Tuesday 22 July 2014

अर्थसंकल्प - अनेक अर्थ


अर्थसंकल्प वरील विवेचनाला सुरवात करताना  हिंदीतील  कविता
जीत की खातीर बस जुनून चाहिये
                 "जिसमे उबाल हो ऐसा खुन चाहिऐ"
ये आसमा भी आयेगा जमी पर   
             "बस इरादो मे जीत की गूँज चाहिये"  चा उलेख करून म्हटले कि या संकल्पा मध्ये जिंकण्याची उर्मी आहे का  हे आपण शोधणार आहोत.


अत्यंत समर्थ सरकारचा अत्यंत सावध अर्थसंकल्प व संरक्षण ह्या विषयाची व्याख्या आणि व्याप्ती वाढवणारा हा अर्थसंकल्प आहे. असे प्रतिपादन श्रीयुत चंद्रशेखर टिळक यांनी शनिमंदिर वाघोली येथे संजीवनी परिवाराच्या "अर्थसंकल्प अनेक अर्थ"  या कार्यक्रमात केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री यशवंत पाटील होते. ते पुढे म्हणाले कि अच्छे दिन आने वाले हैं असे म्हटलंय तर  कुठे आहेत अच्छे दिन  असे विचारतात त्याचं उत्तर असे कि अच्छे दिन आयेगे असे म्हटलंय पण कब आयेगे हे म्हटलं नाही त्यासाठी वेळ द्यावा लागेल. 
 अर्थसंकल्प हे आर्थिक राजकारणाचं किवा राजकीय अर्थकारणाचं माध्यम आहे. सरकार बदलणे हि राजकीय प्रक्रिया आहे  परंतु  अर्थकारण हे राजकारणाच्या पलीकडे  आहे.  मणिपूरच्या क्रीडा विद्यापीठाच्या तरतुद म्हणजे  प्रामाणिक प्रयत्नांना मनापासून   दिलेली दाद  आणि पोचपावती  आहे असे म्हणाले. किसान पत्र ,  स्माल सेविंग , पी पी एफ , यातील तरतुदी  व त्याचा दीर्घकालीन परिणाम सोदाहरण  उकलुन  दाखविला  शेवट करताना त्यांनी सांगितले कि दीर्घकालीन दृष्टीकोनातून विचार केला तर आशा  ठेवायला  नक्की  वाव आहे असा अर्थसंकल्प. 
सुरवातील कमलाकर पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक केले तर आनंद पाटील यांनी सुत्रसंचलन  व आभार मानले.    




No comments:

Post a Comment