मिळणार नाही.  

प्रत्येक सहका-यात त्रुटी दिसतील, सर्व  मित्रांवर नाराजी असेल ,प्रत्येक घरातील चुका दिसतील.  प्रत्येक भेटवस्तूतील कमतरताच दिसेल. प्रत्येक कादंबरी मुद्रण  दोषांनी भरलेली दिसेल. कोणतीच गादी झोपण्यायोग्य वाटणार नाही. आणि कॉफीचा पेला नेहमीच फिक्का वाटेल. कृतज्ञतेशिवाय घेतलेला कोणताही निर्णय कायमचाच चुकीचा वाटेल. 


 कृतज्ञतेची जाणीव नसल्यास ,प्रत्येक गोष्टीविषयी तक्रारी असतील 

उन्हाळा गरम   खूप थंडी, संगीत म्हणजे धांगडधींगा सिनेमे म्हणजे वेळेचा अपव्यय व  किशोरवयीन मुलं नेहमीच उद्धट वाटतील.

 

कृतज्ञतेशिवाय वेगळ्या मताची ,वेगळ्या पंथाची माणसं तुम्हाला शत्रू वाटतील 

परिवारा विषयी कृतज्ञता नसेल तर   चुकीच्या कुटुंबात जन्माला आलो आहोत असं वाटत राहील. 

मिळणा-या , प्राप्त होणा-या गोष्टी विषयी कृतज्ञता नसेल तर. वेटर खूप वेळ घेतो , रस्त्यावरील प्रत्येक चालक मूर्ख आहे. गाडी चालवता येत नाही. गाडी बस मध्ये मिळालेली  खिडकी जवळीची जागा ही चुकीची वाटेल. 

 

 कृतज्ञते शिवाय जीवन यातनामय आहे. 

 

" कृतज्ञता "  ही जीवनात किमया घडवणारी किमयागार आहे. 

Thursday 14 October 2021

भावसंचित!

 दुर्गा भागवत म्हणजे मराठी वाङमय विश्वातील एक ठसठशीत नाममुद्रा चतुरस्र व्यक्तिमत्वाच्या व्यासंगी लेखिका. त्यांच्या असंकलित आणि पूर्वप्रकाशित स्फुट साहित्याच्या तीन खंडातील एक    "भावसंचित".

भावसंचित मध्ये ललितलेख , व्यक्तिचित्रे , आत्मपर लेखनाचा समावेश आहे.  सीता रामाची कोण? आणि सीतेची ओळख असे दोन लेख यात आहेत. जे आपणास राम , सीता या विषयी नवीन दृष्टिकोन देतात. 
सीता म्हणते धर्मात सुखं  न सुखात सुखं !  अर्थ धर्मच सुख देतो, सुख सुख देत नाही.
लव कुश यांच्याशी युद्धानंतर श्री रामाला पुन्हा सीतेने अग्निदिव्य करावं असं वाटतं. सीता भूमिमातेला उदरात घेण्याची प्रार्थना करते आणि रामाकडे बघत , रामासमोर भूमीच्या उदरात प्रवेश करते.,  रामाची पत्नी रामाची राहिली नाही, भूमीची कन्या भूमीमय झाली. ती राममय झाली नाही म्हणून लेखिकेला प्रश्न पडतो सीता रामाची कोण होती ? सीतेचे  व्यक्तीमत्त्व जाणून घेण्यासाठी हे लेख वाचायला हवेत. 

दुर्गाबाईंचा सडेतोड, निर्भीडपणा आपण आणीबाणीच्या वेळी पहिला आहे तत्त्वासाठी परखडपणे मतं मांडणे हा त्याच्या स्वभाव होता हे जाणून घेण्यासाठी या पुस्तकातील ऑल इंडिया रेडिओ उर्फ आकाशवाणी हे स्फुट,पत्र वाचायलाच हवं. पुस्तकाच्या शेवटी गांधीजींची ओळख हा लेख आहे तो दुर्गाबाईंच्या व्यक्तिमत्त्वावर लख्ख प्रकाश टाकतो. एका कार्यक्रमात , कार्यकर्ता त्यांना विचारतो महात्माजींची ओळख करून घ्यायची का ? त्यांचं उत्तर चक्क नाही होतं. विचार करा !!
त्या पुढे म्हणतात गांधीजींची ओळख मनाला आहेच केव्हांही संवाद साधता येतो नि उत्तर ठाम व अचूक येते. त्यांचं मार्गदर्शन कधी थांबत नाही. 
या पुस्तकातील पत्रांचा निसटत्या आठवणी त्यातील आनंदीबाई व अहिल्याबाई होळकर या दोन परस्परविरोधी स्वभावाच्या स्रियांचा पत्रव्यवहार आणि घटना अनन्यसाधारण आहे.इथे आनंदीबाईंनी प्रसंगारूप प्रांजळ लिनपणा दाखवला आहे. अहिल्याबाईने कृतज्ञता बुद्धीने सहज आणि शानदारपणे दरबारात मालकिणीचा समादर केला. 
 मरणाविषयी दुर्गाबाई काय म्हणतात बघा. 
मी निसर्गशरण आहे, जीवनशरण आहे; तेव्हा मरणशरणता स्वीकारायला मला कसली आली आहे खंत? मरण तर सुख-दुःख पार करणारे नि नव्या पुनर्जीवनाला आमंत्रण देणारेच  आहे ना? 

Monday 4 October 2021

तरुण पिढीचे भवितव्य’!

 

तरुण पिढीचे भवितव्य’!

संयुक्त राष्ट्रसंघाच्या   आमसभेत  दक्षिण कोरियाच्या ‘बीटीएस’ बँडच भाषण झालं आणि गीत सादर केले . त्यांच्या भाषणाचा विषय होता- ‘तरुण पिढीचे भवितव्य’! या बँडने केवळ भाषणच केले नाही, तर तिथे ते ‘नाचायला परवानगी हाय..’ हे गाणे गात मोठय़ा जोशात नाचलेदेखील! या  विषयी श्री माधव गाडगीळ यांचा लोकरंग मधील लेख. त्यातील हे गीत  

 

 

 

‘नाचायला परवानगी हाय’

 

भर ज्वानीच्या वादळामंदी

आमच्या दिलाचं वाजतंय ढोलकं

वाढतोय वाढतोय आवाज वाढतोय

तशी रातीची थंडी पण वाढतेय

तरी लयीच्या मागं, सुराच्या मागं,

धावतोय पळतोय जोशात

आता सपान भरतंय डोळ्यात, डोळ्यात

मग तुतारी फुंकतो आणिक सांगतो

आम्हाला नाचायचंय नाचायचंय

अन् नाचतो नाचतो बेभान बेभान

बनतो सोन्याचं अन् रंगतो नाचात बेदरकार बेदरकार

आम्हा ना काळजी कशाची

धडपडतो तरी उभे ठाकतो भक्कम पायावरी

आम्हा ना हताश कोणी करी

काही तरी येतं वाटेत आडवं

पण आम्ही नाही त्याला जुमानत

आम्ही नाही कोणाला इचारत

आमची लय कधी थांबणार नाय,

आम्ही कधी मागे फिरणार नाय

कुणाला काय दाखवायचं नाय आम्हाला आमची नशा पुरे

आता कशाला थांबायचं, आता तर आली आहे वेळ

आम्ही पुढे पुढे चालणार आणि बघत राहणार

पूर्वेला तांबडं फुटताना

मग चालणार चालणार, बोलत राहणार

आम्ही सोन्याचे बनलोय ना

कुणाला काय पण दाखवायचं नाय आम्हाला

आमची नशा पुरे

मग म्हनतो म्हनतो

आम्हाला नाचायचंय नाचायचंय

बनतो सोन्याचं अन् गातो नाचतो स्वच्छंदी स्वच्छंदी’

 

 

न हरलेल्या आणि न हरवलेल्या तरुणांना जाणून घेण्यासाठी मुळातूनच लेख वाचा लोकरंग ३/१०/२०२१