Wednesday 7 May 2014

३० टक्के लोकांची प्रगती होऊन हा देश सुधारणार नाही


३० टक्के लोकांची प्रगती होऊन हा देश सुधारणार नाही तर ७० टक्के लोक गावात राहतात त्यांनाही बरोबर घ्यावे लागेल असे प्रतिपादन श्रीयुत प्रदीप लोखंडे यांनी संजीवनी व्याख्यानमालेत  केले. ते पुढे म्हणाले शहरी व ग्रामीण भागाचा दुवा म्हणून रुरल रिलेशन हि संस्था काम करते. थोडक्यात ग्रामीण भागाशी   रिलेशनच्या माध्यमातून दुवा साधणारी संस्था म्हणून रुरल रिलेशन. सात राज्यातील ५८०० ग्रामीण  तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. तरुणांना माझे सांगणे आहे कि कुठलीही गोष्ट करताना त्याची माहिती घेतली पाहिजे , त्याच्या खोल वर गेले पाहिजे मगच समोर गेले पाहिजे. जेव्हा एक व्यक्ती दोनशे वेगवेगळ्या प्रकृतीच्य व्यक्तींना भेटते तेव्ह्या त्याचे व्यक्तिमत्व बदलते,गावातील तरुण हि बदलत आहे.
त्यांनी रुरल रिलेशन च्या वेगवेगळ्या उपक्रमाची महिती दिली. "अनिवासी गावावासी चळवळ" अतर्गत २००१ ते २००९ मध्ये २०००० शाळांना २८००० संगणक दिले. यात कोर्पोरेट  व सामान्य  लोकांचा  सहभाग लाभला.  तर " ग्यान कि " वाचनालय  अतर्गत  गेल्या दोन वर्षात १२५५ ग्रामीण माध्यमिक शाळेत वाचनालय उघडली. या वाचनालयात सर्व विषयाची  मिळून १८०-२०० पुस्तके दिली जातात आणि हा उपक्रम महिलांच्या योगदानानी  चालतो. पुढच्या वर्षी १००० वाचनालय सुरु करण्याचा संकल्प असल्याचे सांगितले. 

प्रसिद्ध लेखक श्री सुमेध रिसबूड यांनी प्रदीप लोखंडे यांची मुलाखत घेतली.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संदीप म्हात्रे होते. प्रास्ताविक व पाहुण्याची ओळख राजू नाईक यांनी करून दिली. सुत्रसंचलन कु. धनाली जोशी ह्यांनी केले तर कु नेहा पाटील यांनी  ईशस्तवन सादर केले.                      

No comments:

Post a Comment