Monday 28 April 2014

संजीवनी व्याख्यानमा​ला २०१४


अर्थविषयक जाणीवा प्रगल्भ करण्याशिवाय पर्याय नाही  -   गिरीश कुबेर 
 
आपल्यला जर प्रगती करावयाची असेल तर अर्थविषयक जाणीवा प्रगल्भ करण्याशिवाय पर्याय नाही  राजकारण दुय्यम आहे प्रत्येक  जागतिक घडामोडीत , राजकारणाला  एक महत्वाचा पदर असतो तो    आपल्या पुढे   येत नाही    आणि तो केवळ अर्थकारणाचा पदर असतो. त्याच्या कडे जास्तीत जास्त लक्ष देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन श्री गिरीश कुबेर यांनी संजीवनी व्याख्यानमालेचे उद्घाटन करताना काढले.  जग अर्थव्यवस्थे भोवती फिरतं, आपल्याला सगळं कळतं परंतु  अर्थकारण समजत नाही. त्याचा फटका आपणास बसतो. मराठी समाजाला "एम" विटामिन ची कमतरता आहे. त्यामुळे आपण अर्थान्धळे झालेलो आहोत.
 
जगाचा इतिहास जो घडलेला आहे , वर्तमान जो घडतोय तो आर्थिक  ताकदीतून घडलेला आहे.  या सगळ्या पाठचे पहिले कारण  असते ते अर्थकारण ह्याची जाणीव  आपण करून घेणे  आवश्यक  आहे.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नितीन पाटील होते. प्रास्ताविक व  पाहुण्याची ओळख अरविंद पाटील यांनी करून दिली.
 सुत्रसंचलन सौ स्वाती नाईक ह्यांनी केले तर सौ तेजल पाटील यांनी  ईशस्तवन सादर केले.  

No comments:

Post a Comment