Monday 28 May 2018

गुलजार

सम्पूर्ण सिंह कालरा, जन्म   १८ ऑगस्ट १९३४ ला दीना जिल्हा झेलम पंजाब येथे झाला आता  हा भाग पाकिस्तान मध्ये येतो . फाळणी नंतर हे कुटूंब अमृतसर मध्ये आलं. संपूर्ण सिंह अमृतसर मार्गे मुंबईला आले एका गॅरेज मध्ये मॅकेनिक म्हणून काम करू लागले, फावल्या वेळात कविता करण्याचा छंद जोपासत होते. आणि इथेच जन्मला  आपल्या सर्वाचा आवडता कवी , गीतकार , संवाद लेखक, पटकथाकार, निर्देशक  असं सर्व आकाश व्यापणारा गुलजार   वाया गुलजार दीनजी.  त्यांच्या आवडणा-या काही कविता. 


आदमी बुलबुला है पानी का
और पानी की बहती सतहा पर
टूटता भी है डूबता भी है
फिर उभरता है, फिर से बहता है
न समुंदर निगल सका इस को
न तवारीख़ तोड़ पाई है
वक़्त की हथेली पर बहता
आदमी बुलबुला है पानी का
भावार्थ : माणूस पाण्याचा बुडबुडा आहे. आणि वाहत्या पाण्याच्या पृष्ठभागावर तो फुटतो,बुडतो , परत आकार घेतो आणि वाहत राहतो. . सुमुद्र त्याला गिळू शकला नाही, नाही खंदक त्याला तोडू शकला. काळाच्या छातीवरून तो सतत वाहतो आहे. माणूस पाण्याचा बुडबुडा आहे. मानवी क्षणभंगुरता , प्रत्येक प्रसंगाला समोर जाणे,आणि प्रखर इच्छाशक्तीने जीवन पुढे नेत राहणे किती समर्थ पणे आले आहे. (क्रमश:)

No comments:

Post a Comment