Saturday 14 September 2019

छोडो यार !!

एखादी गोष्ट घट्ट धरून ठेवण्याने  आपण खंबीर आहोत असं वाटतं. पण कधीतरी गोष्ट सोडून देणं  शहाणपण ठरतं. 

आपल्यापैकी बहुतेकांना   काही गोष्टी सोडून देणं खूप अवघड जाते. एखादी गोष्ट नाही जमली, एकत्र काम करणं जमलं नाही तर त्याचा खेद करतो. आपल्याला शिकवलं गेले आहे की कितीही कठीण परिस्थितीत घेतलेले काम सोडू नका, हार मानू नका. परंतु ह्याचे दुष्परिणाम होताना दिसतात. अपूर्ण कामं  ताण तणाव निर्माण करतात .  अपराधीपणाची भावना जागृत होते आणि त्याचा भविष्यातील  कामावर विपरीत परिणाम होतो. 
ज्या  गोष्टींना आपण खूप महत्व देतो, जी  मूल्य जगण्याचा  मार्ग होतात तीच खूप जाचक ठरतात.

उद्दिष्ट,ध्येय ठरवणं आणि गाठण्यासाठी अहोरात्र ध्यास घेणे उत्तमच. परंतु जीवनाच्या प्रवासात काही उद्दिष्ट , ध्येय कालबाह्य होतात अश्यांचा विचार करणे फेर आढावा घेणे आवश्यक असते.  
खूपवेळा प्रयत्न करून , मनासारख्या गोष्टी घडत नाहीत , परत परत काहीतरी राहून जातं अश्यावेळी जसं आहे तसं स्वीकारता आलं पाहिजे. 
अश्या वेळी सोडून  देऊन पुढे गेलं पाहिजे. 
तुम्हाला सहज काही गोष्टी सोडून देता येतात का ?  जर तुम्ही हट्टीपणे ,दुराग्रहाने पाठपुरावा करत राहात असाल तर दुस-या संधी धूसर होतात .   वेळीच गोष्टी सोडून देता आल्या नाहीतर दु:ख च देतात .
जुनी ध्येय , धोरण , माणसं पुन्हा पुन्हा काळाच्या कसोटीवर तपासून घ्यायला हवीत.  
एखादी गोष्ट सोडून देणे म्हणजे  पराभव नव्हे. 
सोडून देणे  म्हणजे पराभवाची खूणगाठ नव्हे. 
सोडून दिले  म्हणजे उपयोगाचं राहिलं  नसावं.   
सोडून दिले म्हणजे सर्व प्रयत्न करूनही इच्छित फळ मिळत नसावं. 
सोडून देणे म्हणजे अधिक चांगल्या गोष्टी वर लक्ष केंद्रित करणे.  
सोडून देण्याने अधिक चपळता, लवचिकता बाणू शकते. 
सोडून दिल्या मुळे नवीन संधी मिळू शकतील.  
बऱ्याच प्रकरणात सोडून देण्याने नवीन  उत्तम  पर्याय उपलब्ध होतात, नवीन ध्येय,माणसं जोडली जातात जी पुढे जाण्यात मदतगार होतात. 
सोडून दिल्या मुळे धक्क्याची तीव्रता कमी होते, मानसिकता अधिक लवचिक होते. 
बघा 
आतातरी  काही काही गोष्टी सोडणं इष्ट  वाटतं ना ! की आव्हानं !!!
(इंग्रजी लेखाचं स्वैर भाषांतर ,त्रुटी अर्थातच माझ्या )

1 comment: