Saturday 31 March 2012

गुढीपाडवा आणि आपण

लहानपणा पासून गुढीपाडवा म्हटले  म्हणजे जगमाता यात्रोत्सव व  तेच आकर्षण. पुढे कोणी तरी सागितले गुढीपडावा म्हणजे हिंदू वर्षातील हा पहिला दिवस , चित्र शुध्द प्रतिपदा. साडेतीन मुहूर्तापैकी  एक मुहूर्त.आपल्या  कडे ह्या दिवशी गुढी उभारून नाव  वर्षाच स्वागत करतात. गुढी हि विजयाची, स्वागताचे  प्रतिक. ह्या दिवशी कडुलिंब पाने व साखरेचा प्रसाद देतात. वर्षारंभी कडू गोड प्रसाद का  द्यावा.   जीवन, संवत्सर, वर्ष म्हणजे कडू गोड घटनेची साखळी त्याची तयारी पहिल्या दिवसा पासून असावी. म्हणून असा प्रसाद असावा व अश्या सर्व घटना प्रसाद म्हणून स्वीकारत्या याव्या, असा धडा असावा.  याच दिवसा पासून शालिवाहन शक चा प्रारंभ होतो. इ स ७८ पासून शक सुरु झाले. (इ स २०१२  शके १९३४).

उध्दघाटक श्री गो. ज. नाईक

गुढीपाडवा म्हणजे चांगल्या कार्याला सुरवात करण्याचा दिवस.  संजीवनी परिवारांनी डॉ. स्वाती नाईक व डॉ वर्षा यांच्या पुढाकाराने कॅल्शियम व हिमोग्लोबिन टेस्ट चे आयोजन केले होते.वयोपरात्त्वे शरीरातील कॅल्शियम कमी होते त्या मुळे हाडं ठिसूळ होतात, सांधे दुखी, इत्यादी विकार जाणवू लागतात. याची जाणीव निर्माण करण्याचा हा प्रयत्न. शिबिराचे उध्दघाटन श्री गो. ज. नाईक यांनी केले. शंभर लोकांनी याचा लाभ घेतला.   उत्कर्ष मंडळ व जगमाता विश्वस्थ  मंडळाच्या सहकार्या  मुळे शक्य  झाले. 


 अशोक नायगावकर  ,आप्पा फुलारे  हॉल , वाघोली
गुढीपाडव्याच्या दिवसी ब्रह्म देवांनी सृष्टीची निर्मिती केली अशी एक आख्यायिका आहे. या दिवसी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराभव करून अयोध्येला प्रवेश केला. सामवेदी ब्राह्मण संघाची स्थापना ह्याच दिवसी  झाली.   गुढीपाडवा हा संघाचा वर्धापन दिवस. या निमिताने झालेल्या कार्यक्रमात कवी अशोक नायगावकर  उपस्थित होते. वंग्यात्मक काव्यतून चिमटे काढत मजा आणली.

No comments:

Post a Comment