Monday 13 May 2019

विचाराची कमळें उमलवणारा विचार सूर्य म्हणजे कबीर.



 
कहत कबीर सुनो भाई साधो म्हणजे  कबीर सांगतात  ऐका  विचार करा आणि साध्य करा. असा  मतितार्थ आहे  असे प्रतिपादन सुप्रसिद्ध निवेदिका , संत साहित्याच्या अभ्यासक श्रीमती धनश्री लेले यांनी वसईतील  संजीवनी व्याख्यानमालेत प्रथम पुष्प गुंफताना केले . त्या "कहत कबीर" या विषयावर बोलत होत्या. महाराष्ट्रांत संत ज्ञानेश्वर , तुकाराम महाराज, स्वामी रामदास तसे उत्तरेत संत कबीर. मनामनात विचाराची कमळें उमलवणारा विचार सूर्य म्हणजे कबीर.








 ते सांगतात मी हिंदू नाही मुसलमान ही नाही मी माणूस आहे.  त्यांनी दोन्ही धर्मातील वाईट चालीवर प्रहार केले . एक वेळ ते म्हणतात  मुल्ला होकर बांग पुकारे वो क्या साहेब बहिरा है । त्याच बरोबर हेही सांगतात की " पत्थर पूजे हरी मिले तो मैं पूजूँ पहाड़ ।"

संजीवनी व्याख्यानमालेला  एक अधिष्ठान प्राप्त झाल्याचं त्यांनी सुरवातीला सांगितलं आणि परिवाराला रौप्यमहोत्सवी वाटचाल पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केलं.
 




त्यांनी पुढे संत कबीरा च्या दोह्यातील  आणि संत तुकारामाच्या अभंगातील साम्यस्थळं  उलगडून दाखवली.   तसेच पंढरपूर व तुळशीमाळ व बुक्क्याचा उल्लेख कहत कबीर  हरिसे मिठा लागे तुळशी बुक्का ह्या दोह्यांचा दाखल देऊन केला.  


सुरवातीला श्रीमती अनिता नाईक यांनी प्रास्ताविक व पाहुण्याची ओळख करून दिली अध्यक्षस्थानी  केएमपीडी  स्कुल च्या मुख्याध्यपिका श्रीमती वंदना नाईक होत्या  कु धनाली जोशी हिने  सूत्रसंचालन केलं. सौ रीमा नाईक हिने ईशस्तवन सादर करून  सूंदर वातावरण निर्माण केलं तर  कौस्तुभ पाटील व मंगेश नाईक यांनी सुरेख साथ दिली. 
 



रसिक ,जाणकार , योग्य ठिकाणी दाद देणारे श्रोते हेच वक्त्यांना प्रोत्साहित करत असतात असे श्रोते लाभणं ही वक्त्यांची पुण्याई




भाषणाच्या ओघात आलेले काही दोहे. कबिरा विषयी औसुक्य वाढवणारे होते 
  • "हरी को धुंडन मै चला, जा पोहोचा हरीद्वार, पग थके, हरी न मिले, क्यूकी हरी थे मेरे द्वार" 
  • मुल्ला होकर बांग पुकारे वो क्या साहेब बहिरा है
  • " पत्थर पूजे हरी मिले तो मैं पूजूँ पहाड़ ।"
  • गुरु तो ऐसा चाहिए, शिष्य सों कछु न लेय। शिष तो ऐसा चाहिए, गुरु को सब कुछ देय।। 
  •  नैनम मे श्याम बसे 
  • मागनसे  मरना भले 
  • छोड दिया बैकुठं हरी भाव भगतका भुखा 


No comments:

Post a Comment