Sunday 16 May 2021

चल , घे भरारी !

श्री सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन    'अज्ञेय'   हिंदीतील सुप्रसिद्ध साहित्यिक. त्यांना   १९७८चा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त. त्यांची एक प्रसिद्ध कविता.
 
उड़ चल हारिल  
 
उड़ चल हारिल लिये हाथ में
यही अकेला ओछा तिनका
 उषा जाग उठी प्राची में
 कैसी बाट भरोसा किन का!
 
शक्ति रहे तेरे हाथों में
 छूट न जाय यह चाह सृजन की
 शक्ति रहे तेरे हाथों में
 रुक न जाय यह गति जीवन की!
 
ऊपर ऊपर ऊपर ऊपर
 बढ़ा चीर चल दिग्मण्डल
 अनथक पंखों की चोटों से
 नभ में एक मचा दे हलचल!
 
तिनका तेरे हाथों में है
अमर एक रचना का साधन
तिनका तेरे पंजे में है
 विधना के प्राणों का स्पंदन!
 
काँप न यद्यपि दसों दिशा में
 तुझे शून्य नभ घेर रहा है
 रुक न यद्यपि उपहास जगत का
 तुझको पथ से हेर रहा है!
 
तू मिट्टी था किन्तु आज
 मिट्टी को तूने बाँध लिया है
 तू था सृष्टि किन्तु सृष्टा का
 गुर तूने पहचान लिया है!
 
मिट्टी निश्चय है यथार्थ पर
क्या जीवन केवल मिट्टी है?
तू मिट्टी पर मिट्टी से
उठने की इच्छा किसने दी है?
 
आज उसी ऊर्ध्वंग ज्वाल का
 तू है दुर्निवार हरकारा
 दृढ़ ध्वज दण्ड बना यह तिनका
 सूने पथ का एक सहारा!
 
मिट्टी से जो छीन लिया है
वह तज देना धर्म नहीं है
जीवन साधन की अवहेला
कर्मवीर का कर्म नहीं है!
 
तिनका पथ की धूल स्वयं तू
 है अनंत की पावन धूली
 किन्तु आज तूने नभ पथ में
 क्षण में बद्ध अमरता छू ली!
 
ऊषा जाग उठी प्राची में
 आवाहन यह नूतन दिन का
 उड़ चल हारिल लिये हाथ में
 एक अकेला पावन तिनका!
 
 दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ध्येय गाठण्याचा  संदेश  कवी  हारील पक्षाच्या माध्यमातून देतात. 
 
पूर्वेला पहाट उगवली आहे. तू कोणाची वाट बघू नको ,कुणाच्या भरवश्यावर थांबू नको.  तू उडान भर.  
तुझ्या हातात शक्ती आहे. नवं निर्माणाची संधी सोडू नको ,  जीवनाची गती थांबू देऊ नको. 
गगनमंडळ भेदत वर वर जा. अथक पंखाने आभाळ ढवळून काढ. 
अमर सृष्टीचं साधन तुझ्या बाहुत आहेत , जीवन स्पंदन तुझ्या मनगटात  आहेत. 
दशदिशांनी तुला घेरलं तरी घाबरू नको , जगाच्या उपहासामुळे आपल्या मार्गापासून ढळू नको.
तू माती होतास परंतु मातीला आकार दिला आहेस. तू सृष्टी चा एका भाग होतास परंतु तुझी ओळख निर्माण केली आहेस.  
माती वास्तविक स्थिर निश्चल आहे. जीवन काय फक्त माती, निश्चल, स्थिर आहे का ? माती मधून नवनिर्मिंती करण्याची इच्छा कोणी दिली?
 उज्वल प्रवासाचा तू अज्ञात धावपटू आहेस.  तुझी इच्छाशक्ती ध्वजदंड बनून एकाकी मार्गाचा आधार बनली आहे. 
माती पासून जे घेतलं आहे त्याचा त्याग करणे धर्माला धरून होणार नाही. जीवन साधनेची अवहेलना   कर्मवीर करत नसतो. . 
स्वतः धुळीचा कण आहेस परंतु भूमी पवित्र आणि अनंतकाळ  आहे. आज तू आकाश गाठलं आहेस,  क्षणात अमरत्वाला स्पर्श केला आहेस. 

पूर्वेला उष:काल  झाला आहे. नवीन दिवसाची सुरवात आहे. पवित्र  एकमेव ध्येय,इच्छा  घेऊन उडान भर. हारिल !   

प्रबोधनमाला 

  संजीवनी व्याख्यानमाला २०२१  
वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना संजीवनीच्या व्यासपीठावर आणायचं त्याचे विचार , अनुभव आपल्या लोकांना जाणून घ्यायची संधी उपलब्ध करायची आणि जीवन अधिक समृद्ध करण्याचं काम व्याख्यानमालेच्या माध्यमातून गेली १९ वर्ष सुरु आहे.  "संजीवनी व्याख्यानमाला २०२१"  ची सुरवात  आधुनिक तंत्रज्ञान युग  आणि ते सर्व जीवन  व्यापून दशांगुळं राहणार याची जाणीव  करून देणारं. त्याला  सामोरे जाण्यासाठी लागणारी मानसिकता कशी असावी हे सांगणारं. .औद्योगिक  क्रांती ४ ची आव्हानं  "दूरगामी आणि मुलगामी"  डॉ. भूषण केळकर .. इंडस्ट्री 4.0 हि संकल्पना नेमकी काय आहे. याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होणार आहे? याचा वेगवेगळ्या वयोगटावर कसा परिणाम होणार आहे?  याबद्दल विस्तृत विवेचन डॉ.भूषण केळकर यांनी केलं औद्योगिक क्रांती ४ ची आव्हानं दूरगामी तसेच मूलगामी आहेत. मानवी जीवनाची सर्व क्षेत्रे यांनी व्यापून जाणार आहेत. सुरवातीला त्यांनी औद्योगिक  क्रांतीचा इतिहास सांगितला.  वाफेचे इंजिन, यंत्रमाग  पासून इंडस्ट्री १ ची सुरवात झाली. पुढे विद्युतऊर्जा  असेम्ब्लीलाईनच्या रुपाने इंडस्ट्री २ मध्ये रुपांतर झाले. सर्व ऑटोमेशन संगणकीकरणाने इंडस्ट्री ३ विकसित झाली आणि आता  २०११ पासून इंटरनेट, नेटवर्क, सायबरच्या माध्यमाने इंडस्ट्री ४  सुरु झाली. पहिले दोन टप्पे पार करायला शंभर वर्ष लागली. इंडस्ट्री ३ ते इंडस्ट्री ४ मध्ये रुपांतर होण्यास  ४० वर्षे लागली.  प्रगतीचा वेग प्रचंड वाढला आहे. इंडस्ट्री ४ ला दहावर्षे होत असताना इंडस्ट्री ५ आकार घेत आहे.  इंडस्ट्री ४ मध्ये  रोबोट्स , क्लाऊड कॉम्पुटिंग, बिग डेटा, इंटरनेट ऑफ थिंग्स, थ्रीडी प्रिंटिंग , कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादि एकूण ९ घटक आहेत. प्रत्येक तंत्रज्ञानात सर्वच्या सर्व घटक असतील असं नाही. यातील काही घटकांचा उपयोग असेल.  इंडस्ट्री ४ मुळे काही नोकऱ्या जाणार आहेत हे खरं असलं  तरी नवीन नोक-याही  निर्माण होणार आहेत. ज्यांचं  कौशल्य आज उपलब्ध नाही. अशी कौशल्य विकसित करायला हवीत.  भारतासारख्या तरुण देशाने या गोष्टी कडे लक्ष देऊन अशी नवनवीन कौशल्ये आत्मसात करायला हवीत. इंडस्ट्री ४ साठी खालील  कौशल्ये आपण शिकलो नाही तर नोकरी, व्यवसाय, आणि व्यक्तीगत जीवनात कुचकामी ठरु. जटिल समस्या सोडवण्याचं कौशल्य (compex problem solving) लोक,  टीम व्यवस्थापन (People Management) , सर्जनशीलता, (creativity)     संवाद कुशलता, (communicaiton) इतरांशी समन्वय,  (coordinating with others) भावनिक बुद्धिमत्ता, (Emotional intelligence)  सेवाभिमुखता (service orientation) इत्यादी.   वेगाने होणा-या बदलासाठी आपण तयार असायला पाहिजे. आपण एकसुरी, पुन्हा पुन्हा तेच काम इत्यादी क्षेत्रातून बाहेर पडायला हवे. डेटा अनालिसिस, वर्गीकरण अशा क्षेत्राकडे वळले पाहिजे. एकपेक्षा अधिक शाखेत प्राविण्य किंवा पदवी, डेटा विश्लेषण कौशल्य, सर्जनशीलता, संवादकौश्यल्य, सर्वागीण विकास , रचनात्मक विचार, कुठल्याही प्रकारचं प्रोग्रामिंग, फ्रेंच, जर्मन सारखी दुसरी भाषा, काम करता करता शिकणं, जनरल नॉलेज वाढवणे, सामाजिक भान जपणे, आणि स्वतःला नीट ओळखणे इत्यादी गोष्टी शिकायला हव्यात.  त्यासाठी कोर्सेस करायला हवेत.   प्रश्नोत्तरात श्रोत्यांनी नेमके प्रश्न विचारले.  सरांनी उदाहरणासहित समर्पक उत्तरे देऊन सर्वांचे समाधान केले. अथर्व नाईक यांच्या  क्वांटम कॉम्पुटिंग व न्यूरालिंक या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल प्रश्नाचे  डॉ. केळकर यांनी कौतुक केलं.  सरांनी तरुणांना दोन गोष्टी आवर्जून करायचा संदेश दिला.  १) करिअर क्लॉक  हे फ्री अँप आहे, ते डाउनलोड करा. याचा करिअर बिल्डिंग साठी उपयोग होईल. ही करिअर प्रोसेशनिंग सिस्टिम (CPS ) आहे. तुमच्याविषयी माहिती  सांगा. तुम्हाला नोकरीत का घ्यावं? तुमचं प्राविण्य कशात आहे, तुमचे वीकनेस काय आहेत. इत्यादी प्रश्नासाठी तयारी करण्यास मदत करेल. resume बनवण्यासाठी मदतगार ठरेल.  सर्वांगीण वाढ आणि अर्थपूर्ण करिअर घडवण्यासाठी मदत करेल. इतरांच्या तुलनेत आपण कुठे आहोत हेही दाखवेल. स्व: विषयी जागृती निर्माण करणा-या  अँपद्वारे . आपलं करिअर विकसित करा.  २) करिअर विकासासाठी व करिअर प्लॅनिंगसाठी नुफ्लेक्स टॅलेंट सोलुशनचे @neuflex.talent हे इंस्टाग्रामचे  a/c follow करण्याचा सल्ला दिला.  
दुसरं  व्याख्यान  दुर्दम्य ध्येयवाद, ईश्वरी निष्ठेने  आकार घेणारं  , सीमा नसलेले जग , आनंदवन भुवन.  ह्या वर विश्वास निर्माण करणारं. होतं.  १९९८ ते २०२१ काश्मीर सेवा यज्ञ !!! श्री .अधिक कदम . गेली २४ वर्ष मी कशिमर मध्ये आहे. हा समाज मुख्य प्रवाहात कसा येईल. कारगिल युद्धाच्या वेळी तिकडे होतो. गावच्या गावं विस्थापित झाली होती.त्याच्या पुनर्वसनात मदत कार्य केलं.   मुलं आतंकवादाकडे का वळली युनिसेफचा सर्वे करताना लक्षात आलं की कुपवाडा जिल्ह्यातच   हजारो मुलं अनाथ आहेत. अश्या मुलांना देश विरोधक तत्व आपल्या जाळ्यात ओढून घेतात. देशा विरोधात त्यांना तयार करतात  हेच चक्र गेली अनेक वर्ष सुरु आहे.  सर्व अंगानी समस्या होत्या. पाच सहा वर्ष अभ्यास केला. राजकीय पक्ष , सरकार काही करू शकतील असं वाटत नव्हतं. आपण मुलांसाठी काम करू या विशेषतः मुली साठी अशी एक अंतःप्रेरणा झाली त्याला अनेक महानुभावांचा आशीर्वाद मिळाला. मार्गदर्शन मिळालं त्यातून आपण मुली साठी काम करायचं  ठरवलं. काश्मीर मध्ये नकारात्मक शक्तीशी तोंड देण्यांत खूप ऊर्जा गेली. त्यामुळे इतक्या वर्षांत फक्त ७००-८०० मुलींना  स्वतःच्या पायावर उभं करून समाजात पाठवू शकलो. ११३ हुन जास्त मुलींची लग्न लावून दिली. यातील ७ मुलींना नंतर कळले की त्यांचा दीर अतिरेकी होते बॉर्डरलेस वर्ल्ड फॉउंडेशनच्या संस्कार मुळे या मुलींनी आपल्या सासरच्या मंडळींशी बोलून दिरांना  समजावून  समाजात परत आणलं. शरण यायला लावलं. हेच मोठं पारितोषक.  शंभर टक्के मुस्लिम समाजात राहू कसा शकलो , कारण ही माझी साधना आहे.  फौजेच्या पॅलटगन  मा-या मध्ये अनेक जण जखमी झाले  त्यातील  १३५० मुलांवर डोळ्याची शस्रक्रिया केली.  समाजात विश्वासाचं वातावरण निर्माण होत आहे. बॉर्डरलेस वर्ल्ड फॉउंडेशनच्या माध्यमातून स्वावलंबी झालेल्या मुली , काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत देशात उच्चं शिक्षण घेणा-या मुली आपल्या कुटूंबात , समाजात जातील आणि संपूर्ण कुटुंबाला समाजाला मुख्य प्रवाहात घेऊन येतील.  
आणि तिसरं व्याख्यान   आधुनिक तंत्रज्ञान आणि सामूहिक ध्येयवाद याचा मिलाप करून समृद्धी कशी निर्माण करावी याचं मार्गदर्शन. केलं. डॉ अनिल काकोडकर विषय सिलेज" ग्रामीण समृद्धीसाठी ज्ञान सेतू. सिटी आणि व्हिलेज याना जोडून झालेले सिलेज..  संतुलित विकास साध्य करायचा असेल तर  ग्रामीण - शहर ही दरी मिटवणारा सेतू बांधायला हवा यातून ग्रामीण भागाचा विकास होऊ शकतो हा सिलेज या संकल्पनेमागील हेतू आहे. ग्रामीण भागातील तरुणांना सक्षम करून त्यांना गावातच उपजिविकेची साधनं  उपलब्ध होतील अशी  व्यवस्था निर्माण करायला हवी. तरच शहराकडे जाणारे लोंढे थांबतील. नवीन ज्ञानयुगात शहरी भागात जसं औद्योगिक उत्पादन होते तसं ग्रामीण भागात होऊ शकतं. तंत्रज्ञान सुधारण्याची क्षमता सतत निर्माण करणे गरजेचं आहे‌. ग्रामीण भागात हायस्कूल कॉलेजच्या माध्यमातून शिक्षणाच्या उत्तम सोयी उपलब्ध करायला हव्यात. ग्रामीण भागातील संधीची ओळख संशोधन करण्याची जिद्द निर्माण करु शकलो तर तंत्रज्ञान सतत सुधारत राहील. उत्पादनावर मूल्यवृद्धी करून ज्ञानाचे जे मार्ग शहरात उपलब्ध आहेत ते ग्रामीण भागात उपलब्ध केले पाहिजेत.  शहरावरचा अतिरिक्त ताण कमी होईल. या सर्व संकल्पना प्रत्यक्षात कशा राबवता येतील हे आपल्यासमोर आव्हान आहे. ज्ञानसंस्थातून पुस्तकी ज्ञानाबरोबर ग्रामीण भागातील संधीचं सोनं करता येतील असे पाठ्यक्रम सुरु असलेल्या कामाच्या उदाहरणासह मांडली.

                                   


                                         व्याख्यानमाला २०२१ -   निवडक   प्रतिसाद 

 

तिन्ही व्याख्याने सामाजिक जाणिवेची, आधुनिक जगाची ओळख करून देणारी ,भविष्याचा वेध घेणारी,निस्वार्थ  बुध्दीने समाजासाठी व  देशासाठी कार्य करण्याची प्रोत्साहन देणारी ,विशेषतः तरुणांना मार्गदर्शन करणारी होती.घरबसल्या व्याख्यान ऐकण्याची संधी दिल्याबद्दल संजीवनी परिवाराचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.पुढील वाटचाली साठी संजीवनी परिवाराला शुभेच्छा.धन्यवाद!

श्री विश्वनाथ नाईक सोमाडी 

अप्रतिम व्याख्याने व तेवढ्याच ताकदीचे व्याख्याते. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांचे अनुभवव कार्य पाहता आपण किती छोटे आहोत याचा प्रत्यय येतो.

श्री सुभाष भट्टे , सत्पाळा.  

व्याख्यान हा आपला एक सुंदर उपक्रम आहे .दरवर्षी विषयांची विविधता व नाविन्यता ही याही वर्षी होती.केळकर सरांचे आधुनिक तंत्रज्ञान ,अधिक कदम यांचे अतुलनीय कार्य (खरं तर मराठी पाऊल पडते पुढे याचा सार्थ अभिमान वाटला).आणि अनिल काकोडकर यांचा ग्रामीण व शहरी सेतू सारेच विषय छान होते वक्ते ही छान बोलले आणि श्रोत्यांची उपस्थिती ही चांगली वाटली.

संजीवनी परिवाराचे आभार आणि कोणत्याही परिस्थितीत कार्यरत राहण्याच्या तुमच्या मेहनतीला धन्यवाद!

सौ अनिता नाईक , वाघोली 

तीनही व्याख्याने उत्तम झाली. संजीवनी परिवाराने नेहमीप्रमाणेच विषय अनुरूप असे निवडले  होते . सद्यस्थिती वर्तमानआणि भविष्य यांची छान सांगड घातली गेली. तज्ञ व्याख्याते साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ,बरोबरच कृतीअसे होते. आधी केले आणि मग सांगितले, आदरणीय श्री. अधिक कदम सर तर समर्पित जीवनप्रवास करीत आहेत.त्यांचे अनुभव ऐकतच राहावे असे वाटत होते. एका वेगळ्या विश्वात आपण विहार करत होतो. इतक्या तरुण वयात त्यांनी ध्येयासक्तीचे परमोच्च  शिखर गाठलेले आहे . त्यांच्या कार्याला तोड नाही 👌त्रिवार सलाम👏👏👏🌹🌹🌹आपल्या संजीवनी परिवाराचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏼 पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा 👍

सौ भारती नाईक, कोफराड 

 

फारच छान👌👌

पहिल्या व्याख्यानाची लिंक असेल तर पाठवा,काही वैयक्तिक कारणांमुळे जॅाइन करु शकलो नाही.

श्री आशिष नाईक , साकोरे 

संजीवनी परिवार,

 

आजच्या गुगल आणि यूट्यूब च्या जमान्यात व्याख्यान ही गोष्ट, म्हटलं तर कालबाह्य होत चालली आहे. परंतु योग्य विषय व त्यावरील वक्ता तसेच व्याख्यानाच्या निमित्ताने एकत्र येणे यातून बोधप्रद अशा अनेक गोष्टी मिळू शकतात. सामाजिक संपर्क वाढल्याने विविध घटकांचे एक नेटवर्क तयार होते आणि सामाजिक बांधिलकीही वाढते. ही गोष्ट युट्युब वर एकट्याने वक्त्याला ऐकणं किंवा बघणं यातून साध्य होऊ शकत नाही. एक तासाचे व्याख्यान म्हणजे साधारण हे 200 पानं वाचून मिळेल एवढे ज्ञान असा एक ठोकताळा. संजीवनी परिवार गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांना आपल्या भागात बोलावून बुद्धिजीवी वर्गाची भूक भागवण्याचं उत्तम कार्य करते आहे. त्याबद्दल तुमचे कौतुक.

यावर्षीची पहिली दोन व्याख्याने मला ऐकता आली तर काही व्यक्तिगत अडचणीमुळे डॉक्टर अनिल काकोडकर यांचं व्याख्यान मला जॉईन करता आलं नाही. आयटी उद्योगात दहा एक वर्ष काम केल्यामुळे इंडस्ट्री 4.0 या विषयातील घडामोडींबद्दल मला माहिती होती. डॉक्टर भूषण केळकर यांनी हा विषय सामान्यांसाठी बऱ्यापैकी सोपा करून सांगितला. त्यांनी मांडलेल्या काही मुद्द्यांवर वेगळे मत असू शकतं. त्यादिवशी आयटी इंडस्ट्री मधले अनेक तरुणही सदर व्याख्यानाला जॉईन झाले होते. मला असं वाटतं अशा व्याख्यानांनंतर काहीतरी प्रक्रिया सुरू व्हायला हवी. तरुणांना या विषयी काय वाटतं, होऊ घातलेला बदल किती वास्तव आणि किती फुगा, या बदलातून आपल्या तरुणांसाठी काय नवीन संधी असू शकतात या विषयी मंथन सुरू व्हायला हवे. मला खात्री आहे या क्षेत्रात काम करणाऱ्या समाजबांधवांना अजून जास्त माहिती असेल. ती माहिती action मध्ये कशी convert होईल यावर whatsapp ग्रुपवर का होईना पण चर्चासत्रे व्हायला हवीत. व्यक्तिगत पातळीवर मला ब्लॉक चेन तंत्रज्ञानाबद्दल शिकण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती. या व्याख्यानानंतर मी IIT कानपूर च्या Professor ची एक lecture series बघण्यास सुरुवात केली.

 

अधिक कदम यांचं कार्य अदभुत आहे. पेलेट गनच्या छऱ्यातून आंधळे झालेल्या 1270 मुलांना परत दृष्टी मिळवून देणं काय, काश्मीर सारख्या धगधगत्या प्रदेशात 300 अनाथ मुलींचं हॉस्टेल काय.. राष्ट्र, धर्म, राजकारण या सर्व सीमा ओलांडून ते जे कार्य करतात त्याबाबत व्यक्त व्हायला माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांच्यासारख्या माणसाकडून स्फूर्ती घेऊन आपण निदान आपल्या गोतावळ्यातील, समाजातील काहींच्या व्यथा कमी करता येतील तर प्रयत्न करावेत इतकेच.

 

तुम्ही फुल टॉस दिल्याने माझी प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे लांबली आहे...जित्याची खोड...😊

 

श्री  राजेश नाईक, बोळींज,

 ०३.०५.२०२१.

खरोखरच खूप छान होती सगळी व्याख्याने .

डॅा . केळकर यांनी झपाट्याने बदलत असणारे तंत्रज्ञान युगासोबत आपण कसे स्वतःला त्याबरोबरीने समृध्द करतो हे खूप छान सांगितले .

श्री. अधिक कदम यांच्या बद्दल अभिप्राय देणे म्हणजे जणू काजव्याने सु्र्याची बरोबरी करणे ... शब्दच अपुरे पडतील .

डॅा. काकोडकर यांनी सांगितलेली “सिलेज “ ही संकल्पना खुपच भावली मनाला, या संकल्पनेला अनुसरुन आपण आपल्या परिसरात काही करु शकतो का असा विचार मी करीत आहे .

संजीवनी परिवाराचे खूप खूप धन्यवाद!

श्री  मंगेश नाईक, गास.

पहीले दोन्ही व्याखान अतिशय सुरेख अभिप्राय अगोदर दिला आहे

शेवटच (कालच) काही ऐकु शकलो नाही 🙏क्षमस्व 🙏

श्री विलास  नाईक, भीटारे.  

व्याख्यानं खुपच छान झाली ,काही अपेक्षा तरी कळवा, धन्यवाद!

श्री राजाभाऊ नाईक, वावळी. 

 

Aapanch tini lectures che marm atishay changalya bhashet  sangitale aahe. Yapalikade aanakhi Kay sangnar. Practically first lecture aapalya students na beneficial aahe. Ya fieldshi update asalelya Atharva sarkhya yuvakachya madatine  puna ekada recorded lecture students na aikavayala harkat nahi.About second lecture, it is on Deshprem. Aapala jiv dhokyat ghaloon Kashmir sarkhya thikani Ashram or school chalvanarya Adhik  Kadam na Salam. About third lecture Dr Kakodkar --Aapalya mandalina kiti benefit gheta yeil he aatach sangane kathin.

 श्री वसंत जोशी , भुईगांव. 

 

पहिल्या व्याख्यानातील तंत्रज्ञानामुळे नोकरी/उद्योग व्यवसायवर होणार म्हणून निर्माण झालेला प्रश्न तिसऱ्या व्याख्यानाने नवतरुणांना उद्योग/व्यवसायासाठीचे उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाले आहे . तसेच दुसऱ्या व्याख्यानात ईश्वरनिष्ठां/परस्पर विश्वासाचे मार्गदर्शन आहे असे मला वाटते.

श्री यशवंत पाटील,उमराळे

पहिले व तिसरे व्याख्यान एक मेकांना पूरक असे होते व तरुण पिढीला चांगले  मार्गदर्शन मिळाले असे वाटते. दुसरे व्याख्यान खरोखरच अचंबतीत करणारे व एखादी व्यक्ती व संस्था किती  अविश्वसनीय असे कार्य करू शकते याचे दर्शन झाले. अश्या कार्याला आपण सर्वांनी जे काही शक्य आहे जसे की आर्थिक  मदत तसेच अधिक कदमांनी सांगितले तसे त्या संस्थेतील विद्यार्थांना आपल्या इथे उच्च शिक्षणासाठी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.

संजीवनी परिवार ने ह्या वर्षी देखील कारोना च्या महामरित खूप सुंदर अशी व्याख्यान माला यशस्वी पणे आयोजित केली त्याबद्दल आपण सर्वांचे हार्दिक अभिनंदन व आभार. 💐🙏🙏🙏

श्री मनोज नाईक, कोफराड. 

Good morning 🌹🙏

आपल्या संजीवनी परिवारचे आभार

सर्वच विषय छान होते वक्ते सुद्धा  परीपुर्ण अभ्यासु होते 👌

श्री जयेश नाईक, वटार.

खूपच छान. ह्या कोरोना  काळात यशस्वी पणे आयोजन केल्या बद्दल संजीवनी परिवाराचे हार्दिक अभिनंदन.💐💐💐💐💐

श्री संजू  नाईक, वटार. 

सर्व व्याख्यानाचे परीक्षण योग्य शब्दात केले आहे धन्यवाद!

श्री अनंत पाटील , भुईगांव. 

तिन्ही व्याख्याने अप्रतिम झाली.  

श्री भगवान नाईक, सोमाडी.