Monday 28 April 2014

संजीवनी व्याख्यानमा​ला २०१४ - पुष्प दुसरे

कलाक्षेत्र आणि सर्वसामान्य नागरिक या मधील रसिकपणाचा, आस्वादाचा धागा जोडला गेला  पाहिजे - वासुदेव कामत


पहिल्यादा चित्रं पाहणं सुरु करावं आणि मग वाचणं सुरु करावं. चित्र पाहण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. आपल्या आत रसिकता असते ती
समजून  घ्यायला हवी.  असे  चित्रकार वासुदेव कामत यांनी मुलाखतकार विनायक परब यांच्या प्रश्नाला उत्तर देताना, संजीवनी व्याख्यानमालेत  सागितले. ते पुढे म्हणाले कि सूर्यास्ताची वेळ आहे , आकाशात ढग आहेत , ढगावर पडलेल्या  प्रकाशा मुळे  आकाशाच्या अवकाशात झालेली  रचना  आपण पाहत असतो. पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस थांबलाय , रस्त्यावरील खड्यात साचलेल्या  पाण्यावरती पेट्रोलचे   , डिझेलचे  थेंब  पडले आहेत त्यानं इंद्रधनुष्य  सारखे वेगवेगळे आकार आणि  रंग आपण पाहत असतो.  कधी समोरच्या दृश्याला  प्रश्न करत नाही कि  याचा अर्थ काय? आपण या सर्वाचा आस्वाद,आनंद  घेत असतो. अश्या प्रकारे चित्राचा आनंद घ्यायला शिकायला पाहिजे.
 





कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विलास नाईक होते. प्रास्ताविक व पाहुण्याची ओळख आनंद पाटील यांनी करून दिली. सुत्रसंचलन कु. पल्लवी नाईक  नी केले तर सौ तेजल पाटील  नी  ईशस्तवन सादर केले. 

No comments:

Post a Comment